शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विद्यार्थ्यांना पडला अभ्यासक्रमाचा विसर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले हाेते. परंतु कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परिस्थितीत बदल घडून येत असले तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट सुविधा प्रभावी नसल्याने ग्रामीण विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहे.

ठळक मुद्देदुर्गम भागातील जि.प.शाळांचे वास्तव

  लाेकमत न्यूज नेटवर्कजारावंडी : कोरोना विषाणूच्या भीतीने राज्यात आजपर्यंत शाळा बंद आहेत. शाळा बंदचा जास्तीत जास्त परिणाम ग्रामीण व दुर्गम भागात झाल्याचे चित्र पाहायला मिळते. इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षण घेणारे जि.प.शाळेतील विद्यार्थी चक्क अभ्यासक्रमच विसरलेे असल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटअभावी ऑनलाईन शिक्षण कुचकामी ठरत असून ग्रामीण विद्यार्थी गुणवत्तेत मागे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले हाेते. परंतु कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यान हळूहळू परिस्थितीत बदल घडून येत असले तरी जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागात इंटरनेट सुविधा प्रभावी नसल्याने ग्रामीण विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ८० टक्के पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. जारावंडीसारख्या ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी शाळा बंद असल्याने  शालेय अभ्यासक्रम  विसरले आहेत. १ ते १०० पर्यंतचे पाढे म्हणता येत नाही. मराठी भाषेतील वाचन व लेखन अचूकरित्या येत नाही. परिसर आदिवासीबहुल असल्याने शिक्षणाचा प्रसार कमी आहे. काही वर्षांपूर्वी आदिवासी समाजाची मुले शाळेत जायला घाबरत होती. परंतु शासनाने विद्यार्थ्यांसाठी अनेक उपाययोजना करून शिक्षणाच्या प्रवाहात  आणून शिक्षणाची गो़डी निर्माण केली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पटसंख्या वाढली आहे. परंतु आता शाळा प्रत्यक्ष भरत नसल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली. पालकांसाेबत शेतात जाऊ लागली आहे. 

बरेच पालक जागरूक नाहीतदुर्गम भागातील बऱ्याच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांच्याकडे स्मार्ट फाेनचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या साेयीसुविधा, तज्ज्ञ शिक्षक व तंत्रज्ञानाचा वापर याबाबत बरेच पालक अनभिज्ञ आहेत. कारण ग्रामीण भागात अशिक्षित पालकांची संख्या माेठी आहे. परिणामी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी यंदा गुणवत्तेत मागे पडणार आहेत. अभ्यासाऐवजी ते विविध खेळात मग्न असल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी