शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

बालकांच्या आरोग्यासाठी पोषणयुक्त तांदूळ फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:37 IST

देशात नियमित होत असलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे कुपोषणाचे कारण लक्षात आले. विशेष करून ज्या भागात भाताचे विपुल प्रमाणात उत्पादन होते, त्याच भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात पोषणतत्व गुण संवर्धीत (फोर्टिफाईड) तांदूळ प्रकल्प सुरू करण्याच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर आरमोरी येथे सदर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगिरीष बापट यांचे प्रतिपादन : आरमोरीत फोर्टिफाईड तांदळाच्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : देशात नियमित होत असलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे कुपोषणाचे कारण लक्षात आले. विशेष करून ज्या भागात भाताचे विपुल प्रमाणात उत्पादन होते, त्याच भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात पोषणतत्व गुण संवर्धीत (फोर्टिफाईड) तांदूळ प्रकल्प सुरू करण्याच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर आरमोरी येथे सदर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे. आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी तसेच बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी हा पोषणयुक्त आहार फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तथा अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी केले.अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच टाटा ट्रस्ट मुंबईच्या सहकार्याने फोर्टिफाईड तांदूळ प्रकल्पाचा शुभारंभ गुरूवारी येथील जेना अ‍ॅग्रो राईस मिलमध्ये करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी संपत खलाटे, राईस मिलचे संचालक हैदरभाई पंजवानी, टाटा ट्रस्टच्या सोनल आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना ना.बापट म्हणाले, आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमार्फत सुरू होत आहे. प्रशासकीय यंत्रणेने गरजू लोकांपर्यंत धान्य व्यवस्थित पोहोचेल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रास्ताविकातून फोर्टिफाईड तांदूळ वितरण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सन २०१५-१६ च्या चौथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील सहा महिने ते पाच वर्ष या वयोगटातील ५३.०८ टक्के मुलांमध्ये तसेच १५ ते ४९ वर्ष वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के तर गर्भवती महिलांमध्ये ४७.०९ टक्के इतक्या प्रमाणात अ‍ॅनिमिया झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यात पोषणद्रव्ये वाढविण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार कृष्णा गजबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी संपत खलाटे यांनी मानले.ओबीसींच्या शिष्टमंडळाला अपमानजनक वागणूकजिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्क्यांवरून ६ टक्के झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून झालेला अन्याय दूर करण्याची मागणी करण्यासाठी ओबीसींचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले. यावेळी एका ज्येष्ठ नेत्याने या शिष्टमंडळाला अपमानजनक वागणूक देऊन बाहेर जाण्यास सांगितले. या प्रकाराचा तिथेच निषेध करण्यात आला. यावेळी मिलींद खोब्रागडे, अतुल आकरे, दिलीप घोडाम, कुमेश धुपाजारे, साबीर शेख, सारंग जांभुळे, नितेश मेश्राम, नरेश गजभिये, सचिन हेमके इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.लोहयुक्त मिठाचेही वितरण होणारजिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या प्रायोगिक तत्वावरील उपक्रमास टाटा ट्रस्टची मदत प्राप्त झाली आहे. फोर्टिफाईड तांदळासोबतच लोहयुक्त मिठाचे वितरण सुध्दा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे यावेळी ना. बापट यांनी सांगितले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट