शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या सुमारास वीज कर्मचाऱ्यांची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:31 IST

वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवताल वीज तारेचा प्रवाह सोडण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

ठळक मुद्देआकड्यांचा घेत आहेत शोध : अवैध वीज पुरवठा घेणाऱ्यांवर कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवताल वीज तारेचा प्रवाह सोडण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. वीज आकड्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने रात्रीच्या सुमारास जंगल परिसराला लागून असलेल्या शेतांवर गस्त घालण्याची मोहीम मागील पाच दिवसांपासून सुरू केली आहे.जंगलच्या जवळ असलेल्या शेतांचे वन्यजीव मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या वन्यजीवांना शेतात येण्याला प्रतिबंध घालण्यासाठी काही शेतकरी शेताच्या सभोवताल विद्युत प्रवाह सोडून ठेवतात. या विद्युत प्रवाहामुळे गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ दिवसात एक वाघीण व शेतकºयाचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारच्या अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी रात्रीच्या सुमारास वीज कर्मचाºयांनी गस्त घालावी व आकड्यांचा शोध घ्यावा, असे निर्देश राज्य शासनाने वन विभाग व वीज विभागाला दिले आहेत. त्यामुळे वन विभाग व वीज विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. सदर पथक त्यांच्या परिसरात रात्री गस्त घालून आकड्यांचा शोध घेत आहेत. बेकायदेशीरपणे विजेचा प्रवाह सोडला असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकºयावर कारवाई केली जात आहे. पथक गस्त घालत असल्याची माहिती शेतकºयांना होताच आकडे टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.रात्रीच्या गस्तीवर महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम हे नियंत्रण ठेवून आहेत.रबी हंगामात वन्यजीवांची शेतांकडे धावआॅक्टोबर महिन्यापासून रबी पिकांच्या पेरणीला सुरूवात होते. या कालावधीत जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटण्यास सुरूवात होते. पाण्याअभावी गवतही कमी होते. त्यामुळे वन्यजीव पाणी व चाºयाच्या शोधात जंगलाजवळ असलेल्या शेतात जातात. रबी हंगामाचे सर्वाधिक नुकसान वन्यजीवांकडून होत असल्याने या कालावधीत काही शेतकरी मचान उभारून स्वत: रात्री उपस्थित राहून वन्यजीवांपासून पिकांचे रक्षण करतात. तर काही शेतकरी शेताच्या सभोवताल वीज प्रवाह सुरू करण्याचा सोपा मात्र धोकादायक मार्ग अवलंबतात. वन विभागाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे आकडे टाकण्यास प्रतिबंध बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.