शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार हेक्टरवर रबीची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:10 IST

नोव्हेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण रबी क्षेत्राच्या केवळ ५२ टक्के क्षेत्रावरच अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. पेरणीची कामे सुरू असल्याने पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे२५ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी : धान कापणीनंतर मशागतीच्या कामांना आला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नोव्हेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यापर्यंत जिल्हाभरात १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची पेरणी झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण रबी क्षेत्राच्या केवळ ५२ टक्के क्षेत्रावरच अजूनपर्यंत पेरणी झाली आहे. पेरणीची कामे सुरू असल्याने पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. या पिकाची प्रामुख्याने खरीप हंगामात लागवड केली जाते. सुमारे २ लाख हेक्टरवर धानपीक घेतले जाते. धान पिकानंतर काही शेतकरी रबी पिकांचीही पेरणी करतात. काही शेतकऱ्यांकडे रबीसाठी स्वतंत्र शेतजमीन आहे. तर काही शेतकरी धान निघाल्यावर त्याच शेतात रबी पिकांची लागवड करतात. धान कापणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता त्याच बांधीत रबी पिकांची पेरणी करण्याच्या उद्देशाने जमिनीची मशागत करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, रबी पिकांचे उत्पादन कमी असले तरी यावर खर्चही कमी असल्याने काही शेतकरी रबी पिकांची पेरणी करण्यास प्राधान्य देतात. रबी पिकांना पाण्याची गरज पडत नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यत जमिनीत राहत असलेल्या ओलाव्याच्या भरवशावर सदर पिके टिकतात.रबी पिकांमध्ये प्रामुख्याने शेतकरी गहू, मका, हरभरा, लाखोळी, मूग, उडीद, बरबटी, कुळता, वाल, पोपट, जवस, रबी तिळ, भूईमूग या पिकांची लागवड करतात. पूर्वी शेतकरी उडीद, मूग, बरबटी, कुळता या पिकांची लागवड करीत होते. आता मात्र शेतकरी नगदी पिकांकडे वळत चालला आहे.ज्या धान्याला बाजारपेठेत अधिक भाव मिळते व तुलनेने अधिक उत्पादन होते. अशा पिकांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच गहू, हरभरा, भूईमूग यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.रबी पिकांसाठी विहिरी ठरल्या वरदानजिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता मोठा सिंचन प्रकल्प नाही. याही प्रकल्पाचे पाणी केवळ खरीप हंगामासाठीच सोडले जाते. रबीमध्ये या प्रकल्पाचा काहीच फायदा नाही. तलाव, बोड्या, डिसेंबर महिन्यातच आटतात. त्यामुळे रबी पिकांना त्यांचाही फायदा होत नाही. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकºयांना सिंचन विहिरी देण्यात आल्या आहेत. काही शेतकºयांनी स्वत:हून बोअरवेल खोदले आहेत. यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकण्यापेक्षा रबी पिकांची लागवड करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहे.पाच हजार हेक्टरवर लाखोळीचे पीकलाखोळी हे अतिशय कमी खर्चात येणारे पीक आहे. धान कापणीच्या १५ दिवसांपूर्वी लाखोळीचे बियाणे धानाच्या बांधीत शिंपडली जातात. धानाची कापणी झाल्यानंतर लाखोळीच्या पिकाची वाढ होते. या पिकाला सिंचन, खत, कीटकनाशके आदींची गरज पडत नाही. त्यामुळे या पिकाच्या लागवडीचा खर्च अतिशय नगण्य आहे. केवळ पिकाची कापणी व मळणीचा खर्च येतो. त्यामुळे या पिकाची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ५ हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात २४ हजार ९५५ हेक्टर रबीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये ज्वारी २६५ हेक्टर, गहू १९८, मका ७५५, हरभरा १ हजार ६०८, लाखोळी ५ हजार २४२, मूग ८६९, उडीद ८९६, बरबटी ४२४, कुळता ४८२, चवळी १०८, पोपट ६६७, जवस ४७०, भूईमूगाची ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पेरणीची कामे सुरूच असून त्यामुळे पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे.