लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : येथील साई मंदिरसमोर गोंड मोहल्ल्यात नालीचे बांधकाम ग्राम पंचायतीच्या वतीने सुरू आहे. सदर बांधकाम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. बांधकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी करीत बांधकामात ग्राम पंचायत प्रशासन मनमानी करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.लॉकडाऊनमध्ये शासनाच्या परवानगीनंतर नवीन बांधकामाला सुरूवात झाली. बांधकाम करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु येथील बांधकामात या नियमाचा फज्जा उडत आहे. आलापल्लीतील सर्वात वर्दळीचा अंतर्गत मार्ग म्हणून ज्याची ओळख आहे. त्या मार्गाच्या रूंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. रस्ता अरूंद असल्याने मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या मार्गावर चार कॉन्व्हेंट, एक हायस्कूल, एक कनिष्ठ महाविद्यालय, एक महिला महाविद्यालय व नाली बांधकामाजवळ अंगणवाडी केंद्र आहे. त्यामुळे येथून नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरील नाली सदळ रेषेत बांधणे आवश्यक होते. मात्र तसे न करता मार्ग पुन्हा अरूंद करून नाली नागमोडी बांधली जात आहे. या नालीला दुसऱ्या वॉर्डातून येणाºया नालीच्या अगदी समोर घेतल्याने पावसाळ्यात कोणत्याही एका नालीत पाण्याचा प्रचंड दाब निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरू शकते. त्यामुळे साई मंदिर परिसरातील काही नागरिक या विचित्र बांधकामाला विरोध करीत आहेत. परंतु ग्राम पंचायत नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांनी पं. स. च्या कनिष्ठ अभियंत्यांकडे फोनद्वारे बांधकामाविषयी तक्रार केली. त्यांनी येऊन पाहण्याचे आश्वासन दिले. मात्र तीन दिवस उलटूनही लक्ष दिले नाही.आलापल्ली ग्राम पंचायतीत नुकतीच प्रशासक म्हणून नियुक्त झाली आहे. सदर नाली बांधकाम नेमके कोण करीत आहे आणि सदर काम कोणाच्या आदेशानुसार सुरू आहे, याबाबत मलाच माहिती नाही.- व्ही. आर. गंजीवार, ग्रामविकास अधिकारी, आलापल्लीआलापल्ली येथील नाली नागमोडी वळणाची असली तरी जुन्याच नालीच्या बांधकामप्रमाणे सुरू आहे. सदर काम नियमानुसार व इस्टिमेटनुसार सुरू आहे. याबाबत काय आहे, ते आम्ही आमचे बघून घेऊ.- मुकूंद रामटेके, कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती, अहेरी
नाली बांधकामाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST
लॉकडाऊनमध्ये शासनाच्या परवानगीनंतर नवीन बांधकामाला सुरूवात झाली. बांधकाम करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु येथील बांधकामात या नियमाचा फज्जा उडत आहे. आलापल्लीतील सर्वात वर्दळीचा अंतर्गत मार्ग म्हणून ज्याची ओळख आहे. त्या मार्गाच्या रूंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
नाली बांधकामाला विरोध
ठळक मुद्देआलापल्लीतील काम : ग्राम पंचायतीचा मनमानी कारभार असल्याचा नागरिकांचा आरोप