शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

बालकांच्या आरोग्यासाठी पोषणयुक्त तांदूळ फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:37 IST

देशात नियमित होत असलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे कुपोषणाचे कारण लक्षात आले. विशेष करून ज्या भागात भाताचे विपुल प्रमाणात उत्पादन होते, त्याच भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात पोषणतत्व गुण संवर्धीत (फोर्टिफाईड) तांदूळ प्रकल्प सुरू करण्याच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर आरमोरी येथे सदर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगिरीष बापट यांचे प्रतिपादन : आरमोरीत फोर्टिफाईड तांदळाच्या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : देशात नियमित होत असलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे कुपोषणाचे कारण लक्षात आले. विशेष करून ज्या भागात भाताचे विपुल प्रमाणात उत्पादन होते, त्याच भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात पोषणतत्व गुण संवर्धीत (फोर्टिफाईड) तांदूळ प्रकल्प सुरू करण्याच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर आरमोरी येथे सदर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे. आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी तसेच बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी हा पोषणयुक्त आहार फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तथा अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी केले.अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच टाटा ट्रस्ट मुंबईच्या सहकार्याने फोर्टिफाईड तांदूळ प्रकल्पाचा शुभारंभ गुरूवारी येथील जेना अ‍ॅग्रो राईस मिलमध्ये करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी संपत खलाटे, राईस मिलचे संचालक हैदरभाई पंजवानी, टाटा ट्रस्टच्या सोनल आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना ना.बापट म्हणाले, आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमार्फत सुरू होत आहे. प्रशासकीय यंत्रणेने गरजू लोकांपर्यंत धान्य व्यवस्थित पोहोचेल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रास्ताविकातून फोर्टिफाईड तांदूळ वितरण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सन २०१५-१६ च्या चौथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील सहा महिने ते पाच वर्ष या वयोगटातील ५३.०८ टक्के मुलांमध्ये तसेच १५ ते ४९ वर्ष वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के तर गर्भवती महिलांमध्ये ४७.०९ टक्के इतक्या प्रमाणात अ‍ॅनिमिया झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यात पोषणद्रव्ये वाढविण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार कृष्णा गजबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी संपत खलाटे यांनी मानले.ओबीसींच्या शिष्टमंडळाला अपमानजनक वागणूकजिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्क्यांवरून ६ टक्के झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून झालेला अन्याय दूर करण्याची मागणी करण्यासाठी ओबीसींचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले. यावेळी एका ज्येष्ठ नेत्याने या शिष्टमंडळाला अपमानजनक वागणूक देऊन बाहेर जाण्यास सांगितले. या प्रकाराचा तिथेच निषेध करण्यात आला. यावेळी मिलींद खोब्रागडे, अतुल आकरे, दिलीप घोडाम, कुमेश धुपाजारे, साबीर शेख, सारंग जांभुळे, नितेश मेश्राम, नरेश गजभिये, सचिन हेमके इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.लोहयुक्त मिठाचेही वितरण होणारजिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या प्रायोगिक तत्वावरील उपक्रमास टाटा ट्रस्टची मदत प्राप्त झाली आहे. फोर्टिफाईड तांदळासोबतच लोहयुक्त मिठाचे वितरण सुध्दा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे यावेळी ना. बापट यांनी सांगितले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट