शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘इंद्रावती’वरील पुलाला विरोध नागरिकांचा की नक्षलवाद्यांचा? पाेलिस म्हणतात, हा तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 11:37 IST

सीमाभागात नागरिकांची निदर्शने

गडचिरोली : भामरागड तालुक्यातून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरील इंद्रावती नदीवर पूल तयार करण्यात येणार आहे. मात्र, या पुलाला चक्क छत्तीसगड सीमेतील आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती गावातील काही नागरिकांनी विरोध दर्शवत निदर्शने केली. ‘आधी आम्हाला मूलभूत सुविधा द्या’, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, पुलाच्या बांधकामाला नागरिकांचा मुळात विरोध असण्याचे कोणतेच कारण नसून, हा विरोध म्हणजे नक्षलवाद्यांनी लावलेली फूस आहे, असा संशय पोलिस विभागाने व्यक्त केला आहे.

पूल झाल्यास या मार्गाने लोह खनिजाची छत्तीसगडमध्ये वाहतूक होईल. त्यामुळे पुलाला विरोध होत असल्याचे सांगितले जाते. इंद्रावती नदीच्या अलीकडे भामरागड तालुक्यातील कवंडे हे गाव आहे, तर नदीपलीकडे काही किलोमीटरवर छत्तीसगडमधील बेद्रे हे गाव आहे. या गावांमध्ये नक्षलवाद्यांनी बैठका घेऊन नागरिकांना या आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील गावकऱ्यांनी आपल्या या मागणीबाबत कोणतेही निवेदन प्रशासनाकडे दिलेले नाही. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांना विचारले असता, पुलाच्या विरोधाबाबत अद्याप आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. आतापर्यंत नागरिकांनी पुलाचे बांधकाम करावे यासाठी मागण्या केल्या आहेत, पण पुलाला विरोध करणे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले.

- तर नक्षल्यांच्या अस्तित्वाला लागणार सुरूंग

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा अशा वाहतुकीसाठी ‘शॉर्ट कट’ असणाऱ्या या मार्गावर दोन राज्यांना विभागणारी इंद्रावती नदी आहे. त्यामुळे या नदीवर पुलाचे बांधकाम होणार आहे. मात्र, तसे झाल्यास या मार्गावर वर्दळ वाढेल आणि पोलिसांना गस्त घालणेही सोपे होईल. परिणामी छत्तीसगडमधून महाराष्ट्रात बिनबोभाटपणे येणे-जाणे करणे नक्षलवाद्यांना कठीण होईल. याच कारणांमुळे लोकांना पुढे करून नक्षलवादी त्या आंदोलनाला बळ देत आहेत, असा संशय भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस