सिराज पठान ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : शासनाने तत्त्वत: मंजुरी देऊनही जाचक व अव्यवहारीक अटी, शर्तीमुळे कुरखेडा तालुक्यासह लगतच्या चार जिल्ह्यातील मजुरांना रोजगाराची मोठी संधी निर्माण करणाऱ्या तेंदूपत्ता संकलन हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तेंदूपत्ता हंगाम मुख्यत: मे महिन्यात असतो. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथील मजुरांना रोजगार उपलब्ध होते. मात्र लाखो मजुरांना रोजगार पुरविणाऱ्या या हंगामाला यावर्षी ‘कोरोना’चे ग्रहण लागले आहे. सदर हंगामासाठी शासनाने मंजुरी दिली असली तरी सर्वप्रथम लिलाव प्रक्रिया राबवावी लागते. मात्र प्रशासनाकडून ग्रामसभांना मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. अगदी कमी कालावधी शिल्लक असल्याने ही प्रक्रिया गतीमान करणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. आंतरजिल्हा प्रवासबंदी, फिजिकल डिस्टन्ससह अनेक मर्यादा नागरिकांच्या व्यवहारावर लावण्यात आले आहे.तेंदूपत्ता संकलन हंगामात शासन व प्रशासनाच्या कोरोना खबरदारीबाबतच्या सर्व सूचनांचे पालन करावे लागणार आहे. तसा दंडकही घालण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात तेंदूसंकलन हंगाम राबविताना या सूचनेचे पालन करणे कंत्राटदारांना कठीण होणार आहे. सदर हंगामात कुशल मजुरांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र लॉकडाऊनमुळे जिल्ह्याबाहेरील कुशल मजूर गडचिरोली जिल्ह्यात येऊ शकणार नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करणे कठीण होणार आहे. पेट्रोल, डिझेल विक्रीवर बंधन आल्याने कंत्राटदारांना तेंदूपुड्यांची वाहतूक करण्यासाठी अडचण जाणार आहे.सहा महिन्यांचे आर्थिक बजेट बिघडणारकमी दिवसात अधिकाधिक पैसा मिळवून देणारा हंगाम म्हणजे तेंदूसंकलन हंगाम होय. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर तेंदूसंकलनाच्या कामातून बºयापैकी मजुरी मिळवितात. या मजुरीच्या रकमेतून पावसाळ्यातील पुढील पाच ते सहा महिन्यांचे आर्थिक बजेट निश्चित होत असते. मात्र यंदा तेंदूसंकलनाचा हंगाम धोक्यात आल्याने मजूर कुटुंबांचे सहा महिन्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
तेंदूपत्ता संकलन हंगामावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST
तेंदूपत्ता हंगाम मुख्यत: मे महिन्यात असतो. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथील मजुरांना रोजगार उपलब्ध होते. मात्र लाखो मजुरांना रोजगार पुरविणाऱ्या या हंगामाला यावर्षी ‘कोरोना’चे ग्रहण लागले आहे. सदर हंगामासाठी शासनाने मंजुरी दिली असली तरी सर्वप्रथम लिलाव प्रक्रिया राबवावी लागते. मात्र प्रशासनाकडून ग्रामसभांना मार्गदर्शक सूचना मिळालेल्या नाहीत. अगदी कमी कालावधी शिल्लक असल्याने ही प्रक्रिया गतीमान करणे गरजेचे आहे.
तेंदूपत्ता संकलन हंगामावर प्रश्नचिन्ह
ठळक मुद्देमजुरांसह कंत्राटदारांचीही अडचण : जाचक अटी व शर्तीमुळे संकलन करणे कठीण