शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:34 IST

यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते.

ठळक मुद्देमहिनाभरापासून संततधार : सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वसाधारणपणे १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २५ ऑगस्टपर्यंत १०९२.८ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८०.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचे सहा दिवस व पूर्ण सप्टेंबर महिना शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अपवाद वगळता ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक दिवशी पाऊस झाला. या महिन्यात तब्बल ५३२.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत सुमारे १५२ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते. जवळपास ८ ते १० दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली.जुलै महिन्यातही चांगलाच पाऊस पडला. जून, जुलै महिन्यात ७०२.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ५६० मिमी पाऊस पडला होता. म्हणजेच सर्वसाधारणच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाला. मात्र ही कसर ऑगस्ट महिन्यातील पावसाने भरून काढली.आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला. प्रत्येक दिवशी पाऊस येत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण ३५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. यावर्षी मात्र या महिन्यात ५३२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत यावर्षी सुमारे १५१.८ मिमी पाऊस पडला आहे.ऑगस्टमध्ये ५३३ मिमी पाऊसऑगस्ट महिन्यात अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस झाला. १ ते २५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरातील ५३२.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. या महिन्यात सर्वसाधारपणे ५५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. अपेक्षित पावसाच्या १५१.८ टक्के पाऊस झाला आहे.सततच्या पावसाने नागरिक त्रस्तऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरूवातीपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील तलाव अर्धेही भरले नसल्याची ओरड आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाचा परिणाम पिकांवर होत आहे. ऊन निघत नसल्याने धान पिकाची वाढ खुंटली आहे. तर कपाशी, सोयाबिन, तूर पिकांच्या शेतामध्ये पाणी साचली असल्याने या पिकांची तर वाट लागली आहे. या पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. मागील वर्षी सुध्दा कापसाचे उत्पादन झाले नव्हते. यावर्षी सुध्दा कापूस दगा देणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

टॅग्स :Rainपाऊस