शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
3
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
4
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
5
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
6
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
7
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
8
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
9
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
10
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
11
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
12
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
13
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
14
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
15
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
16
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
17
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
18
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
19
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
20
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

१३ हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:10 IST

नोव्हेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण रबी क्षेत्राच्या केवळ ५२ टक्के क्षेत्रावरच अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. पेरणीची कामे सुरू असल्याने पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे२५ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी : धान कापणीनंतर मशागतीच्या कामांना आला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नोव्हेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण रबी क्षेत्राच्या केवळ ५२ टक्के क्षेत्रावरच अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. पेरणीची कामे सुरू असल्याने पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. या पिकाची प्रामुख्याने खरीप हंगामात लागवड केली जाते. सुमारे २ लाख हेक्टरवर धानपीक घेतले जाते. धान पिकानंतर काही शेतकरी रबी पिकांचीही पेरणी करतात. काही शेतकऱ्यांकडे रबीसाठी स्वतंत्र शेतजमीन आहे. तर काही शेतकरी धान निघाल्यावर त्याच शेतात रबी पिकांची लागवड करतात. धान कापणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता त्याच बांधीत रबी पिकांची पेरणी करण्याच्या उद्देशाने जमिनीची मशागत करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, रबी पिकांचे उत्पादन कमी असले तरी यावर खर्चही कमी असल्याने काही शेतकरी रबी पिकांची पेरणी करण्यास प्राधान्य देतात. रबी पिकांना पाण्याची गरज पडत नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यत जमिनीत राहत असलेल्या ओलाव्याच्या भरवशावर सदर पिके टिकतात.रबी पिकांमध्ये प्रामुख्याने शेतकरी गहू, मका, हरभरा, लाखोळी, मूग, उडीद, बरबटी, कुळता, वाल, पोपट, जवस, रबी तिळ, भूईमूग या पिकांची लागवड करतात. पूर्वी शेतकरी उडीद, मूग, बरबटी, कुळता या पिकांची लागवड करीत होते. आता मात्र शेतकरी नगदी पिकांकडे वळत चालला आहे.ज्या धान्याला बाजारपेठेत अधिक भाव मिळते व तुलनेने अधिक उत्पादन होते. अशा पिकांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच गहू, हरभरा, भूईमूग यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.रबी पिकांसाठी विहिरी ठरल्या वरदानजिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता मोठा सिंचन प्रकल्प नाही. याही प्रकल्पाचे पाणी केवळ खरीप हंगामासाठीच सोडले जाते. रबीमध्ये या प्रकल्पाचा काहीच फायदा नाही. तलाव, बोड्या, डिसेंबर महिन्यातच आटतात. त्यामुळे रबी पिकांना त्यांचाही फायदा होत नाही. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकºयांना सिंचन विहिरी देण्यात आल्या आहेत. काही शेतकºयांनी स्वत:हून बोअरवेल खोदले आहेत. यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकण्यापेक्षा रबी पिकांची लागवड करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहे.पाच हजार हेक्टरवर लाखोळीचे पीकलाखोळी हे अतिशय कमी खर्चात येणारे पीक आहे. धान कापणीच्या १५ दिवसांपूर्वी लाखोळीचे बियाणे धानाच्या बांधीत शिंपडली जातात. धानाची कापणी झाल्यानंतर लाखोळीच्या पिकाची वाढ होते. या पिकाला सिंचन, खत, कीटकनाशके आदींची गरज पडत नाही. त्यामुळे या पिकाच्या लागवडीचा खर्च अतिशय नगण्य आहे. केवळ पिकाची कापणी व मळणीचा खर्च येतो. त्यामुळे या पिकाची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ५ हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात २४ हजार ९५५ हेक्टर रबीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये ज्वारी २६५ हेक्टर, गहू १९८, मका ७५५, हरभरा १ हजार ६०८, लाखोळी ५ हजार २४२, मूग ८६९, उडीद ८९६, बरबटी ४२४, कुळता ४८२, चवळी १०८, पोपट ६६७, जवस ४७०, भूईमूगाची ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पेरणीची कामे सुरूच असून त्यामुळे पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.