शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

आरमोरी ते देसाईगंज जवळील कुरूडपर्यंतच्या जवळपास १० किलोमीटरच्या जंगलात गेल्या दिड महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी तर एकाला गंभीर जखमी व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी याच भागात वाघाने दोन जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तर काहींना जखमी केले होते. याशिवाय अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर वाघिणीला पकडण्यात आले, पण तिचे तीन बछडे याच जंगलात होते.

ठळक मुद्देदीड महिन्यात तिघांचा बळी; वाघांचे अस्तित्व ठरत आहे मनुष्यासाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचा ७६ टक्के भूभाग असला तरी हिंस्त्र वन्यप्राण्यांचे प्रमाण मोजक्याच भागात आहे. त्यात प्रामुख्याने आरमोरी ते देसाईगंज हा भागातील जंगल वाघांसाठी अधिक पोषक ठरक आहे. पण वाघांचा हा वावर स्थानिक नागरिकांसाठी मात्र जीवघेणा ठरत असल्याने वाघ महत्वाचा की मनुष्य, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.आरमोरी ते देसाईगंज जवळील कुरूडपर्यंतच्या जवळपास १० किलोमीटरच्या जंगलात गेल्या दिड महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी तर एकाला गंभीर जखमी व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी याच भागात वाघाने दोन जणांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तर काहींना जखमी केले होते. याशिवाय अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. त्यानंतर वाघिणीला पकडण्यात आले, पण तिचे तीन बछडे याच जंगलात होते.वास्तविक गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला विभागणाऱ्या वैनगंगा नदीच्या पलिकडे ब्रह्मपुरी तालुक्याच्या हद्दीत मोठ्या संख्येने वाघ आहेत. उन्हाळ्यात नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर तिकडील वाघ गडचिरोली जिल्ह्यात येतात. पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर त्यांना पुन्हा तिकडे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे देसाईगंज-आरमोरीच्या पट्ट्यात नेमके किती वाघ अस्तित्वात आहेत याचा नेमका आकडा वनविभागालाही सांगणे कठीण झाले आहे.दुचाकीने प्रवास करणाऱ्यांसह शेतकरी, शेतमजुर, वनोपजासाठी जंगलात जाणाºयांचा जीव आज धोक्यात आला आहे. वनविभागाने त्यांच्या संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. परंतु सध्या तरी वन विभाग याबाबतीत पूर्णपणे हतबल असल्याचे दिसून येते.किती दिवस असे दहशतीत जगायचे?आरमोरी-देसाईगंज परिसरातील मानव-वन्यजीव संघर्षावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व गडचिरोली जिल्ह्याच्या संस्कृतीचे अभ्यासक अरविंद पोरेड्डीवार यांनी चिंता व्यक्त करत किती दिवस असे दहशतीत जगायचे? असा सवाल उपस्थित केला आहे. एकीकडे कोरोनाची तर दुसरीकडे वाघांची दहशत असताना नागरिकांची रोजीरोटीच बंद होण्याची शक्यता आहे. वाघांच्या अस्तित्वासाठी मानवाचा बळी जाऊ देणे योग्य नाही. यावर तोडगा काढण्यासाठी ही बाब यापूर्वीही सरकारच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.जंगल शाप की वरदान?राज्यात सर्वाधिक जंगल असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. या जंगलात कोट्यवधी रुपयांची वनसंपत्ती आणि हजारो लोकांच्या उपजीविकेचे साधन असलेले वनोपज आहे. परंतु वाघ, बिबट्या किंवा रानडुकरांच्या हल्ल्यात नागरिकांचे बळी जातात किंवा कायमचे अपंगत्व येते, त्यावेळी जिल्ह्यातील हे जंगल लोकांसाठी शाप आहे की वरदान, असा प्रश्न निर्माण होतो.

टॅग्स :forestजंगलwildlifeवन्यजीव