शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

अतिवृष्टीने शेकडो घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:43 PM

१५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत.

ठळक मुद्देमहसूल विभागामार्फत सर्वेक्षण सुरू : तात्काळ मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा/जिमलगट्टा : १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असून जमीनदोस्त झालेल्या एकूण घरांचा आकडा ३०० च्या वर जाण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घरांच्या पडझडीमुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांना शासनाने तत्काळ मदत द्यावी तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.१६ आॅगस्ट रोजी किष्टापूर नाल्याला पूर आल्याने किष्टापूर गावाला पाण्याचा वेढा बसला होता. नागरिकांनी इकडे तिकडे धाव घेत कसाबसा आपला प्राण वाचविला. मात्र पाळीव प्राणी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाय, बैल यांची जीवितहानी झाली. घरातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. घरात पाणी शिरल्याने मातीची घरे जमीनदोस्त झाली. शेडा गावालाही पुराने वेढा घातला होता. या गावातील २० घरे पाण्याखाली होती. या घरांमध्ये जवळपास चार फूट पाणी होते. किष्टापूर येथील बाजीराव बापय्या सिडाम यांचे घर कोसळले.जून ते आॅगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यातील सुमारे ११८ घरांची पडझड झाली असून यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये यामुळे घरांचे नुकसान झाले. सिरोंचा तालुका जंगलाने व्यापला आहे. परिणामी दरवर्षीच पुराचा फटका सिरोंचा तालुक्याला बसतो. अतिवृष्टीनंतर महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सुमारे ११८ घरांची पडझड झाली असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर एक गाय, एक बैल व एक रेडा मृत्यूमुखी पडला आहे. महसूल विभागाच्या मार्फत सर्वेक्षण केले जात आहे. नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर