शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार; प्राध्यापक भरती गाजावाजा करून अन् निवड मात्र मेल पाठवून!

By संजय तिपाले | Updated: September 29, 2023 11:22 IST

उमेदवारांमध्ये संभ्रम : निकालाकडे डोळे लावून बसलेल्यांचा हिरमोड

संजय तिपाले

गडचिरोली : येथील गाेंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या ३० जागांसाठी भरती प्रक्रिया झाली; परंतु, निवड झालेल्यांना थेट मेल पाठवून गुड न्यूज देण्यात आली. निकाल जाहीर झाल्यावर विद्यापीठाने नोटिफिकेश न काढल्याने इतर उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया जाहिरात देऊन केली; पण रुजू करून घेताना बाळगलेल्या गोपनीयतेमुळे निकालाकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे.

राज्यात सर्व विद्यापीठांत भरती प्रक्रिया बंद आहे. मात्र, एकमेव गोंडवाना विद्यापीठात भरतीला मान्यता मिळाली. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार मराठी, इंग्रजी, गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जनसंवाद, अर्थशास्त्र, व्यवस्थापनाशस्त्र आदी विषयांसाठी सहायक प्राध्यापकांच्या निवडी करायच्या होत्या. पदभरतीच्या जाहिरातीनुसार एससी १, व्हीजे-ए १, एनटी-बी १, एनटी-सी २, एनटी-डी १, एसबीसी १, ओबीसी ९, ईडब्लूएस ३ व खुला ११ अशा जागा होत्या. यासाठी बाराशेपेक्षा अधिक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. जुलै महिन्यात मुलाखती पार पडल्या.

मराठीसाठी उत्तर प्रदेशच्या उमेदवाराची भरती

  • सहायक प्राध्यापक भरतीत पदव्युत्तर अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ असलेल्या उच्चविद्याविभूषित चार उमेदवार होते; परंतु, त्यापैकी एकालाही रुजू होण्याबाबत मेल आला नाही.
  • विशेष म्हणजे, मराठी विषयासाठी निवड केलेला एक उमेदवार मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, त्यामुळे उमेदवारांमध्ये शंका- कुशंका निर्माण झाल्या आहेत.
  • तब्बल दोन महिन्यांनी निवड समितीने निवडलेल्या उमेदवारांना थेट मेल पाठवून बोलावले व रुजू करून घेतले. मात्र, भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याबाबत कोणतीही सूचना संकेतस्थळावर दिली नाही, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. 

विषयतज्ज्ञ म्हणतात, विद्यापीठालाच विचारा

यासंदर्भात दोन विषयतज्ज्ञांना संपर्क केला असता एका तज्ज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर विषयतज्ज्ञांनी गुण दिलेले उमेदवार रुजू करून घेतले नाही, मग आणखी वेगळे निकष लावून गुणांकन केले असेल तर माहीत नाही, विद्यापीठालाच विचारा, असे उत्तर दिले. दुसरे विषयतज्ज्ञ म्हणाले, अंतिम निवड कोणाची केली, हे मला माहिती नाही, आम्ही फक्त योग्य ते गुणांकन केले.

उमेदवार म्हणतात...

मराठी विषयासाठी मी मुलाखत दिली होती. विषयतज्ज्ञांनी मला क्रमांक एकचे गुणांकन दिले होते; परंतु, मला मेल आला नाही. कोणी तरी दुसरेच रुजू झाल्याचे कळाल्यावर मला तर धक्काच बसला.

- एक उमेदवार

जनसंवादसाठी माझी मुलाखत चांगली झाली होती. तज्ज्ञांनी चांगले गुण दिले होते. मला ना मेल आला ना कॉल, त्यामुळे आश्चर्य वाटले. भरती पारदर्शक आहे तर निकाल जाहीर करणे अपेक्षित होते.

- एक उमेदवार

ज्यांची निवड झाली त्यांना नाही तर कोणाला मेल पाठवायचे होते. विद्यापीठ अनुदान आयोगाने निवड यादी लावणे बंधनकारक केलेले नाही. विषय तज्ज्ञांनी गुणांकन केल्यानंतर आणखी वेगळे निकष लावले किंवा नाही, याबाबत मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही.

- डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ

टॅग्स :Educationशिक्षणProfessorप्राध्यापकuniversityविद्यापीठGadchiroliगडचिरोली