शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

५ वर्षात दहा महिने नियमित मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देएटापल्ली नगर पंचायत । विकासात्मक कामांवर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली ग्रामपंचायतीला ३ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायतची स्थापना होऊन पाचवर्ष पूर्ण झाली. या पाच वर्षाच्या कालावधीत दोन मुख्याधिकारी नियमित फक्त दहा महिन्यांच्या कालावधीकरिता मिळाले. मात्र पाच वर्षात प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावरच चार वर्षाच्या कार्यकाळ होता. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे विकासकामांवर परिणाम होत आहे.नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु ही अपेक्षा दिवास्वप्न ठरले. नगरपंचायत स्थापनेनंतर सुरूवातीला ३ जुलै ते २८ डिसंबर २०१५ पर्यंत मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार तहसीलदार एस. पी. खलाटे यांच्याकडे होता. डिसेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, त्यांनतर ऑगस्ट २०१६ ते डिसंबर २०१६ पर्यंत केवळ ४ महिने नियमित मुख्याधिकारी सुनील कोकणी यांनी काम पाहिले. त्यानंतर परत जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ पर्यंत तब्बल २ वर्ष नायब तहसीलदार एस.एन. सिलमवार यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ पर्यंत तहसीलदार सुभाष यादव यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. मात्र पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. केवळ एक महिना यांच्याकडे प्रभार होता. त्यांच्या निधनानंतर जानेवारी ते फेबु्रवारी २०२० पर्यंत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे प्रभार असताना फेबु्रवारी २०२० ला परत नियमित मुख्याधिकारी अजय साळवे नियुक्त झाले. परंतु त्यांच्याकडे अहेरी नगरपंचायतचा प्रभार सोपविण्यात आला. एटापल्लीपेक्षा अहेरीकडे त्यांचे जास्त लक्ष असायचे. याच महिन्यात त्यांची बदली अहेरीला झाली. यादरम्यान ते केवळ ६ महिने एटापल्ली येथे कार्यरत होते. नियमित मुख्याधिकारी मिळाल्यानंतर त्यांना कायम न ठेवणे हे एटापल्ली नगरपंचायतच्या पदाधिकारी व नगरसेवकांचे अपयशच म्हणावे लागेल. आता पुन्हा एसडीओ मनूज जिंदल यांच्याकडे मुख्याधिकाºयांचा प्रभार सोपविण्यात आला आहे.एटापल्ली नगर पंचायतीला स्थायी मुख्याधिकारी मिळत नसल्याने व मिळालेले मुख्याधिकारी अहेरी नगर पंचायतीने हिरावून नेल्याने काहीसा रोष व्यक्त होत आहे.आयएएस नको, नायब तहसीलदारच हवेएटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असेही रमेश टिकले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत