शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

संख्या रोडावली

By admin | Updated: August 20, 2014 23:30 IST

एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. वेळप्रसंगी दिल्लीही गाठावी लागे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २ लाख ३६ हजारावर मतांनी

मुंबईत केवळ पाच जण पोहोचले : काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांचीअभिनय खोपडे - गडचिरोलीएकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. वेळप्रसंगी दिल्लीही गाठावी लागे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २ लाख ३६ हजारावर मतांनी दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसची उमेदवारी घेण्यासाठी इच्छुकांची संख्या रोडावून गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन मतदार संघात उमेदवारीसाठी केवळ ५ जणांनी मुंबई येथे टिळक भवनात गडचिरोली जिल्ह्यातून हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. यापैकी आरमोरी व गडचिरोली हे दोन मतदार संघ काँग्रेसकडे तर अहेरी मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली व आरमोरी क्षेत्रात काँग्रेस उमेदवारांनी निसटता विजय मिळविला होता. तर अहेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार २६ हजारावर अधिक मतांनी अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाला होता. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने गडचिरोलीच्या आमदारांनाच उमेदवारी दिली होती. त्यांचा २ लाख ३६ हजारावर मतांनी पराभव झाला. स्वत: ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदार संघात ७० हजार ९ मतांनी ते पिछाडीवर होते तर आरमोरी विधानसभा क्षेत्रातही ४३ हजार मतांनी ते माघारले होते. अहेरीतही ४२ हजार मतांचा फटका त्यांना बसला. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या रोडावलेली आहे. जिल्हास्तरावर केवळ १० जणांनी निरीक्षकांना मुलाखती दिल्या होत्या. मात्र मुंबई येथे तिकीट मागण्यासाठी प्रदेशस्तरावरील समितीकडे केवळ पाचच जण पोहोचलेत. गडचिरोलीतून तिघांनी तर आरमोरी क्षेत्रातून दोघांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. यात दोनही विद्यमान आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र तिनही विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी अर्ज मागविले आहे. तसेच पक्षाच्यावतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रावरही दावा सांगण्यात आला आहे. काँग्रेस ७० हजाराने माघारल्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावा, असा युक्तीवाद प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर राकाँच्या नेत्यांनी केला आहे.