शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आसरअल्लीवासीयांनी बांधला मुलांच्या शिक्षणाचा सेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

काेराेनामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा शासन-प्रशासनाचा प्रयत्न असला ...

काेराेनामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा शासन-प्रशासनाचा प्रयत्न असला तरी तो फसत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश पालक शेतकरी, कामगार असल्याने ते शेतात व कामावर आपल्या मुलांनाही नेतात. त्यांच्याकडे ॲन्ड्राॅईड मोबाईल नाही, दुर्गम भागात नेटवर्क नाही, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिक्षणाचे विशिष्ट उद्दिष्ट साध्य व्हावे, शैक्षणिक नुकसान भरून निघावे यासाठी इयत्ता दुसरी ते दहावीसाठी १ जून ते १४ ऑगस्टपर्यंत ४५ दिवस राबविण्यात येत असलेला ‘सेतू अभ्यासक्रम’ अपयशी ठरत आहे. ही बाब हेरून व विद्यार्थ्यांना याचा लाभ योग्यप्रकारे मिळणार नाही म्हणून ग्रामपंचायत, ग्राम सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आदींनी एकमताने कोविडचे नियम पाळून गटा-गटाने सुरक्षित पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेत बाेलाविण्याचा निर्णय घेतला. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत विद्यार्थी ४५ दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी येत आहेत. ‘आमची शाळा, आमची जबाबदारी, आमचा निर्णय’ याचा अवलंब गावकऱ्यांनी केला आहे. सुरक्षितता म्हणून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर व इतर वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक खुर्शिद शेख, सरपंच रमेश तैनेनी, उपसरपंच सुधाकर मिसरी, राजू जैनवार, गजानन कलाक्षपवार, ग्रामपंचायत सदस्य सर्वेश्वरराव गुडुरी, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम, राजू जैनवार, श्रीकांत सुगरवार, सतीश तिरुनगरी, व्यंकना चौधरी, लक्ष्मी अल्लपू, विजय तुमडे, श्रीकांत तोरकरी, रंजीत चिंताकानी, जनार्धन तोगेटी, हेमंत रोड्डावर, श्रीनिवास रंगू आदी सहकार्य करीत आहेत.

बाॅक्स

काेराेनापासून पळू नका तर लढा !

शालेय विद्यार्थ्यांना काेराेना विषाणूचा संसर्ग हाेऊ नये यासाठी मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. काेराेनाबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु कोरोनापासून दूर पळणे हा मार्ग नसून ‘सुरक्षित पद्धतीने लढणे’ हाच खरा उपाय आहे, हे सूत्र आसरअल्लीवासीयांनी अवलंबले. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून काैतुक केले जात आहे.