शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

केवळ १५ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:39 PM

पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

ठळक मुद्दे२०२ कोटींचे उद्दिष्ट : ८ हजार २७९ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतीचा खर्चसुद्धा वाढत चालला आहे. हा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे राहत नाही. परिणामी शेतकऱ्याला गावातील सावकार किंवा बचत गट यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते. सावकार किंवा बचत गट यांचे व्याजदर अत्यंत महाग असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. खासगी कर्ज वेळेवर मिळतही नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर होत नसल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो.या सर्व संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयीयीकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकाना शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. २०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकाऱ्यांना २०२ कोटी ९१ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मे अखेरपर्यंत केवळ ८ हजार २७९ शेतकऱ्यांना ३० कोटी ८९ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण अतीशय कमी आहे. याला गती देणे आवश्यक झाले आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.जून महिन्यात कर्ज वाटपाला मिळेल गतीगडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाच्या रोवणीला सर्वाधिक खर्च येतो. धानाच्या रोवणीची कामे जुलै महिन्याच्या सुरूवातीला सुरूवात होतात. कर्ज घेतलेले पैसे खर्च होण्याची शक्यता असल्याने शेतकरी जुन किंवा जुलै महिन्यातच कर्ज घेणे पसंत करीत असल्याने येत्या आठ दिवसांत कर्ज वाटपाला गती येईल अशी शक्तता व्यक्त केली जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवरकर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेला एकूण ५६ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ३१ मे पर्यंत ७ हजार ९३ शेतकऱ्यांना २४ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँक आॅफ इंडियाने १ कोटी ६३ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने १ कोटी ३५ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ४ लाख, आयडीबीआय बँक २४ लाख, एसबीआय १ कोटी ४३ लाख, युनियन बँक २३ लाख, एक्सिस बँक ३ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक २ कोटी २३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना दरवर्षी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येत असले तरी या उद्दिष्टाच्या ५० टक्केही कर्ज वाटप या बँकांकडून केले जात नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

टॅग्स :bankबँक