शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

धान पीक रोवणी ४४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:30 IST

सन २०१८ च्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून आतापर्यंत एकूण ५३ टक्के इतकी खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. आवत्या व रोवणी मिळून धान पिकाची लागवड ४४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे३ हजार ९१० हेक्टरवर सोयाबीन : खरीपातील सर्व पिके मिळून ५३ टक्के लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१८ च्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून आतापर्यंत एकूण ५३ टक्के इतकी खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. आवत्या व रोवणी मिळून धान पिकाची लागवड ४४ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या रोवणीचा हंगाम सर्वत्र जोमात सुरू आहे.खरीप पिकाचे जिल्ह्यात एकूण १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर क्षेत्र इतके क्षेत्र आहे. १ लाख ५३ हजार २२८ इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रात धानाचे पºहे टाकण्यात आले आहे. ३८ हजार १५ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी आतापर्यंत झाली आहे. २९ हजार १४ इतक्या हेक्टर क्षेत्रात यंदा आवत्या टाकण्यात आल्या आहेत. गडचिरोली तालुक्यात रोवणी व आवत्या मिळून एकूण ६ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. कुरखेडा तालुक्यात ५ हजार १०० हेक्टर क्षेत्रात, आरमोरी ७ हजार ७८० हेक्टर, चामोर्शी ९ हजार ५३६ हेक्टर, सिरोंचा १ हजार १७५ हेक्टर, अहेरी ४ हजार ८५७ हेक्टर, एटापल्ली ४ हजार ७५० हेक्टर, धानोरा १० हजार ४६४ हेक्टर, कोरची ६ हजार ३४३ हेक्टर, देसाईगंज ५ हजार १४० हेक्टर, मुलचेरा २ हजार १५० हेक्टर व भामरागड तालुक्यात २ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ४ हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ३१ हेक्टर, सिरोंचा तालुक्यात ५३ हेक्टर व भामरागड तालुक्यात ८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी आटोपली आहे. खरीपातील सर्व पिकांची मिळून एकूण ८८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ५३ आहे. १ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सलग परसबागही फुलविली आहे. ४६८ हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पीक रोवणीच्या कामास वेग आला आहे. त्यामुळे शेत मालकांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी सुरू आहे.१३ हजार ४६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवडजिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी जिल्ह्यातील शेतकरी आता धानासोबतच कापूस पिकाकडेही वळले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १३ हजार ४६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, सिरोंचा, देसाईगंज तालुक्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती