शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

रात्रीच्या सुमारास वीज कर्मचाऱ्यांची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:31 IST

वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवताल वीज तारेचा प्रवाह सोडण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देआकड्यांचा घेत आहेत शोध : अवैध वीज पुरवठा घेणाऱ्यांवर कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवताल वीज तारेचा प्रवाह सोडण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. वीज आकड्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने रात्रीच्या सुमारास जंगल परिसराला लागून असलेल्या शेतांवर गस्त घालण्याची मोहीम मागील पाच दिवसांपासून सुरू केली आहे.जंगलच्या जवळ असलेल्या शेतांचे वन्यजीव मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या वन्यजीवांना शेतात येण्याला प्रतिबंध घालण्यासाठी काही शेतकरी शेताच्या सभोवताल विद्युत प्रवाह सोडून ठेवतात. या विद्युत प्रवाहामुळे गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ दिवसात एक वाघीण व शेतकºयाचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारच्या अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी रात्रीच्या सुमारास वीज कर्मचाºयांनी गस्त घालावी व आकड्यांचा शोध घ्यावा, असे निर्देश राज्य शासनाने वन विभाग व वीज विभागाला दिले आहेत. त्यामुळे वन विभाग व वीज विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. सदर पथक त्यांच्या परिसरात रात्री गस्त घालून आकड्यांचा शोध घेत आहेत. बेकायदेशीरपणे विजेचा प्रवाह सोडला असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकºयावर कारवाई केली जात आहे. पथक गस्त घालत असल्याची माहिती शेतकºयांना होताच आकडे टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.रात्रीच्या गस्तीवर महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम हे नियंत्रण ठेवून आहेत.रबी हंगामात वन्यजीवांची शेतांकडे धावआॅक्टोबर महिन्यापासून रबी पिकांच्या पेरणीला सुरूवात होते. या कालावधीत जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटण्यास सुरूवात होते. पाण्याअभावी गवतही कमी होते. त्यामुळे वन्यजीव पाणी व चाºयाच्या शोधात जंगलाजवळ असलेल्या शेतात जातात. रबी हंगामाचे सर्वाधिक नुकसान वन्यजीवांकडून होत असल्याने या कालावधीत काही शेतकरी मचान उभारून स्वत: रात्री उपस्थित राहून वन्यजीवांपासून पिकांचे रक्षण करतात. तर काही शेतकरी शेताच्या सभोवताल वीज प्रवाह सुरू करण्याचा सोपा मात्र धोकादायक मार्ग अवलंबतात. वन विभागाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे आकडे टाकण्यास प्रतिबंध बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.