शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पीक पेरणी १० टक्क्यांवर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:59 IST

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण्यात आली आहे. रविवारपर्यंत धान रोवणीची टक्केवारी १० टक्क्यांवर पोहोचली.

ठळक मुद्देकेवळ २५ हेक्टरवर धान रोवणी : जिल्हाभरात ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण्यात आली आहे. रविवारपर्यंत धान रोवणीची टक्केवारी १० टक्क्यांवर पोहोचली.गडचिरोली जिल्ह्यात धान व इतर सर्व पिकांची मिळून एकूण १ लाख ५३ हजार २२८ इतके खरीप हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी ५ हजार ८७८ इतके भात नर्सरीचे एकूण क्षेत्र आहे. धानोरा, गडचिरोली, कुरखेडा व कोरची आदी तालुके मिळून रोवणी केवळ २५ हेक्टरवर झाली आहे. सर्व पिकांची मिळून एकूण १० टक्के पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांना अपेक्षीत पाऊस झाला नाही. दोन ते तीन दिवस झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकºयांनी धान पऱ्हे टाकण्याचे काम लगबगीने आटोपले. अनेक शेतकऱ्यांनी आवत्या स्वरूपातील पेरणीही पूर्ण केली. आद्रा नक्षत्राच्या पावसामुळे शेतजमिनीतील पºह्यांना अंकूर फुटले. मात्र त्यानंतर जोरदार पाऊस बरसला नाही. अनेक ठिकाणचे पऱ्हे रोवणीयोग्य झाले असले तरी पाऊस नसल्याने बºयाच शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामास अद्यापही प्रारंभ केला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत नांगरणी व वखरणी तसेच इतर कामे पूर्ण करून रोवणीचे काम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे. येत्या तीन-चार दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास अर्ध्याअधिक जिल्ह्यात रोवणीच्या कामास धडाक्यात सुरूवात होणार आहे. सद्य:स्थितीत आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात उपलब्ध असलेल्या सिंचन सुविधेच्या भरवशावर काही शेतकºयांनी धान रोवणीचे काम हाती घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाची अवस्था पाहिजे त्या प्रमाणात बळकट नाही. त्यामुळे येथील शेतकºयांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत १ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात पाच हेक्टर, कोरची तालुक्यात एक व चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ४६ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचा समावेश आहे. ३१ हेक्टर क्षेत्रात इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली. ४ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर २३ हेक्टर क्षेत्रावर मूग व उडीद पिकाची लागवड करण्यात आली आहे. भूईमूग केवळ दोन हेक्टर क्षेत्रावर आहे. ३२० हेक्टर क्षेत्रावर तीळ तर ३ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी करण्यात आली आहे.दरवर्षी सूर्यफुलाची लागवड अनेक शेतकरी करीत होते. मात्र यंदा सूर्यफूल पिकाची लागवड झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून दिसून येत आहे.धानोरात सर्वाधिक आवत्याधान रोवणी व लागवडीचा खर्च परवडत नाही तसेच रोवणीसाठी मजुराची टंचाई भासत असल्याच्या कारणावरून बरेच शेतकरी आवत्या टाकतात. यंदाही काही शेतकºयांनी आवत्या स्वरूपात पेरणी केली आहे. विशेष म्हणजे, धानोरा तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी आवत्या स्वरूपात धानाची पेरणी केली आहे. त्यानंतर आरमोरी तालुक्यात १ हजार ६४० हेक्टर, गडचिरोली तालुक्यात १ हजार ४९० तर कुरखेडा तालुक्यात ४११ हेक्टर क्षेत्रावर आवत्या आहे. कोरची व चामोर्शी तालुक्यातही काही शेतकऱ्यांनी आवत्या स्वरूपात धान पेरणी केली आहे.२ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूसचामोर्शी, गडचिरोली व इतर तालुक्यात मिळून यंदाच्या खरीप हंगामात २ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात सर्वाधिक २ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड आहे.