शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

एकमेव आधार काेराेनाने नेला; पाल्यांना तातडीच्या मदतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST

गडचिराेली : काेराेनाच्या संंसर्गामुळे अनेक कुटुंबांतील कमावत्या व्यक्तींचे निधन झाले. काही कुटुंबांतील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबावर माेठा आघात झाला; ...

गडचिराेली : काेराेनाच्या संंसर्गामुळे अनेक कुटुंबांतील कमावत्या व्यक्तींचे निधन झाले. काही कुटुंबांतील प्रमुख व्यक्ती गेल्याने कुटुंबावर माेठा आघात झाला; तर अनेक लहान मुलांचे मातृपितृ छत्र हरपल्याने बालके निराधार झाली. काेराेनाने लहान मुलांचा एकमेव आधार हिरावून गेल्याने पाल्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. गडचिराेली जिल्ह्यात जिल्हास्तरीय कृतिदल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले आहे. तरीसुद्धा बालकांना साेयीसुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे.

काेविड महामारीमुळे ज्या पालकांचा मृत्यू झाला, अशा कुटुंबातील बालकांची यादी तयार करून कृतिदलासमोर ठेवण्यात आली आहे. त्यांना अन्नधान्य, आराेग्यविषयक सुविधा, कायदेविषयक संरक्षण तसेच समुपदेशन यांसह विविध याेजनांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ‘चाईल्डलाईन’च्या माध्यमातून मदतही पाेहाेचविली जाणार आहे.

बाॅक्स ....

ज्येष्ठांचे अनेक प्रश्न

- काेराेनामुळे एकुलत्या एका विवाहित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईवडिलांचा सांभाळ काेण करणार, असा प्रश्न अनेक ज्येष्ठांसमाेर निर्माण झाला आहे.

- अनेक ज्येष्ठांसमाेर नातवंडांच्या संगाेपनाची जबाबदारी आल्याने कुटुंबाचे पालनपाेषण कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर आहे. तसेच आपल्या पश्चात त्यांचे काय हाेईल, अशीही चिंता त्यांना सतावत आहे.

बाॅक्स ....

मुलांसह ज्येष्ठांचीही जबाबदारी घ्यावी

काेराेनामुळे अनेक कुटुंबातील प्रमुखांचे निधन झाले. अशा कुटुंबातील बालके व ज्येष्ठ व्यक्ती निराधार झाली. लहान मुलांच्या संगाेपनाची जबाबदारी ज्येष्ठ नागरिकांवर आल्याने त्यांच्यावरील ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शासनाने केवळ लहान मुलांच्या संगाेपनाची जबाबदारी न घेता निराधार, ज्येष्ठ व्यक्तींचीही जबाबदारी घेऊन त्यांना आवश्यक मदत करणे गरजेचे आहे. तेव्हाच संबंधित कुटुंबाला याेग्य प्रकारे आधार मिळून पुनर्वसन हाेऊ शकेल, असे सामाजिक कार्यकर्ते भाऊराव मानकर यांनी म्हटले आहे.