शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेती व शेतीसंलग्न व्यवसायच तारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

खरीप हंगामाअगोदर पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील पाऊस जास्त आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याचा फायदा घेवून शेतकऱ्यांना विविध आर्थिक व शास्त्रीय पाठबळ देवून चांगल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची सूचना : खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संचारबंदीमुळे देशासह राज्यातही उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शेतीशेतीपूरक व्यवसायच महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे त्याला चालना द्या, अशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय आढावा बैठकीत केली.संचारबंदीमुळे मोडकळीस आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेती व बिगरशेती व्यवसायांना चालना देण्यासाठी काय-काय करता येईल, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कृषी सभापती रमेश बारसागडे, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.खरीप हंगामाअगोदर पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील पाऊस जास्त आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याचा फायदा घेवून शेतकऱ्यांना विविध आर्थिक व शास्त्रीय पाठबळ देवून चांगल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.बंद पडलेले सिंचन प्रकल्प, अपूर्ण व कामे सुरू न झालेल्या सिंचन विहिरी याबाबत पाठपुरावा करून तातडीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. महावितरणकडून ४ हजार पाचशेपेक्षा जास्त कृषी पंपांना जोडणी देण्याचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात बोगस बियाणे येणार नाही, तसेच शेतीसाठी आवश्यक खतांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविली. जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर कापूस पीक घेतले जाते. चोर बीटी कापूस या जिल्ह्यात येवू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक काळजी घ्यावी. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. याबाबत पालकमंत्री यांनी आपण उच्चस्तरावर परराज्यातून येणाºया चोर बीटीबाबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.तेंदूपत्ता हंगामाबाबत येणाºया अडचणींवर यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तेंदूपत्ता संकलन हा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. यासाठी संचारबंदीमधून या व्यवसायाला सूट देण्यात आली आहे. संकलन करणारे मजूर, ठेकेदार व प्रशासनातील कर्मचारी यांनी कोरोनाबाबत आवश्यक ती काळजी घेवून ही प्रक्रि या राबवावी. प्रशासन यासाठी आवश्यक वाहतूक व संकलनास विहीत पध्दतीने मंजुरी देत आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ठेकेदार आणि त्यांच्या मजुरांच्या वाहतुकीसंदर्भात वनविभागातील अधिकाºयांमार्फत पोलीस विभागाशी समन्वय ठेवून आवश्यक त्या परवानग्या देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.धानाचे दुबार पीक घेण्यावर भर द्याजिल्ह्यात धान लागवड क्षेत्र २ लाख ५ हजार हेक्टरवरून२ लाख २२ हजार हेक्टरपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जर १०५ दिवसात भरणाºया रबी धानाच्या वाणाची लागवड केली तर शेतकºयांना निश्चितच दुबार पीक घेऊन आणि चांगले उत्पादन घेता येईल.शेतीबाबत असणाºया विविध योजनांचे लाभार्थी निवडताना पारदर्शकता आणून कृषी अधीक्षक, कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांनी समन्वय साधून काम करावे. पीक कर्जाबाबत येणाºया अडचणी लक्षात घेवून आवश्यक मदत अगोदरपासूनच करावी. जेणेकरून त्यांना वेळेवर कर्ज घेवून हंगाम चांगल्या प्रकारे घेता येईल, असे पालकमंत्री म्हणाले.कोविड-१९ प्रयोगशाळेचा प्रस्तावकोरोना (कोविड-१९) तपासणीबाबत जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव राज्याला सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिला. जिल्ह्यात मोठया संख्येने बाहेरील मजूर आले आहेत. तसेच शेजारील तेलंगणा व छत्तीसगड राज्यातून कित्येक मजूर छुप्या मार्गाने राज्यात प्रवेश करत आहेत. या पाशर््वभूमिवर जिल्ह्यात कोरोना नमुने तपासणी लॅब असणे आवश्यक असल्याचा मुद्दा बैठकीतील चर्चेत समोर आला. याबाबत पालकमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. याबाबत राज्यस्तरावर पाठपुरावा करून त्यास मंजुरी घेण्यात येईल, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. यासाठी आवश्यक निधी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांची माहिती तातडीने घ्याजिल्हयातील संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या रेशन कार्ड नसलेल्या गरीब नागरीकांची माहिती घेण्याचे कार्य तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी पुरवठा विभागाला दिल्या. यातून गोरगरीब गरजू लोकांना तातडीने मदत पोहचविता येईल. याबाबत तहसीलदार यांना आवश्यक सूचना देवून माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे गरजू लोकांना आवश्यक मदत पोहचिवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यातून त्यांना धान्य व इतर आवश्यक साहित्य पोहचवण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे.बोअरवेलच्या गाड्यांना वाहतुकीसाठी परवानगीउन्हाळयाच्या पाशर््वभूमिवर जिल्ह्यात गरजू लोकांना पाण्याची उपलब्धता वेळेत होण्यासाठी बोअरवेलच्या गाडयांना तातडीने परवानगी देण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.आठवड्यातून ५ दिवस कापूस खरेदीचामोर्शी येथील कापूस खरेदी केंद्रावर आठवडयातील दोनच दिवस कापूस खरेदी सुरू आहे. परंतू आता आठवड्यातील ५ दिवस ही खरेदी सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक कापूस तपासणी ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर केल्या.

टॅग्स :agricultureशेतीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार