शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार; प्राध्यापक भरती गाजावाजा करून अन् निवड मात्र मेल पाठवून!

By संजय तिपाले | Updated: September 29, 2023 11:22 IST

उमेदवारांमध्ये संभ्रम : निकालाकडे डोळे लावून बसलेल्यांचा हिरमोड

संजय तिपाले

गडचिरोली : येथील गाेंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या ३० जागांसाठी भरती प्रक्रिया झाली; परंतु, निवड झालेल्यांना थेट मेल पाठवून गुड न्यूज देण्यात आली. निकाल जाहीर झाल्यावर विद्यापीठाने नोटिफिकेश न काढल्याने इतर उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया जाहिरात देऊन केली; पण रुजू करून घेताना बाळगलेल्या गोपनीयतेमुळे निकालाकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे.

राज्यात सर्व विद्यापीठांत भरती प्रक्रिया बंद आहे. मात्र, एकमेव गोंडवाना विद्यापीठात भरतीला मान्यता मिळाली. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार मराठी, इंग्रजी, गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जनसंवाद, अर्थशास्त्र, व्यवस्थापनाशस्त्र आदी विषयांसाठी सहायक प्राध्यापकांच्या निवडी करायच्या होत्या. पदभरतीच्या जाहिरातीनुसार एससी १, व्हीजे-ए १, एनटी-बी १, एनटी-सी २, एनटी-डी १, एसबीसी १, ओबीसी ९, ईडब्लूएस ३ व खुला ११ अशा जागा होत्या. यासाठी बाराशेपेक्षा अधिक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. जुलै महिन्यात मुलाखती पार पडल्या.

मराठीसाठी उत्तर प्रदेशच्या उमेदवाराची भरती

  • सहायक प्राध्यापक भरतीत पदव्युत्तर अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ असलेल्या उच्चविद्याविभूषित चार उमेदवार होते; परंतु, त्यापैकी एकालाही रुजू होण्याबाबत मेल आला नाही.
  • विशेष म्हणजे, मराठी विषयासाठी निवड केलेला एक उमेदवार मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, त्यामुळे उमेदवारांमध्ये शंका- कुशंका निर्माण झाल्या आहेत.
  • तब्बल दोन महिन्यांनी निवड समितीने निवडलेल्या उमेदवारांना थेट मेल पाठवून बोलावले व रुजू करून घेतले. मात्र, भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याबाबत कोणतीही सूचना संकेतस्थळावर दिली नाही, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. 

विषयतज्ज्ञ म्हणतात, विद्यापीठालाच विचारा

यासंदर्भात दोन विषयतज्ज्ञांना संपर्क केला असता एका तज्ज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर विषयतज्ज्ञांनी गुण दिलेले उमेदवार रुजू करून घेतले नाही, मग आणखी वेगळे निकष लावून गुणांकन केले असेल तर माहीत नाही, विद्यापीठालाच विचारा, असे उत्तर दिले. दुसरे विषयतज्ज्ञ म्हणाले, अंतिम निवड कोणाची केली, हे मला माहिती नाही, आम्ही फक्त योग्य ते गुणांकन केले.

उमेदवार म्हणतात...

मराठी विषयासाठी मी मुलाखत दिली होती. विषयतज्ज्ञांनी मला क्रमांक एकचे गुणांकन दिले होते; परंतु, मला मेल आला नाही. कोणी तरी दुसरेच रुजू झाल्याचे कळाल्यावर मला तर धक्काच बसला.

- एक उमेदवार

जनसंवादसाठी माझी मुलाखत चांगली झाली होती. तज्ज्ञांनी चांगले गुण दिले होते. मला ना मेल आला ना कॉल, त्यामुळे आश्चर्य वाटले. भरती पारदर्शक आहे तर निकाल जाहीर करणे अपेक्षित होते.

- एक उमेदवार

ज्यांची निवड झाली त्यांना नाही तर कोणाला मेल पाठवायचे होते. विद्यापीठ अनुदान आयोगाने निवड यादी लावणे बंधनकारक केलेले नाही. विषय तज्ज्ञांनी गुणांकन केल्यानंतर आणखी वेगळे निकष लावले किंवा नाही, याबाबत मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही.

- डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ

टॅग्स :Educationशिक्षणProfessorप्राध्यापकuniversityविद्यापीठGadchiroliगडचिरोली