शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

मेडीगड्डा प्रकल्पग्रस्तांनी घरांवर लावले काळे झेंडे; मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 14:58 IST

महाराष्ट्र शासनाने तेलंगणा सरकारला जाब विचारून योग्य तो न्याय द्यावा, शेतकऱ्यांची मागणी

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : तेलंगणा सरकारने तीन वर्षांंपूर्वी बनविलेल्या मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींपैकी १३८.९१ हेक्टर शेतजमिनीचे अजूनही अधिग्रहण केले नाही. त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. यासाठी जबाबदार तेलंगणा सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणाचा प्रकल्पग्रस्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीने निषेध सुरू केला आहे. आरडा या गावातील सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावले आहेत.

सध्या कलम ३७ लागू असल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांना एकत्रितपणे उपोषणाला बसण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे प्रतिनिधिक स्वरूपात चार लोक साखळी उपोषण करीत असून, उर्वरित लोकांनी घरांवर काळे झेंडे लावले आहेत.

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या ३७३.८० हेक्टर शेतजमिनीपैकी तेलंगणा सरकारने २३४.९१ हेक्टर जमीन थेट खरेदी केली. त्यासाठी १०.५० लाख रुपयांप्रमाणे मोबदलाही दिला. पण आता तेलंगणा सरकारने यातून अंग काढून घेतले आहे. पण अशा स्थितीत महाराष्ट्र शासनाने तेलंगणा सरकारला जाब विचारून योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

तेलंगणा सरकारने जमीन अधिग्रहणाचे नियम बदलविल्याचे सांगत पूर्वी दिलेला मोबदला देण्यास नकार दिला आहे. आम्ही त्यांना त्या बदललेल्या नियमांबद्दलचे कागदपत्र मागितले आहे. रेडीरेकनरचे दर वाढवून जमीन खरेदी केली जावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दोन्ही राज्य सरकारांनी ठरविल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळू शकतो.

श्री अंकित, उपविभागीय अधिकारी, अहेरी

टॅग्स :agitationआंदोलनDamधरणGadchiroliगडचिरोली