शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार क्विंटल मक्याचे चुकारे मिळालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:36 IST

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिकअंतर्गत धानोरा येथे आधारभूत मका खरेदी केंद्रावर मक्याची खरेदी मागील वर्षी करण्यात आली. शासनाने ...

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिकअंतर्गत धानोरा येथे आधारभूत मका खरेदी केंद्रावर मक्याची खरेदी मागील वर्षी करण्यात आली. शासनाने मका खरेदीची मुदतवाढ ३१ जुलै २०२० पर्यंत दिली होती. त्याप्रमाणे १६ शेतकऱ्यांनी ३० जुलै राेजी संकलन केंद्र धानोरा येथे १०५३.६६ क्विंटल मका विक्री केला. त्याचे रितसर बिल शेतकऱ्यांना देण्यात आले. संपूर्ण शेतकऱ्यांनी शासनाच्या अटी व शर्तींचे पालन करून मक्याची विक्री केली. परंतु तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण दाखवून शासनाने ३० जुलै राेजी खरेदी बंद केली. शेतकऱ्यांनी माेठ्या मेहनतीने मक्याचे उत्पादन घेतले. परंतु त्यांना विविध कारणे दाखवून मक्याचे चुकारे देण्यात आले नाही. धानाेरा तालुक्यातील मयाळू मडावी, मलापसिंग मलिया, अर्पित तुलावी (रा. पन्नेमारा), प्रमेन्द सहारे येरकड, जयंती लकडा, आनंदाबाई गावडे पळसगाव-पेंढरी, गांडो आतला, मतरू टेकाम मोहगाव पेंढरी, रजनी वरखडे निमगाव, जनीबाई मातलमी वडगाव, दानू तुलावी (रा. ढवळी, नरेश चिमुरकर, सुधीर भुरसे धानोरा, चमरू समरथ पयडी, मंगेश आतला मोहगाव, मेहताब मंगल कुदराम (रा. झाडापापडा) आदी शेतकऱ्यांचे मक्याचे चुकारे रखडले आहेत. यासंदर्भात उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक डी. एस. चाैधरी यांची विचारणा केली असता, शेतकऱ्यांच्या मक्याचे चुकारे मिळावेत यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले.

बाॅक्स

मुदत संपली तर काटा कसा केला?

धानाेरा तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी मागील वर्षी मक्याची विक्री आधारभूत केंद्रावर केली हाेती. परंतु चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. शेतकरी जेव्हा आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चुकारे देण्याची मागणी करतात, तेव्हा अधिकारी मका घरी घेऊन जाण्यास सांगतात. मका खरेदीची शासनाची मुदत संपली होती, तर केंद्रावर मक्याचा काटा केला कसा? बिल बनले कसे? उद्दिष्टापेक्षा खरेदी केलीच कशी? याला जबाबदार कोण? मुदतीत ऑनलाइन लॉट एन्ट्री करणे आवश्यक होते. परंतु ही सर्व प्रक्रिया पार पाडणारे अधिकारी आदिवासी विकास महामंडळाचेच हाेते. शेतकऱ्यांना चुकारे न मिळण्यास जबाबदार काेण? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे रखडलेले चुकारे व्याजासह द्यावे, अशी मागणी शेतकरी रजनी वासुदेव वरखडे यांनी केली आहे.