शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

एक हजार शेतकऱ्यांना लाभ

By admin | Updated: September 13, 2014 23:54 IST

कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १ हजार ४०८ शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यात

गडचिरोली : कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १ हजार ४०८ शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत आॅगस्ट महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी योजनेच्या माध्यमातून स्वत:चा फायदा करून घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २६.३२ लाखांची थकबाकी भरली. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपाच्या विद्युत बिलाची थकबाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी थकीत बिलाचा भरणा एका हफ्त्यात अथवा तीन हफ्त्यात करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तीन हफ्त्यात वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना पहिला हफ्ता म्हणून ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के रक्कम भरावयाचे होते. दुसऱ्या टप्प्यात २० सप्टेंबरपर्यंतचे २० टक्के रक्कम व तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅक्टोंबरपर्यंत १० टक्के रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक विद्युत बिलाची ५० टक्के रक्कम एकत्र भरल्यानंतर महावितरण कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांच्या उर्वरित वीज बिलावरील व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येते. १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ४०८ कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी २६.३२ लाख रूपये भरून कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत ज्या कृषीपंप विद्युत ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची थकबाकी नसेल, अशा स्थितीत शेतकऱ्यांना आगामी दोन त्रैमासिक बिलात ५० टक्के सूट दिल्या जात आहे. ज्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी अद्यापही कृषी संजीवनी योजनेमध्ये सहभाग घेतला नाही, अशा ग्राहकांना अपात्र ठरविण्यात येणार आहे. नियमानुसार व्याज व विलंब शुल्कासह थकीत बिल ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य कृषीपंपधारकांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी आहे. आलापल्ली उपविभागात १७५ कृषी पंपधारकांकडे ५ लाख २९ हजार ११६.३४, चामोर्शी उपविभागात ९०४ कृषी पंपधारकांकडून २१ लाख ४१ हजार १५२.५४ रूपये, एटापल्ली उपविभागात तीन कृषी पंपधारकांकडे १३००.८५, मुलचेरा उपविभागात १२१ कृषी पंपधारकांकडे २ लाख ६२ हजार ८३९.०३ रूपयांची थकबाकी आहे. तर सिरोंचा उपविभागात १५२१ कृषी पंपधारकांकडे तब्बल १ कोटी ४१ लाख ९८ हजार ९५६.०८ रूपयांची थकबाकी आहे. (शहर प्रतिनिधी)