शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

५ वर्षात दहा महिने नियमित मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देएटापल्ली नगर पंचायत । विकासात्मक कामांवर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली ग्रामपंचायतीला ३ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायतची स्थापना होऊन पाचवर्ष पूर्ण झाली. या पाच वर्षाच्या कालावधीत दोन मुख्याधिकारी नियमित फक्त दहा महिन्यांच्या कालावधीकरिता मिळाले. मात्र पाच वर्षात प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावरच चार वर्षाच्या कार्यकाळ होता. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे विकासकामांवर परिणाम होत आहे.नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु ही अपेक्षा दिवास्वप्न ठरले. नगरपंचायत स्थापनेनंतर सुरूवातीला ३ जुलै ते २८ डिसंबर २०१५ पर्यंत मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार तहसीलदार एस. पी. खलाटे यांच्याकडे होता. डिसेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, त्यांनतर ऑगस्ट २०१६ ते डिसंबर २०१६ पर्यंत केवळ ४ महिने नियमित मुख्याधिकारी सुनील कोकणी यांनी काम पाहिले. त्यानंतर परत जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ पर्यंत तब्बल २ वर्ष नायब तहसीलदार एस.एन. सिलमवार यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ पर्यंत तहसीलदार सुभाष यादव यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. मात्र पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. केवळ एक महिना यांच्याकडे प्रभार होता. त्यांच्या निधनानंतर जानेवारी ते फेबु्रवारी २०२० पर्यंत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे प्रभार असताना फेबु्रवारी २०२० ला परत नियमित मुख्याधिकारी अजय साळवे नियुक्त झाले. परंतु त्यांच्याकडे अहेरी नगरपंचायतचा प्रभार सोपविण्यात आला. एटापल्लीपेक्षा अहेरीकडे त्यांचे जास्त लक्ष असायचे. याच महिन्यात त्यांची बदली अहेरीला झाली. यादरम्यान ते केवळ ६ महिने एटापल्ली येथे कार्यरत होते. नियमित मुख्याधिकारी मिळाल्यानंतर त्यांना कायम न ठेवणे हे एटापल्ली नगरपंचायतच्या पदाधिकारी व नगरसेवकांचे अपयशच म्हणावे लागेल. आता पुन्हा एसडीओ मनूज जिंदल यांच्याकडे मुख्याधिकाºयांचा प्रभार सोपविण्यात आला आहे.एटापल्ली नगर पंचायतीला स्थायी मुख्याधिकारी मिळत नसल्याने व मिळालेले मुख्याधिकारी अहेरी नगर पंचायतीने हिरावून नेल्याने काहीसा रोष व्यक्त होत आहे.आयएएस नको, नायब तहसीलदारच हवेएटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असेही रमेश टिकले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत