शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

आसरअल्लीवासीयांनी बांधला मुलांच्या शिक्षणाचा सेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

काेराेनामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा शासन-प्रशासनाचा प्रयत्न असला ...

काेराेनामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा शासन-प्रशासनाचा प्रयत्न असला तरी तो फसत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश पालक शेतकरी, कामगार असल्याने ते शेतात व कामावर आपल्या मुलांनाही नेतात. त्यांच्याकडे ॲन्ड्राॅईड मोबाईल नाही, दुर्गम भागात नेटवर्क नाही, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिक्षणाचे विशिष्ट उद्दिष्ट साध्य व्हावे, शैक्षणिक नुकसान भरून निघावे यासाठी इयत्ता दुसरी ते दहावीसाठी १ जून ते १४ ऑगस्टपर्यंत ४५ दिवस राबविण्यात येत असलेला ‘सेतू अभ्यासक्रम’ अपयशी ठरत आहे. ही बाब हेरून व विद्यार्थ्यांना याचा लाभ योग्यप्रकारे मिळणार नाही म्हणून ग्रामपंचायत, ग्राम सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आदींनी एकमताने कोविडचे नियम पाळून गटा-गटाने सुरक्षित पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेत बाेलाविण्याचा निर्णय घेतला. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत विद्यार्थी ४५ दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी येत आहेत. ‘आमची शाळा, आमची जबाबदारी, आमचा निर्णय’ याचा अवलंब गावकऱ्यांनी केला आहे. सुरक्षितता म्हणून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर व इतर वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक खुर्शिद शेख, सरपंच रमेश तैनेनी, उपसरपंच सुधाकर मिसरी, राजू जैनवार, गजानन कलाक्षपवार, ग्रामपंचायत सदस्य सर्वेश्वरराव गुडुरी, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम, राजू जैनवार, श्रीकांत सुगरवार, सतीश तिरुनगरी, व्यंकना चौधरी, लक्ष्मी अल्लपू, विजय तुमडे, श्रीकांत तोरकरी, रंजीत चिंताकानी, जनार्धन तोगेटी, हेमंत रोड्डावर, श्रीनिवास रंगू आदी सहकार्य करीत आहेत.

बाॅक्स

काेराेनापासून पळू नका तर लढा !

शालेय विद्यार्थ्यांना काेराेना विषाणूचा संसर्ग हाेऊ नये यासाठी मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. काेराेनाबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु कोरोनापासून दूर पळणे हा मार्ग नसून ‘सुरक्षित पद्धतीने लढणे’ हाच खरा उपाय आहे, हे सूत्र आसरअल्लीवासीयांनी अवलंबले. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून काैतुक केले जात आहे.