शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

व्यापाऱ्यांसाठीच सध्या धान खरेदी

By admin | Updated: June 25, 2014 23:46 IST

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी धानाची विक्री व्यापारांना केल्यानंतर यंदा महामंडळाची धान खरेदी सुरू झाली़ शेतकऱ्यांनी कमी भावात धानाची विक्री केली आहे़ मात्र शेतकऱ्यांंकडून धान खरेदी

देसाईगंज : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी धानाची विक्री व्यापारांना केल्यानंतर यंदा महामंडळाची धान खरेदी सुरू झाली़ शेतकऱ्यांनी कमी भावात धानाची विक्री केली आहे़ मात्र शेतकऱ्यांंकडून धान खरेदी केल्यानंतर त्याच धानाची विक्री जादा भावाने वखार महामंडळामार्फत केली जाते़ यामुळे शासन व्यापारांसाठी धान खरेदी केन्द्र सुरू करते की शेतकऱ्यांसाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ ‘नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे या वर्षी देखील शासनाने वखार महामंडळामार्फत होणारी धान खरेदी केंद्र धानपीक निघाल्यानंतर फार उशिराने सुरू करण्यात आली. या धान खरेदी केंद्राचा खरा लाभ धान व्यापारी घेत आहेत़ रब्बीचे पिक निघाल्यानंतर त्या धानाची विक्री करून येणाऱ्या रक्कमेतून खरीपाच्या पिकांची तयारी करावी लागते़ त्यामूळे धान पीकनिघताच त्याची विक्री शेतकरी करीत असतात़ धान विक्रीतून शेतकऱ्यांना शासनातर्फे जादा हमी भावाने वखार मंडळाकडे धानाची विक्री करून नफा मिळवू शकते़ मात्र मागिल काही वर्षापासून पीक हाती आल्यावर दोन महिन्यानंतर महामंडळाचे धान खरेदी केंद्र्र सूरू होत आहेत़ याचा खरा फायदा धान खरेदी व्यापारांना मिळत आहे़ यावर्षी व्यापाऱ्यांनी १ हजार १६० रूपये धानाला भाव दिला आहे़ तर त्याच धानाला वखार महामंडळाने दोन महिन्यानंतर केंद्र सूरू होताच १ हजार ३०० भाव दिला आहे़ व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी भावाने धान खरेदी करतात़ त्या धानाची साठवणूक करून वखार महामंडळामार्फत खरेदी केंद्र सूरू होताच त्या धानाची जादा भावाने विक्री करतात़ मात्र अंग मेहनत करून पिके काढणाऱ्या बळीराजाला नुकसान सहन करावी लागते.़ शासनाकडे वारंवार पाठपूरावा करूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन कानाडोळा करीत आहे़ धान व्यापारी व वखार महामंडळ यांचे साटेलोटे असल्यामुळेच शासन केवळ व्यापारांचे हित जोपासत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत़ लगतच्या जिल्ह्यात अगदी वेळेवर धान खरेदी केंद्र सुरू होत असतांना गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी केंद्र उशिरा सुरू होते.(प्रतिनिधी)