शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ेकेवळ ३११ मुली बनल्या सुकन्या

By admin | Updated: August 15, 2015 00:25 IST

बीपीएलधारकांच्या मुलींसाठी राज्य शासनाने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेचा लाभ दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३११ मुलींना देण्यात आला असून...

हजारों बालिका योजनेपासून वंचित : १८ वर्षानंतर मिळणार एक लाख रूपयेगडचिरोली : बीपीएलधारकांच्या मुलींसाठी राज्य शासनाने सुकन्या योजना सुरू केली. या योजनेचा लाभ दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील ३११ मुलींना देण्यात आला असून या मुलींना आता वयाच्या १८ व्या वर्षी एक लाख रूपये रक्कम मिळणार आहे. दिवसेंदिवस मुलींचे प्रमाण घटत चालले असल्याने भविष्यात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक पालक मुलीला अजूनही बोजा समजातात. समाजाची मानसिकता अजूनही बदलली नाही. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने यापूर्वीच्या आघाडी शासनाने १ जानेवारी २०१४ पासून सुकन्या योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मुलीच्या नावाने राज्य शासन विमा काढणार असून विम्याची रक्कम तिच्या १८ व्या वर्षानंतर मिळणार होती. राज्य शासनाने या योजनेंतर्गत प्रत्येक मुलीच्या नावाने जवळपास १८ हजार रूपये जमा केले असून १८ वर्षानंतर १ लाख रूपये मिळणार आहेत. या योजनेच्या अटीनुसार संबंधीत मुलीचा विमा एक वर्ष वयाच्या पूर्वीच काढणे गरजेचे होते. मुलीचा अर्ज पालकांच्या मदतीने पाठविण्याची जबाबदारी पंचायत समिती स्तरावरील बालकल्याण अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली होती. या योजनेचा लाभ जिल्हाभरातील केवळ ३११ मुलींना देण्यात आला आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०१४ पर्यंत ७२ मुलींचा तर १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत २३९ असा एकूण ३११ मुलींचा विमा काढून त्यांना सुकन्या योजनेचा लाभ दिला गेला आहे. गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ११ लाख आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ ३११ मुलींना लाभ देण्यात आला आहे. यावरून प्रशासन या योजनेबद्दल जनजागृती करण्यात अपयशी ठरला असल्याचे दिसून येते. या योजनेच्या अटीनुसार एक वर्षाच्या कालावधीत विमा काढणे गरजेचे आहे. मात्र एक वर्षाच्या आत अनेक मुलींचा विमा काढण्यात आला नाही. त्यामुळे सदर मुली आता या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. युती शासनाने ही योजना बंद करून त्याऐवजी दुसरी योजना आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जानेवारी २०१५ नंतरचे जे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांचा विमा काढणे बंद झाले आहे. (नगर प्रतिनिधी)