शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रावती’वरील पुलाला विरोध नागरिकांचा की नक्षलवाद्यांचा? पाेलिस म्हणतात, हा तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 11:37 IST

सीमाभागात नागरिकांची निदर्शने

गडचिरोली : भामरागड तालुक्यातून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरील इंद्रावती नदीवर पूल तयार करण्यात येणार आहे. मात्र, या पुलाला चक्क छत्तीसगड सीमेतील आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती गावातील काही नागरिकांनी विरोध दर्शवत निदर्शने केली. ‘आधी आम्हाला मूलभूत सुविधा द्या’, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, पुलाच्या बांधकामाला नागरिकांचा मुळात विरोध असण्याचे कोणतेच कारण नसून, हा विरोध म्हणजे नक्षलवाद्यांनी लावलेली फूस आहे, असा संशय पोलिस विभागाने व्यक्त केला आहे.

पूल झाल्यास या मार्गाने लोह खनिजाची छत्तीसगडमध्ये वाहतूक होईल. त्यामुळे पुलाला विरोध होत असल्याचे सांगितले जाते. इंद्रावती नदीच्या अलीकडे भामरागड तालुक्यातील कवंडे हे गाव आहे, तर नदीपलीकडे काही किलोमीटरवर छत्तीसगडमधील बेद्रे हे गाव आहे. या गावांमध्ये नक्षलवाद्यांनी बैठका घेऊन नागरिकांना या आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील गावकऱ्यांनी आपल्या या मागणीबाबत कोणतेही निवेदन प्रशासनाकडे दिलेले नाही. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांना विचारले असता, पुलाच्या विरोधाबाबत अद्याप आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. आतापर्यंत नागरिकांनी पुलाचे बांधकाम करावे यासाठी मागण्या केल्या आहेत, पण पुलाला विरोध करणे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले.

- तर नक्षल्यांच्या अस्तित्वाला लागणार सुरूंग

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा अशा वाहतुकीसाठी ‘शॉर्ट कट’ असणाऱ्या या मार्गावर दोन राज्यांना विभागणारी इंद्रावती नदी आहे. त्यामुळे या नदीवर पुलाचे बांधकाम होणार आहे. मात्र, तसे झाल्यास या मार्गावर वर्दळ वाढेल आणि पोलिसांना गस्त घालणेही सोपे होईल. परिणामी छत्तीसगडमधून महाराष्ट्रात बिनबोभाटपणे येणे-जाणे करणे नक्षलवाद्यांना कठीण होईल. याच कारणांमुळे लोकांना पुढे करून नक्षलवादी त्या आंदोलनाला बळ देत आहेत, असा संशय भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :SocialसामाजिकGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस