शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:34 IST

यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते.

ठळक मुद्देमहिनाभरापासून संततधार : सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वसाधारणपणे १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २५ ऑगस्टपर्यंत १०९२.८ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८०.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचे सहा दिवस व पूर्ण सप्टेंबर महिना शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अपवाद वगळता ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक दिवशी पाऊस झाला. या महिन्यात तब्बल ५३२.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत सुमारे १५२ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते. जवळपास ८ ते १० दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली.जुलै महिन्यातही चांगलाच पाऊस पडला. जून, जुलै महिन्यात ७०२.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ५६० मिमी पाऊस पडला होता. म्हणजेच सर्वसाधारणच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाला. मात्र ही कसर ऑगस्ट महिन्यातील पावसाने भरून काढली.आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला. प्रत्येक दिवशी पाऊस येत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण ३५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. यावर्षी मात्र या महिन्यात ५३२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत यावर्षी सुमारे १५१.८ मिमी पाऊस पडला आहे.ऑगस्टमध्ये ५३३ मिमी पाऊसऑगस्ट महिन्यात अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस झाला. १ ते २५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरातील ५३२.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. या महिन्यात सर्वसाधारपणे ५५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. अपेक्षित पावसाच्या १५१.८ टक्के पाऊस झाला आहे.सततच्या पावसाने नागरिक त्रस्तऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरूवातीपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील तलाव अर्धेही भरले नसल्याची ओरड आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाचा परिणाम पिकांवर होत आहे. ऊन निघत नसल्याने धान पिकाची वाढ खुंटली आहे. तर कपाशी, सोयाबिन, तूर पिकांच्या शेतामध्ये पाणी साचली असल्याने या पिकांची तर वाट लागली आहे. या पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. मागील वर्षी सुध्दा कापसाचे उत्पादन झाले नव्हते. यावर्षी सुध्दा कापूस दगा देणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

टॅग्स :Rainपाऊस