शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पुलाने जोडले दोन राज्यांचे संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:36 AM

सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअहेरीवरून भोपालपटनमला थेट बस : महाराष्ट्र-छत्तीसगड बससेवेमुळे प्रवास सुकर

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचानजीकच्या गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यानंतर या पुलावरून महाराष्ट्र-छत्तीसगड अशी थेट वाहतूक सुरू झाली आहे. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बसफेरी इंद्रावती नदीच्या पुलाच्या बाजूने लहानशा मार्गातून थेट छत्तीसगड राज्याकडे सुरू करण्यात आली आहे. पुलाच्या बांधकामामुळे महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यातील लोकांचे संबंध चांगले जुळले आहेत.सिरोंचा तालुक्यातून तेलंगणा राज्यातील निजामाबाद व छत्तीसगड राज्यातील जगदलपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग करण्यात येणार आहे. गोदावरी नदीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता छत्तीसगडच्या इंद्रावती नदीवर पुलाचे बांधकाम सध्या कासवगतीने सुरू आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या परिसरात पाणी अडवून लहानसा मार्ग काढण्यात आला असून छत्तीसगड-महाराष्ट्र अशी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या मार्गाद्वारे राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बस थेट छत्तीसगडमधील भोपालपटनम येथे जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनीही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदा होत आहे. या मार्गे दररोज प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अहेरी उपविभागात यापूर्वी पातागुडमपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पावसाळावगळता उन्हाळा व हिवाळा अशा आठ महिन्यांच्या कालावधीत सुरू असायचे. तेव्हा पावसाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता पुलाची निर्मिती झाल्याने तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू असल्याने महामंडळाची बसफेरी सुरू झाली आहे. परिणामी बसने प्रवास करीत लगतच्या राज्यात जाता येत आहे. दररोज या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास २०० वाहनांचे आवागमन होत आहे.भोपालपटनमचे तिकीट ८५ रूपयेमहाराष्ट्र-छत्तीसगड तसेच महाराष्ट्र-तेलंगणा अशी वाहतूक अहेरी उपविभागातून सुरू झाली आहे. अहेरी आगाराची बस सिरोंचावरून भोपालपटनम येथेही जात आहे. सिरोंचा ते भोपालपटनम हे ६७ किमीचे अंतर असून महामंडळाच्या बस तिकीट ८५ रूपये आहे. ८५ रूपयांमध्ये सिरोंचावरून भोपालपटनमला प्रवाशांना जात येत आहे. यापूर्वी अशा प्रकारची थेट प्रवासाची सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अहेरी उपविभागातील नागरिकांना छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पूर्वी पायी प्रवास करावा लागत होता. आता बस सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.