शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

प्राणहिता पुलाचे काम प्रगतिपथावर

By admin | Updated: February 3, 2017 01:21 IST

अहेरी लगतच्या प्राणहिता नदीवर अहेरी-गुंडेम या मार्गावर आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे.

तेलंगणाच्या आमदारांकडून पाहणी : १३ पिलरचे काम पूर्ण; ६४ कोटींचा खर्च होणारअहेरी : अहेरी लगतच्या प्राणहिता नदीवर अहेरी-गुंडेम या मार्गावर आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सदर बांधकाम प्रगतिपथावर असून तेलंगणा राज्याच्या शिरपूर-कागजनगरचे आ. कोनेरू कोनप्पा यांनी बुधवारी पूल बांधकाम स्थळाला भेट देऊन पाहणी केली. अहेरी-गुंडेम मार्गावरील आंतरराज्यीय पूल मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. पुलाच्या बांधकामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, काम सुरळीत सुरू राहावे व यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नदीतील संपूर्ण २६ पिलर बांधून पूर्ण व्हावे, याकरिता महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता आहे. सदर पूल १ किमी पर्यंत लांब राहणार असून या पुलाच्या बांधकामावर जवळपास ६४ कोटी रूपये खर्च होणार आहे. सध्या तेलंगणा तीराजवळचे १३ पिलरचे काम पूर्णत्त्वास येत आहे. पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्राच्या तीराजवळील १३ पिलरचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न तेलंगणा सरकारच्या वतीने केला जाणार आहे. परंतु या तीरालगत तीन शेतकऱ्यांच्या जमिनी येत असल्याने सदर शेतकऱ्यांना बोलावून आ. कोनप्पा यांनी चर्चा केली. उच्च व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदर पुलाचे बांधकाम होणार आहे. दोन्ही राज्याकडून सध्या सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्च २०१८ पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती आ. कोनप्पा यांनी दिली. पाहणीदरम्यान वांगेपल्ली घाटावर ग्रामस्थांशीही कोनप्पा यांनी चर्चा केली. यावेळी तेलंगणाच्या कवटालाचे पोलीस निरीक्षक अच्छेश्वरराव, वांगेपल्लीचे यशवंत मडावी, जहीर हकीम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)तीन शेतकऱ्यांना मिळणार मोबदलाअहेरी-गुंडेम दरम्यान प्राणहिता नदीवर निर्माणाधीन आंतरराज्यीय पूल २६ पिलरवर उभा राहणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेवरील १३ पिलरचे काम मार्गी लागणे बाकी आहे. उर्वरित पिलर उभारण्याकरिता जागा लागणार असून राज्यातील तीन शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलाच्या हद्दीत येणार आहेत. त्यामुळे सदर शेतकऱ्यांशी तेलंगणा राज्यातील शिरपूर-कागजनगरचे आ. कोनेरू कोनप्पा यांनी चर्चा करून जमिनी वाजवी मोबदल्यात देण्याची मागणी केली. यावेळी शेतकरी बाबुराव सिडाम, राजू सिडाम, मल्लू पानेम यांच्याशी आ. कोनप्पा यांनी चर्चा केली व शेतकऱ्यांना राजी केले. या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला जाईल.