शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:34 IST

यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते.

ठळक मुद्देमहिनाभरापासून संततधार : सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वसाधारणपणे १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २५ ऑगस्टपर्यंत १०९२.८ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८०.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचे सहा दिवस व पूर्ण सप्टेंबर महिना शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अपवाद वगळता ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक दिवशी पाऊस झाला. या महिन्यात तब्बल ५३२.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत सुमारे १५२ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते. जवळपास ८ ते १० दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली.जुलै महिन्यातही चांगलाच पाऊस पडला. जून, जुलै महिन्यात ७०२.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ५६० मिमी पाऊस पडला होता. म्हणजेच सर्वसाधारणच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाला. मात्र ही कसर ऑगस्ट महिन्यातील पावसाने भरून काढली.आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला. प्रत्येक दिवशी पाऊस येत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण ३५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. यावर्षी मात्र या महिन्यात ५३२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत यावर्षी सुमारे १५१.८ मिमी पाऊस पडला आहे.ऑगस्टमध्ये ५३३ मिमी पाऊसऑगस्ट महिन्यात अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस झाला. १ ते २५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरातील ५३२.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. या महिन्यात सर्वसाधारपणे ५५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. अपेक्षित पावसाच्या १५१.८ टक्के पाऊस झाला आहे.सततच्या पावसाने नागरिक त्रस्तऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरूवातीपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील तलाव अर्धेही भरले नसल्याची ओरड आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाचा परिणाम पिकांवर होत आहे. ऊन निघत नसल्याने धान पिकाची वाढ खुंटली आहे. तर कपाशी, सोयाबिन, तूर पिकांच्या शेतामध्ये पाणी साचली असल्याने या पिकांची तर वाट लागली आहे. या पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. मागील वर्षी सुध्दा कापसाचे उत्पादन झाले नव्हते. यावर्षी सुध्दा कापूस दगा देणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

टॅग्स :Rainपाऊस