शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

संख्या रोडावली

By admin | Updated: August 20, 2014 23:30 IST

एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. वेळप्रसंगी दिल्लीही गाठावी लागे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २ लाख ३६ हजारावर मतांनी

मुंबईत केवळ पाच जण पोहोचले : काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांचीअभिनय खोपडे - गडचिरोलीएकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. वेळप्रसंगी दिल्लीही गाठावी लागे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २ लाख ३६ हजारावर मतांनी दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसची उमेदवारी घेण्यासाठी इच्छुकांची संख्या रोडावून गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन मतदार संघात उमेदवारीसाठी केवळ ५ जणांनी मुंबई येथे टिळक भवनात गडचिरोली जिल्ह्यातून हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. यापैकी आरमोरी व गडचिरोली हे दोन मतदार संघ काँग्रेसकडे तर अहेरी मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली व आरमोरी क्षेत्रात काँग्रेस उमेदवारांनी निसटता विजय मिळविला होता. तर अहेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार २६ हजारावर अधिक मतांनी अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाला होता. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने गडचिरोलीच्या आमदारांनाच उमेदवारी दिली होती. त्यांचा २ लाख ३६ हजारावर मतांनी पराभव झाला. स्वत: ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदार संघात ७० हजार ९ मतांनी ते पिछाडीवर होते तर आरमोरी विधानसभा क्षेत्रातही ४३ हजार मतांनी ते माघारले होते. अहेरीतही ४२ हजार मतांचा फटका त्यांना बसला. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या रोडावलेली आहे. जिल्हास्तरावर केवळ १० जणांनी निरीक्षकांना मुलाखती दिल्या होत्या. मात्र मुंबई येथे तिकीट मागण्यासाठी प्रदेशस्तरावरील समितीकडे केवळ पाचच जण पोहोचलेत. गडचिरोलीतून तिघांनी तर आरमोरी क्षेत्रातून दोघांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. यात दोनही विद्यमान आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र तिनही विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी अर्ज मागविले आहे. तसेच पक्षाच्यावतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रावरही दावा सांगण्यात आला आहे. काँग्रेस ७० हजाराने माघारल्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावा, असा युक्तीवाद प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर राकाँच्या नेत्यांनी केला आहे.