शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

४१० ग्रा.पं.चा आराखडा तयार

By admin | Updated: June 24, 2016 01:53 IST

वर्षातील नेमक्या कोणत्या हंगामात कामाची गरज आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नेमके कोणत्या प्रकारचे काम करणे आवश्यक आहे.

प्रत्येक कुटुंबाची माहिती : वर्षभरातील रोहयो कामांचे नियोजन; मागणीनुसार मिळणार कामगडचिरोली : वर्षातील नेमक्या कोणत्या हंगामात कामाची गरज आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नेमके कोणत्या प्रकारचे काम करणे आवश्यक आहे. कोणत्या कामाला प्रथम प्राधान्य देण्यात यावे, याबाबतचा २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विकास आराखडा जिल्हाभरातील ४१० ग्रामपंचायतींनी तयार केला आहे. ग्रामसभेने त्याला मंजुरी प्रदान केली आहे. २०१६-१७ या वर्षातील रोहयोची कामे याच आराखड्यानुसार करण्याचे बंधन ग्रामपंचायतीवर व संबंधित यंत्रणेवर राहणार आहे. त्यामुळे या आराखड्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. मागील सात वर्षांपासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र नागरिकांची कामाची मागणी व प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असलेले काम याबाबत ताळमेळ जोडत नसल्याने काम आहे तेव्हा मजूर मिळत नाही व मजूर रिकामे आहेत. रोहयोचे काम राहत नाही, अशी विपरित परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे नागरिकांना रोजगार मिळण्यास अडचण निर्माण होत होती. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने प्रत्येक गावाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली.ग्रामसेवक, रोहयो विभागाचे तांत्रिक अधिकारी, वन विभाग, सिंचाई विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गावाचा परिसर फिरून गावाच्या सभोवतालची माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष कामाच्या जागेला भेट दिली. त्याबद्दल नागरिकांशी संवाद साधून कामांची यादी तयार केली. या यादीला ग्रामसभेने मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे या कामांची यादी अंतिम मानली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे ४१० ग्रामपंचायतीनी विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर आता नागरिकांच्या मागणीनुसार रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात याच आराखड्यानुसार काम होणार आहे. त्यामुळे कामांची मागणी व उपलब्धता यामध्ये ताळमेळ जोडला जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)ज्या मजुरांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९० दिवसांपेक्षा अधिक रोहयो काम केले आहे. अशा रोहयो मजुरांना त्यांच्या आवडीप्रमाणे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्रशिक्षणानंतर त्याला रोजगार करता यावा यासाठी बँकेकडून कर्ज मिळावे, यासाठीही मदत केली जाणार आहे. रोहयोचा मजूर पुढे चालून रोहयोच्याच कामावर अवलंबून राहता, त्याने स्वत:चा रोजगार करावा व इतरांनाही त्याने रोजगार द्यावा, ही अपेक्षा यामागे आहे.