शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

आरमोरी ते देसाईगंज जवळील कुरूडपर्यंतच्या जवळपास १० किलोमीटरच्या जंगलात गेल्या दिड महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी तर एकाला गंभीर जखमी व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी याच भागात वाघाने दोन जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तर काहींना जखमी केले होते. याशिवाय अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर वाघिणीला पकडण्यात आले, पण तिचे तीन बछडे याच जंगलात होते.

ठळक मुद्देदीड महिन्यात तिघांचा बळी; वाघांचे अस्तित्व ठरत आहे मनुष्यासाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचा ७६ टक्के भूभाग असला तरी हिंस्त्र वन्यप्राण्यांचे प्रमाण मोजक्याच भागात आहे. त्यात प्रामुख्याने आरमोरी ते देसाईगंज हा भागातील जंगल वाघांसाठी अधिक पोषक ठरक आहे. पण वाघांचा हा वावर स्थानिक नागरिकांसाठी मात्र जीवघेणा ठरत असल्याने वाघ महत्वाचा की मनुष्य, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.आरमोरी ते देसाईगंज जवळील कुरूडपर्यंतच्या जवळपास १० किलोमीटरच्या जंगलात गेल्या दिड महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी तर एकाला गंभीर जखमी व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी याच भागात वाघाने दोन जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तर काहींना जखमी केले होते. याशिवाय अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर वाघिणीला पकडण्यात आले, पण तिचे तीन बछडे याच जंगलात होते.वास्तविक गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला विभागणाऱ्या वैनगंगा नदीच्या पलिकडे ब्रह्मपुरी तालुक्याच्या हद्दीत मोठ्या संख्येने वाघ आहेत. उन्हाळ्यात नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर तिकडील वाघ गडचिरोली जिल्ह्यात येतात. पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर त्यांना पुन्हा तिकडे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे देसाईगंज-आरमोरीच्या पट्ट्यात नेमके किती वाघ अस्तित्वात आहेत याचा नेमका आकडा वनविभागालाही सांगणे कठीण झाले आहे.दुचाकीने प्रवास करणाऱ्यांसह शेतकरी, शेतमजुर, वनोपजासाठी जंगलात जाणाºयांचा जीव आज धोक्यात आला आहे. वनविभागाने त्यांच्या संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. परंतु सध्या तरी वन विभाग याबाबतीत पूर्णपणे हतबल असल्याचे दिसून येते.किती दिवस असे दहशतीत जगायचे?आरमोरी-देसाईगंज परिसरातील मानव-वन्यजीव संघर्षावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व गडचिरोली जिल्ह्याच्या संस्कृतीचे अभ्यासक अरविंद पोरेड्डीवार यांनी चिंता व्यक्त करत किती दिवस असे दहशतीत जगायचे? असा सवाल उपस्थित केला आहे. एकीकडे कोरोनाची तर दुसरीकडे वाघांची दहशत असताना नागरिकांची रोजीरोटीच बंद होण्याची शक्यता आहे. वाघांच्या अस्तित्वासाठी मानवाचा बळी जाऊ देणे योग्य नाही. यावर तोडगा काढण्यासाठी ही बाब यापूर्वीही सरकारच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.जंगल शाप की वरदान?राज्यात सर्वाधिक जंगल असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. या जंगलात कोट्यवधी रुपयांची वनसंपत्ती आणि हजारो लोकांच्या उपजीविकेचे साधन असलेले वनोपज आहे. परंतु वाघ, बिबट्या किंवा रानडुकरांच्या हल्ल्यात नागरिकांचे बळी जातात किंवा कायमचे अपंगत्व येते, त्यावेळी जिल्ह्यातील हे जंगल लोकांसाठी शाप आहे की वरदान, असा प्रश्न निर्माण होतो.

टॅग्स :forestजंगलwildlifeवन्यजीव