शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

अहेरी भागात रस्त्याचे काम रखडले

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

अहेरी उपविभागातील तालुक्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यांचे बांधकाम दुरूस्ती झालेली नाही. तसेच अनेक नवीन रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत.

अहेरी : अहेरी उपविभागातील तालुक्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यांचे बांधकाम दुरूस्ती झालेली नाही. तसेच अनेक नवीन रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. शासनाने या कामांकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने केली आहे.आलापल्ली-अहेरी-कागजनगर रेल्वे मार्ग निर्माण करून देवलमरी येथे सिमेंट उद्योग निर्माण करावे व अहेरी उपविभागातील रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विकासमंत्री यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. अहेरी येथील रस्ते पूर्णत: उखडलेले आहेत. देवलमरी, वेलगुर, एटापल्ली, भामरागड हे प्रमुख मार्ग अनेक दिवसांपासून दयनिय अवस्थेत आहेत. परंतु या रस्त्याच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्याबरोबरच अहेरी उपविभागातील ग्रामीण रस्ते दुरवस्थेत आहेत. रस्त्याच्या दुरव्यवस्थेमुळे अहेरी आगारामार्फत दुर्गम भागात सोडल्या जाणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गावाला ये-जा करतांना त्रास सहन करावा लागत आहे. बस व इतर साधनांचा परिसरात अभाव असल्याने अनेक व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे अहेरी उपविभागातील विकास खुंटला आहे. उद्योग धंद्यांचा अभाव असल्यामुळे या भागात रोजगाराची निर्मिती करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, पवन कोसरे, मनोज मडावी, राहुल मडावी, अजय चुधरी, सुरज कोसरे, श्रावण कोसरे, क्रिष्णा औतकार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)