शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:10 IST

गडचिरोली जिल्ह्यातील २५ ते ३० महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये फिरून पूरग्रस्तांसाठी कपडे, भांडी व इतर शैक्षणिक तसेच औषधासाठा सुद्धा गोळा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ वर महाविद्यालयाच्या रासेया स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा केले व हे साहित्य गोंडवाना विद्यापीठात अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देगोंडवाना विद्यापीठाचा पुढाकार : दोन ट्रक साहित्याचे संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह मुंबईच्या काही भागात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी पूरग्रस्तांचे जीवन प्रभावित झाले. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला. दरम्यान ६७ महाविद्यालयाच्या सहकार्याने कपडे, भांडी, धान्य व इतर प्रकारचे मिळून जवळपास दोन ट्रक साहित्य विद्यापीठाच्या इमारतीत गोळा झाले आहे.राष्टीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.साळुंखे यांनी सोलापूर, सांगली व तत्सम भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावा, असे निर्देश १३ आॅगस्ट रोजी दिले. त्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित ज्या महाविद्यालयामध्ये राष्टीय सेवा योजनेचे पथक सक्रीय आहे, अशा महाविद्यालयांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सूचना करण्यात आली. त्यानंतर १४ आॅगस्टपासून महाविद्यालयस्तरावर तालुकास्तर व गावागावात पूरग्रस्तांसाठी साहित्य गोळा करण्याचे काम सुरू झाले. काही महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी मदतनिधी गोळा केला. या मदतनिधीतून महाविद्यालयाने पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली व हे साहित्य गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात पोहोचविले.गडचिरोली जिल्ह्यातील २५ ते ३० महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये फिरून पूरग्रस्तांसाठी कपडे, भांडी व इतर शैक्षणिक तसेच औषधासाठा सुद्धा गोळा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ वर महाविद्यालयाच्या रासेया स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा केले व हे साहित्य गोंडवाना विद्यापीठात अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.रासेयो स्वयसेवकांनी संकलित केलेल्या साहित्यांमध्ये चादर, ब्लकेट, दरी, बेडशिट, साडी, पॅन्ट, टी-शर्ट तसेच महिला व पुरूषांसाठी अंतरवस्त्र, सलवार सूट, धोती, सॅनेटरी पॅड आदींचा समावेश आहे.याशिवाय गहू, तांदूळ, डाळ, पीठ, तिखट, हळद, मसाला पदार्थ एकूणच स्वयंपाकासाठी लागणाºया सर्व वस्तू जमा करण्यात आले आहेत. तसेच बिस्किट, साखर, तेल, साबून आदींसह इतर किराणा वस्तू, औषधसाठा आदींचा समावेश आहे. तसेच काही महाविद्यालयांनी स्कूल बॅग, वॉटर बॅग, बॉटल व इतर शैक्षणिक साहित्यही गोळा केले.कोल्हापूर व भामरागडातील पूरग्रस्तांना पोहोचविणार साहित्यमहाविद्यालयस्तरावरून संकलित झालेले साहित्य सध्या वेगवेगळे करण्याचे काम विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. हे साहित्य पूरग्रस्त कुटुंबासाठी पिशव्यांमध्ये व्यवस्थितरित्या पॅक केले जात आहे. जवळपास दोन ट्रक साहित्य विद्यापीठाकडे जमा झाले असून यातील अर्धे साहित्य गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड भागातील पूरग्रस्तांना पोहोचविण्यात येणार आहे. उर्वरित अर्धे साहित्य कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. लवकरच वाहनाने हे साहित्य रवाना होणार आहे.साहित्याने सभागृह व व्हरांडा फुल्लगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयामार्फत प्राचार्यांच्या मार्गदर्शनात वाहनाने पूरग्रस्तांसाठी वितरित करावयाचे साहित्य गोंडवाना विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आले. विद्यापीठातील सभागृह, वºहांडा तसेच कुलसचिवांच्या कक्षासमोरील भागात सर्व साहित्य ठेवण्यात आले आहे. सर्वत्र साहित्य दिसून येत आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर