शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

पूर्व विदर्भाच्या जंगलातून मोराचा पिसारा झाला लुप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:05 IST

Gadchiroli : शिकाऱ्यांचा फास जंगल तोडल्याने निवारा झाला नष्ट

प्रदीप बोडणे लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : पावसाळ्यापूर्वी मोराचा विणीचा काळ असतो. नंतर त्याचा पिसारा झडून जातो. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत जंगलात मोरपीस हमखास सापडतात. ग्रामीण भागात शेतकरी दिवाळीच्या सणाला गोवर्धन पूजेला गाय-म्हशी सजविण्यासाठी मोराच्या पिसांचा वापर करतात. पण, हे मोरपीस आता पूर्व विभागाच्या जंगलात सापडत नाही. कारण सुंदर दिसणाऱ्या या पक्ष्याची मोठ्या प्रमाणात शिकार झाली आणि पूर्व विदर्भाच्या जंगलातून मोराची किंचाळी लुप्त झाली आहे. 

निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सुंदर पक्षी म्हणजे मोर, याच्या आकर्षक रंगामुळे या पक्ष्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. पूर्व विदर्भातील झाडीच्या जंगलात या पक्ष्यांची संख्या मोठी होती. कृमी-कीटक, गवत, धान्य हे त्याचे अन्न. झुडपी जंगलात मोरांचा वावर होता. वर्षभर जंगलात मिळेल त्या ठिकाणी आसरा करून राहणारा मोर विणीच्या काळात मात्र नर आणि मादी एकत्र येतात. घरटी बांधतात आणि पिलाला जन्म देतात. 

विणीचा काळ ओळखून शिकारीचे अघोरी कृत्य करणारे लोक त्याचे घरटे हेरून घरट्यात एक विशिष्ट चिकट पदार्थ टाकून ठेवतात. त्यात मोर अडकतो. अशा पद्धतीने शिकारी झाल्या आणि मोर नष्ट झाले. 

वडसा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या वैरागड, वासाडा, रामाडा, इंजेवारी, शिरपूर, आरमोरी, पळसगाव, भगवानपूर, सावलखेडा, कराडीचे जंगल मोरांच्या निवासाचे जंगल म्हणून ओळखले जायचे. जंगलात वावर असणारे आणि रानवाटांना जाणाऱ्या लोकांना मोर हमखास दृष्टीत पडायचे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत जंगलात गुरे चारायला नेणारे गुराखी हमखास पाच-दहा मोरपिसे जंगलातून घेऊन घरी परतायचे. त्याच्या निवान्यासाठी जंगल अनुकूल असायचे, जंगल झपाट्याने नष्ट झाले आणि निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा मोर नष्ट झाला. तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी झाली असताना मांसभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे. परिणामी वाघ, बिबट्यांचे माणवावर हल्ले वाढले आहेत. 

एफडीसीएमने केले जंगल नष्ट जंगलाची मोठ्या प्रमाणात हानी केली ती वन विकास महामंडळाने. एकत्रीकरणाच्या नावावर जंगलाची विल्हेवाट लावली आणि उरले-सुरले जंगल लोकांनी तोडून नेले. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांचा गवताळ झुडपी जंगलाचा निवारा नष्ट झाल्याने हरीण, ससा, मोर, लांडोर हे तृणभक्षी प्राणी, पक्षी शिकाऱ्यांच्या हाती गवसले. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेने नुकताच प्रकाशित केलेल्या अहवालाचा विचार केला तर सन १९७२ पासून आतापर्यंत तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत तब्बल ७० टक्क्यांनी घट झाली. याचे मुख्य कारण म्हणजे जंगलांना लागणारे वनवे, जंगलाचे कमी होणारे प्रमाण, जंगलातील जैवविविधता नष्ट होणे यांचा परिणाम आहे.

"जंगल नष्ट होत असल्यामुळे गडचिरोलीच्या जंगलातील मोर जवळपास नष्टच झाले आहेत. पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर असलेला हा पक्षी आहे. उंच असल्याने तो जास्त उडू शकत नाही. त्यामुळे त्याची शिकार सहज करता येते."- फाल्गुन मेहेर, वन्यजीव प्रेमी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीwildlifeवन्यजीव