शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या देसाईगंजच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

समस्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर मांडली असता धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासन दिले. वनहक्क पट्टेधारकांची ऑनलाईन नाेंदणी होत नसल्याने त्यांनाही धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यातील काही जुने केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र पुन्हा सुरू करावे. परतीच्या पावसाने पीक भिजलेल्या शेतकऱ्यांचेही धान खरेदी करावे, अशी मागणी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देतहसील कार्यालयात बैठक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

  लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी गुरूवारी देसाईगंजला भेट देऊन तहसील कार्यालयात आढावा घेतला. दरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध समस्या उपस्थितांकडून जाणून घेत शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. याप्रसंगी आ. कृष्णा गजबे, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम तसेच तहसीलदार उपस्थित हाेते. बैठकीत आ. गजबे यांनी विविध समस्या मांडल्या. यामध्ये कोरोनाकाळात शेतमालाला याेग्य भाव नाही. उशिरा पाऊस, महापुराने झालेले नुकसान आदींचा समावेश हाेता. प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले असले तरी अघापही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तसेच आदिवासी विकास  महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना धान्य विक्रीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वनहक्कधारक शेतकऱ्यांसमाेर धानविक्रीची समस्या निर्माण झाली आहे. काही शेतकरी खासगी व्यापाऱ्यांनाही धानाची विक्री करीत आहेत.  त्यामुळे ही समस्या साेडवावी, अशी मागणी आ. कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चेदरम्यान केली.

धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासनमागील वर्षी आधारभूत खरेदी याेजनेंतर्गत प्रती एकरी १२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. परंतु यावर्षी प्रती एकरी ९.६० क्विंटल धानाची खरेदी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विक्रीस अडचणी येत आहेत. ही समस्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर मांडली असता धान खरेदीची मर्यादा वाढविण्याचे आश्वासन दिले. वनहक्क पट्टेधारकांची ऑनलाईन नाेंदणी होत नसल्याने त्यांनाही धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यातील काही जुने केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र पुन्हा सुरू करावे. परतीच्या पावसाने पीक भिजलेल्या शेतकऱ्यांचेही धान खरेदी करावे, अशी मागणी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी