शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चामोर्शीतील अतिक्रमण हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच

By admin | Updated: June 25, 2016 01:25 IST

आष्टी रोडवरील दिना नदीचे मेन कॅनलला लागून असलेल्या २० एकर शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेथे घर बांधले जात आहे.

तहसीलदार व एसडीओ जबाबदार : माणिकराव तुरे यांचा आरोपगडचिरोली : आष्टी रोडवरील दिना नदीचे मेन कॅनलला लागून असलेल्या २० एकर शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेथे घर बांधले जात आहे. २०१५ पासून अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु या अतिक्रमणाकडे चामोर्शीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रिपाइं खोब्रागडे गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष माणिकराव तुरे यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर जागा ही चामोर्शी शहरातील अतिशय महत्त्वाची व संवेदनशील जागा आहे. येथे अतिक्रमण होत असताना स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होण्याचे कारण काय, असा सवाल तुरे यांनी केला आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली व क्रीडांगण, बसस्थानकासाठी चामोर्शीवासीयांना जागा उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी चामोर्शी शहरात होत असलेल्या अतिक्रमणाला उपविभागीय अधिकारी हे जबाबदार आहेत, असा सूर लावला. अतिक्रमणधारकातील एकाने न्यायालयात धाव घेऊन ही जमीन आपल्याला द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु शासनाने अटी व शर्तीमध्ये ते बसत नाही म्हणून त्यांचा अर्ज खारीज केला. सदर अतिक्रमणधारक हा कोट्यधीश असून यापूर्वीही त्याला शासनाने जमीन देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळून लावला व त्याने अतिक्रमण केलेली जागा चामोर्शीच्या विकासासाठी मोकळी करून देण्यात यावी, असे आदेश तहसीलदार चामोर्शी यांना देण्यात आले. २२ जून रोजी चामोर्शी येथे महसूल विभागाने समाधान शिबिर घेतले. त्यावेळी आपण या जागेबाबत प्रश्न उपस्थित केला व कोर्टाने आदेश दिलेले असल्याने चामोर्शीच्या तहसीलदारांनी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या जागेवरील अतिक्रमण विनाविलंब हटवावे, अशी मागणी केली. असे तुरे यांनी म्हटले आहे. मात्र अजूनही तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या धनाड्याचे अतिक्रमण हटविलेले नाही, असे आरोप तुरे यांनी केला आहे.