शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नान्ही व आंधळीतील धान खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:13 AM

धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे.

ठळक मुद्देसाठवणूक क्षमता संपली : धानाची उचलच नाही; अवकाळी पाऊस आल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली असून खरेदी केलेल्या मालाची तत्काळ उचल करून गोदाम रिकामा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.उघड्यावर धान ठेवल्याने वेळेवर पाऊस आल्यास धान भिजून मोठ्या प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाचे यापूर्वी नुकसान झाले आहे. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी ज्या संस्थेकडे धान साठवणूक करण्यासाठी गोदामाची व्यवस्था आहे किंवा संस्थेच्या प्रांगणात ओट्याचे बांधकाम केले आहे. अशा संस्थांनाच धान खरेदीची परवानगी दिली आहे.नान्ही व आंधळी येथील संस्थांकडे गोदाम उपलब्ध नाही. त्यामुळे या संस्थांनी ओट्याचे बांधकाम करून खरेदी सुरू केली. दोन्ही संस्थांनी प्रत्येकी जवळपास पाच हजार क्विंटल धान खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने भरडाईसाठी उचल केली नाही. त्यामुळे सदर धान खरेदी केंद्राच्या आवारातच ताडपत्री झाकून पडून आहे. ओट्याचीही साठवणूक क्षमता संपल्याने धान खरेदी करू नये, अशा सूूचना आदिवासी विकास महामंडळाने संस्थेला दिल्या असल्याने या सूचनांनुसार संस्थेने मागील आठवडाभरापासून धान खरेदी बंद पडली आहे. शेतकऱ्यांच्या धानाची मळणी पूर्ण झाली आहे. खरीपासाठी घेतलेले कर्ज मार्च महिन्याच्यापूर्वी परत करावे लागणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धान आणण्यास सुरूवात केली आहे. मात्र धान खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे धान वजन न करताच ठेवले जात आहे. वेळेवर पाऊस आल्यास धानाची मोठी नासाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी आहे.हजारो क्विंटल धान उघड्यावरगोदाम नसल्याने नान्ही व आंधळी या दोन्ही संस्थांनी धान खरेदी आठवडाभरापासून बंद ठेवली आहे. मात्र याची माहिती ग्रामीण भागातील शेतकºयांना नाही. त्यामुळे शेतकरी बैैलबंडीने धान खरेदी केंद्रावर आणत आहेत. मागील आठ दिवसांत हजारो क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. अचानक पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने धानाची उचल करून ओटे मोकळे करून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.