शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

प्राणहिता पुलाचे काम प्रगतिपथावर

By admin | Updated: February 3, 2017 01:21 IST

अहेरी लगतच्या प्राणहिता नदीवर अहेरी-गुंडेम या मार्गावर आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे.

तेलंगणाच्या आमदारांकडून पाहणी : १३ पिलरचे काम पूर्ण; ६४ कोटींचा खर्च होणारअहेरी : अहेरी लगतच्या प्राणहिता नदीवर अहेरी-गुंडेम या मार्गावर आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सदर बांधकाम प्रगतिपथावर असून तेलंगणा राज्याच्या शिरपूर-कागजनगरचे आ. कोनेरू कोनप्पा यांनी बुधवारी पूल बांधकाम स्थळाला भेट देऊन पाहणी केली. अहेरी-गुंडेम मार्गावरील आंतरराज्यीय पूल मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. पुलाच्या बांधकामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, काम सुरळीत सुरू राहावे व यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नदीतील संपूर्ण २६ पिलर बांधून पूर्ण व्हावे, याकरिता महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता आहे. सदर पूल १ किमी पर्यंत लांब राहणार असून या पुलाच्या बांधकामावर जवळपास ६४ कोटी रूपये खर्च होणार आहे. सध्या तेलंगणा तीराजवळचे १३ पिलरचे काम पूर्णत्त्वास येत आहे. पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्राच्या तीराजवळील १३ पिलरचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न तेलंगणा सरकारच्या वतीने केला जाणार आहे. परंतु या तीरालगत तीन शेतकऱ्यांच्या जमिनी येत असल्याने सदर शेतकऱ्यांना बोलावून आ. कोनप्पा यांनी चर्चा केली. उच्च व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदर पुलाचे बांधकाम होणार आहे. दोन्ही राज्याकडून सध्या सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्च २०१८ पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती आ. कोनप्पा यांनी दिली. पाहणीदरम्यान वांगेपल्ली घाटावर ग्रामस्थांशीही कोनप्पा यांनी चर्चा केली. यावेळी तेलंगणाच्या कवटालाचे पोलीस निरीक्षक अच्छेश्वरराव, वांगेपल्लीचे यशवंत मडावी, जहीर हकीम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)तीन शेतकऱ्यांना मिळणार मोबदलाअहेरी-गुंडेम दरम्यान प्राणहिता नदीवर निर्माणाधीन आंतरराज्यीय पूल २६ पिलरवर उभा राहणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवरील १३ पिलरचे काम मार्गी लागणे बाकी आहे. उर्वरित पिलर उभारण्याकरिता जागा लागणार असून राज्यातील तीन शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलाच्या हद्दीत येणार आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्यांशी तेलंगणा राज्यातील शिरपूर-कागजनगरचे आ. कोनेरू कोनप्पा यांनी चर्चा करून जमिनी वाजवी मोबदल्यात देण्याची मागणी केली. यावेळी शेतकरी बाबुराव सिडाम, राजू सिडाम, मल्लू पानेम यांच्याशी आ. कोनप्पा यांनी चर्चा केली व शेतकऱ्यांना राजी केले. या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला जाईल.