शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

५ वर्षात दहा महिने नियमित मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST

एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देएटापल्ली नगर पंचायत । विकासात्मक कामांवर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली ग्रामपंचायतीला ३ एप्रिल २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायतची स्थापना होऊन पाचवर्ष पूर्ण झाली. या पाच वर्षाच्या कालावधीत दोन मुख्याधिकारी नियमित फक्त दहा महिन्यांच्या कालावधीकरिता मिळाले. मात्र पाच वर्षात प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या भरवशावरच चार वर्षाच्या कार्यकाळ होता. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे विकासकामांवर परिणाम होत आहे.नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु ही अपेक्षा दिवास्वप्न ठरले. नगरपंचायत स्थापनेनंतर सुरूवातीला ३ जुलै ते २८ डिसंबर २०१५ पर्यंत मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार तहसीलदार एस. पी. खलाटे यांच्याकडे होता. डिसेंबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, त्यांनतर ऑगस्ट २०१६ ते डिसंबर २०१६ पर्यंत केवळ ४ महिने नियमित मुख्याधिकारी सुनील कोकणी यांनी काम पाहिले. त्यानंतर परत जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ पर्यंत तब्बल २ वर्ष नायब तहसीलदार एस.एन. सिलमवार यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर २०१९ पर्यंत तहसीलदार सुभाष यादव यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार होता. मात्र पदावर असतानाच त्यांचे निधन झाले. केवळ एक महिना यांच्याकडे प्रभार होता. त्यांच्या निधनानंतर जानेवारी ते फेबु्रवारी २०२० पर्यंत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे प्रभार असताना फेबु्रवारी २०२० ला परत नियमित मुख्याधिकारी अजय साळवे नियुक्त झाले. परंतु त्यांच्याकडे अहेरी नगरपंचायतचा प्रभार सोपविण्यात आला. एटापल्लीपेक्षा अहेरीकडे त्यांचे जास्त लक्ष असायचे. याच महिन्यात त्यांची बदली अहेरीला झाली. यादरम्यान ते केवळ ६ महिने एटापल्ली येथे कार्यरत होते. नियमित मुख्याधिकारी मिळाल्यानंतर त्यांना कायम न ठेवणे हे एटापल्ली नगरपंचायतच्या पदाधिकारी व नगरसेवकांचे अपयशच म्हणावे लागेल. आता पुन्हा एसडीओ मनूज जिंदल यांच्याकडे मुख्याधिकाºयांचा प्रभार सोपविण्यात आला आहे.एटापल्ली नगर पंचायतीला स्थायी मुख्याधिकारी मिळत नसल्याने व मिळालेले मुख्याधिकारी अहेरी नगर पंचायतीने हिरावून नेल्याने काहीसा रोष व्यक्त होत आहे.आयएएस नको, नायब तहसीलदारच हवेएटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी नायब तहसीलदारांची नियुक्ती मुख्याधिकारीपदी करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असेही रमेश टिकले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत