शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:10 IST

गडचिरोली जिल्ह्यातील २५ ते ३० महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये फिरून पूरग्रस्तांसाठी कपडे, भांडी व इतर शैक्षणिक तसेच औषधासाठा सुद्धा गोळा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ वर महाविद्यालयाच्या रासेया स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा केले व हे साहित्य गोंडवाना विद्यापीठात अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देगोंडवाना विद्यापीठाचा पुढाकार : दोन ट्रक साहित्याचे संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह मुंबईच्या काही भागात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी पूरग्रस्तांचे जीवन प्रभावित झाले. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला. दरम्यान ६७ महाविद्यालयाच्या सहकार्याने कपडे, भांडी, धान्य व इतर प्रकारचे मिळून जवळपास दोन ट्रक साहित्य विद्यापीठाच्या इमारतीत गोळा झाले आहे.राष्टीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.साळुंखे यांनी सोलापूर, सांगली व तत्सम भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावा, असे निर्देश १३ आॅगस्ट रोजी दिले. त्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित ज्या महाविद्यालयामध्ये राष्टीय सेवा योजनेचे पथक सक्रीय आहे, अशा महाविद्यालयांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सूचना करण्यात आली. त्यानंतर १४ आॅगस्टपासून महाविद्यालयस्तरावर तालुकास्तर व गावागावात पूरग्रस्तांसाठी साहित्य गोळा करण्याचे काम सुरू झाले. काही महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी मदतनिधी गोळा केला. या मदतनिधीतून महाविद्यालयाने पूरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्याची खरेदी केली व हे साहित्य गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात पोहोचविले.गडचिरोली जिल्ह्यातील २५ ते ३० महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील गावांमध्ये फिरून पूरग्रस्तांसाठी कपडे, भांडी व इतर शैक्षणिक तसेच औषधासाठा सुद्धा गोळा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ वर महाविद्यालयाच्या रासेया स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा केले व हे साहित्य गोंडवाना विद्यापीठात अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.रासेयो स्वयसेवकांनी संकलित केलेल्या साहित्यांमध्ये चादर, ब्लकेट, दरी, बेडशिट, साडी, पॅन्ट, टी-शर्ट तसेच महिला व पुरूषांसाठी अंतरवस्त्र, सलवार सूट, धोती, सॅनेटरी पॅड आदींचा समावेश आहे.याशिवाय गहू, तांदूळ, डाळ, पीठ, तिखट, हळद, मसाला पदार्थ एकूणच स्वयंपाकासाठी लागणाºया सर्व वस्तू जमा करण्यात आले आहेत. तसेच बिस्किट, साखर, तेल, साबून आदींसह इतर किराणा वस्तू, औषधसाठा आदींचा समावेश आहे. तसेच काही महाविद्यालयांनी स्कूल बॅग, वॉटर बॅग, बॉटल व इतर शैक्षणिक साहित्यही गोळा केले.कोल्हापूर व भामरागडातील पूरग्रस्तांना पोहोचविणार साहित्यमहाविद्यालयस्तरावरून संकलित झालेले साहित्य सध्या वेगवेगळे करण्याचे काम विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. हे साहित्य पूरग्रस्त कुटुंबासाठी पिशव्यांमध्ये व्यवस्थितरित्या पॅक केले जात आहे. जवळपास दोन ट्रक साहित्य विद्यापीठाकडे जमा झाले असून यातील अर्धे साहित्य गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड भागातील पूरग्रस्तांना पोहोचविण्यात येणार आहे. उर्वरित अर्धे साहित्य कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. लवकरच वाहनाने हे साहित्य रवाना होणार आहे.साहित्याने सभागृह व व्हरांडा फुल्लगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयामार्फत प्राचार्यांच्या मार्गदर्शनात वाहनाने पूरग्रस्तांसाठी वितरित करावयाचे साहित्य गोंडवाना विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आले. विद्यापीठातील सभागृह, वºहांडा तसेच कुलसचिवांच्या कक्षासमोरील भागात सर्व साहित्य ठेवण्यात आले आहे. सर्वत्र साहित्य दिसून येत आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर