शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आपलेपणातून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:47 IST

अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय राखत गडचिरोलीला मागास जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत. जिल्हा आपला मानून प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आवाहन : जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय राखत गडचिरोलीला मागास जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत. जिल्हा आपला मानून प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. आरोग्य विभागातील पदभरती बऱ्यापैकी झाल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात बंद असलेले सी.टी.स्कॅन मशीन, प्रस्तावित एमआरआय मशीन खरेदी आणि महिला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाºयांची प्रलंबीत भरती या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करण्याची सूचना खासदार अशोक नेते आणि आमदार डॉ.होळी यांनी केली.गटार योजनेच्या निधीची चौकशीगडचिरोली नगर पालिकेने गटार योजनेसाठी काम पूर्ण न होताच ७० लाखांचा निधी खाजगी संस्थेला दिला तसेच नगर विकासासाठी शासनाने जाहीर केलेल्या ९२ कोटी रुपयांपैकी २० कोटी रुपये खासगी बँकेत ठेवले. यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांची चौकशी करावी अशी मागणी खासदार नेते व आमदार होळी यांनी लावून धरली.या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी मागील बैठकीत झाली होती, ती इतिवृत्तात आलेली नाही, असाही मुद्दा चर्चेस आला. याची नोंद घ्यावी व पुढील कारवाई करावी तसेच बैठकीचे इतिवृत्त सदस्यांना निर्धारित वेळेत द्यावे, असे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी दिले.निधी खर्चात यंत्रणा माघारल्याजिल्हा वार्षिक योजनेचा सन २०१८-१९ वर्षासाठीचा एकूण आराखडा ४९४ कोटी १२ लक्ष ७८ हजार रुपयांचा आहे. त्यापैकी ८ कोटी ३३ लक्ष ४ हजार इतका खर्च झाला आहे. प्राप्त निधी ८१ कोटी ९२ लक्ष ६४ हजार इतका आहे. प्राप्त निधीच्या तुलनेत जूनअखेर केवळ १०.१८ टक्के रक्कम खर्च झाली आहे.सर्वसाधारण योजनेत आराखडा २२२ कोटी ५२ लक्ष इतका आहे. तो पूर्णपणे अर्थसंकल्पित झाला. त्यापैकी १६२ कोटी ९० लक्ष ८४ हजार इतका निधी प्राप्त झाला. जून अखेर २४ कोटी ५७ लक्ष ८७ हजार यंत्रणांना वितरित करण्यात आला. त्यातील ८७ लक्ष ३९ हजार रुपये खर्च जूनअखेर झाले आहे. वितरीत रकमेच्या ३.५६ टक्के इतकी रक्कम खर्च झाली आहे.आदिवासी उपयोजनेचा आराखडा २३४ कोटी ९५ लक्ष ४२ हजारांचा आहे. यातील १६४ कोटी ४६ लक्ष ७९ हजार तरतूद प्राप्त असून त्यापैकी ५६ कोटी ५६ लक्ष ३३ हजार निधी यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. जूनअखेर १३.१५ टक्के म्हणजे ७ कोटी ४३ लक्ष ८४ हजार रुपये खर्च झाले आहेत.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेDevrao Holiदेवराव होळी