शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पीक पेरणी १० टक्क्यांवर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:59 IST

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण्यात आली आहे. रविवारपर्यंत धान रोवणीची टक्केवारी १० टक्क्यांवर पोहोचली.

ठळक मुद्देकेवळ २५ हेक्टरवर धान रोवणी : जिल्हाभरात ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण्यात आली आहे. रविवारपर्यंत धान रोवणीची टक्केवारी १० टक्क्यांवर पोहोचली.गडचिरोली जिल्ह्यात धान व इतर सर्व पिकांची मिळून एकूण १ लाख ५३ हजार २२८ इतके खरीप हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी ५ हजार ८७८ इतके भात नर्सरीचे एकूण क्षेत्र आहे. धानोरा, गडचिरोली, कुरखेडा व कोरची आदी तालुके मिळून रोवणी केवळ २५ हेक्टरवर झाली आहे. सर्व पिकांची मिळून एकूण १० टक्के पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांना अपेक्षीत पाऊस झाला नाही. दोन ते तीन दिवस झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकºयांनी धान पऱ्हे टाकण्याचे काम लगबगीने आटोपले. अनेक शेतकऱ्यांनी आवत्या स्वरूपातील पेरणीही पूर्ण केली. आद्रा नक्षत्राच्या पावसामुळे शेतजमिनीतील पºह्यांना अंकूर फुटले. मात्र त्यानंतर जोरदार पाऊस बरसला नाही. अनेक ठिकाणचे पऱ्हे रोवणीयोग्य झाले असले तरी पाऊस नसल्याने बºयाच शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामास अद्यापही प्रारंभ केला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत नांगरणी व वखरणी तसेच इतर कामे पूर्ण करून रोवणीचे काम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे. येत्या तीन-चार दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास अर्ध्याअधिक जिल्ह्यात रोवणीच्या कामास धडाक्यात सुरूवात होणार आहे. सद्य:स्थितीत आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात उपलब्ध असलेल्या सिंचन सुविधेच्या भरवशावर काही शेतकºयांनी धान रोवणीचे काम हाती घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाची अवस्था पाहिजे त्या प्रमाणात बळकट नाही. त्यामुळे येथील शेतकºयांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत १ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात पाच हेक्टर, कोरची तालुक्यात एक व चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ४६ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचा समावेश आहे. ३१ हेक्टर क्षेत्रात इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली. ४ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर २३ हेक्टर क्षेत्रावर मूग व उडीद पिकाची लागवड करण्यात आली आहे. भूईमूग केवळ दोन हेक्टर क्षेत्रावर आहे. ३२० हेक्टर क्षेत्रावर तीळ तर ३ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी करण्यात आली आहे.दरवर्षी सूर्यफुलाची लागवड अनेक शेतकरी करीत होते. मात्र यंदा सूर्यफूल पिकाची लागवड झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून दिसून येत आहे.धानोरात सर्वाधिक आवत्याधान रोवणी व लागवडीचा खर्च परवडत नाही तसेच रोवणीसाठी मजुराची टंचाई भासत असल्याच्या कारणावरून बरेच शेतकरी आवत्या टाकतात. यंदाही काही शेतकºयांनी आवत्या स्वरूपात पेरणी केली आहे. विशेष म्हणजे, धानोरा तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी आवत्या स्वरूपात धानाची पेरणी केली आहे. त्यानंतर आरमोरी तालुक्यात १ हजार ६४० हेक्टर, गडचिरोली तालुक्यात १ हजार ४९० तर कुरखेडा तालुक्यात ४११ हेक्टर क्षेत्रावर आवत्या आहे. कोरची व चामोर्शी तालुक्यातही काही शेतकऱ्यांनी आवत्या स्वरूपात धान पेरणी केली आहे.२ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूसचामोर्शी, गडचिरोली व इतर तालुक्यात मिळून यंदाच्या खरीप हंगामात २ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात सर्वाधिक २ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड आहे.