शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

श्रमदानातून तयार केला एक किमीचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST

अहेरी : तालुक्यातील काेकापल्ली येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागताे. दिवसेंदिवस हा त्रास ...

अहेरी : तालुक्यातील काेकापल्ली येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागताे. दिवसेंदिवस हा त्रास वाढत हाेता. ही समस्या लक्षात घेऊन नागरिकांनी पाेलिसांच्या सहकार्याने ८०० मीटर लांबीचा रस्ता श्रमदानातून दुरुस्त केला.

राजाराम उपपाेलीस स्टेशन अंतर्गत काेकापल्ली हे गाव येते. गावात १५० च्या आसपास लाेकसंख्या आहे. राजाराम खांदला येथे ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत हाेता. विद्यार्थी, महिला, शेतकऱ्यांना रस्त्याअभावी अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागत हाेते. ही बाब राजाराम उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक रवींद्र भाेरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी नागरिकांना एकत्रित केले. पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने नागरिकांनी श्रमदानातून एक किमी रस्त्यावर दगड व मुरुम टाकून कच्चा रस्ता तयार केला. पाेलिसांच्या सहकार्याने रस्ता तयार करण्यात आला. या उपक्रमासाठी अहेरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी बजरंग देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

बाॅक्स

अनेक गावात जाण्यासाठी पायवाटेचाच आधार

अहेरी तालुक्यातील अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. पायवाटेनेचे गावात जावे लागते. पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागते. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागात साेयीसुविधा अद्यापही पाेहाेचल्या नाहीत. विशेष म्हणजे, याेजनांबाबत दुर्गम भागात जागृती नाही. त्यामुळे नागरिकांना अद्यापही हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ज्या रस्त्याचे बांधकाम दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. त्या रस्त्यांचे खडीकरण झाले नाही, अशी गंभीर स्थिती आहे.