शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मेडीगड्डा प्रकल्पग्रस्तांनी घरांवर लावले काळे झेंडे; मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 14:58 IST

महाराष्ट्र शासनाने तेलंगणा सरकारला जाब विचारून योग्य तो न्याय द्यावा, शेतकऱ्यांची मागणी

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : तेलंगणा सरकारने तीन वर्षांंपूर्वी बनविलेल्या मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींपैकी १३८.९१ हेक्टर शेतजमिनीचे अजूनही अधिग्रहण केले नाही. त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. यासाठी जबाबदार तेलंगणा सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणाचा प्रकल्पग्रस्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध सुरू केला आहे. आरडा या गावातील सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावले आहेत.

सध्या कलम ३७ लागू असल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांना एकत्रितपणे उपोषणाला बसण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे प्रतिनिधिक स्वरूपात चार लोक साखळी उपोषण करीत असून, उर्वरित लोकांनी घरांवर काळे झेंडे लावले आहेत.

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या ३७३.८० हेक्टर शेतजमिनीपैकी तेलंगणा सरकारने २३४.९१ हेक्टर जमीन थेट खरेदी केली. त्यासाठी १०.५० लाख रुपयांप्रमाणे मोबदलाही दिला. पण आता तेलंगणा सरकारने यातून अंग काढून घेतले आहे. पण अशा स्थितीत महाराष्ट्र शासनाने तेलंगणा सरकारला जाब विचारून योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

तेलंगणा सरकारने जमीन अधिग्रहणाचे नियम बदलविल्याचे सांगत पूर्वी दिलेला मोबदला देण्यास नकार दिला आहे. आम्ही त्यांना त्या बदललेल्या नियमांबद्दलचे कागदपत्र मागितले आहे. रेडीरेकनरचे दर वाढवून जमीन खरेदी केली जावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दोन्ही राज्य सरकारांनी ठरविल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळू शकतो.

श्री अंकित, उपविभागीय अधिकारी, अहेरी

टॅग्स :agitationआंदोलनDamधरणGadchiroliगडचिरोली