शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

‘इंद्रावती’वरील पुलाला विरोध नागरिकांचा की नक्षलवाद्यांचा? पाेलिस म्हणतात, हा तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 11:37 IST

सीमाभागात नागरिकांची निदर्शने

गडचिरोली : भामरागड तालुक्यातून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरील इंद्रावती नदीवर पूल तयार करण्यात येणार आहे. मात्र, या पुलाला चक्क छत्तीसगड सीमेतील आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती गावातील काही नागरिकांनी विरोध दर्शवत निदर्शने केली. ‘आधी आम्हाला मूलभूत सुविधा द्या’, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, पुलाच्या बांधकामाला नागरिकांचा मुळात विरोध असण्याचे कोणतेच कारण नसून, हा विरोध म्हणजे नक्षलवाद्यांनी लावलेली फूस आहे, असा संशय पोलिस विभागाने व्यक्त केला आहे.

पूल झाल्यास या मार्गाने लोह खनिजाची छत्तीसगडमध्ये वाहतूक होईल. त्यामुळे पुलाला विरोध होत असल्याचे सांगितले जाते. इंद्रावती नदीच्या अलीकडे भामरागड तालुक्यातील कवंडे हे गाव आहे, तर नदीपलीकडे काही किलोमीटरवर छत्तीसगडमधील बेद्रे हे गाव आहे. या गावांमध्ये नक्षलवाद्यांनी बैठका घेऊन नागरिकांना या आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील गावकऱ्यांनी आपल्या या मागणीबाबत कोणतेही निवेदन प्रशासनाकडे दिलेले नाही. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांना विचारले असता, पुलाच्या विरोधाबाबत अद्याप आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. आतापर्यंत नागरिकांनी पुलाचे बांधकाम करावे यासाठी मागण्या केल्या आहेत, पण पुलाला विरोध करणे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले.

- तर नक्षल्यांच्या अस्तित्वाला लागणार सुरूंग

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा अशा वाहतुकीसाठी ‘शॉर्ट कट’ असणाऱ्या या मार्गावर दोन राज्यांना विभागणारी इंद्रावती नदी आहे. त्यामुळे या नदीवर पुलाचे बांधकाम होणार आहे. मात्र, तसे झाल्यास या मार्गावर वर्दळ वाढेल आणि पोलिसांना गस्त घालणेही सोपे होईल. परिणामी छत्तीसगडमधून महाराष्ट्रात बिनबोभाटपणे येणे-जाणे करणे नक्षलवाद्यांना कठीण होईल. याच कारणांमुळे लोकांना पुढे करून नक्षलवादी त्या आंदोलनाला बळ देत आहेत, असा संशय भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस