शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

संख्या रोडावली

By admin | Updated: August 20, 2014 23:30 IST

एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. वेळप्रसंगी दिल्लीही गाठावी लागे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २ लाख ३६ हजारावर मतांनी

मुंबईत केवळ पाच जण पोहोचले : काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांचीअभिनय खोपडे - गडचिरोलीएकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. वेळप्रसंगी दिल्लीही गाठावी लागे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा २ लाख ३६ हजारावर मतांनी दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसची उमेदवारी घेण्यासाठी इच्छुकांची संख्या रोडावून गेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन मतदार संघात उमेदवारीसाठी केवळ ५ जणांनी मुंबई येथे टिळक भवनात गडचिरोली जिल्ह्यातून हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. यापैकी आरमोरी व गडचिरोली हे दोन मतदार संघ काँग्रेसकडे तर अहेरी मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली व आरमोरी क्षेत्रात काँग्रेस उमेदवारांनी निसटता विजय मिळविला होता. तर अहेरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार २६ हजारावर अधिक मतांनी अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाला होता. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने गडचिरोलीच्या आमदारांनाच उमेदवारी दिली होती. त्यांचा २ लाख ३६ हजारावर मतांनी पराभव झाला. स्वत: ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या गडचिरोली विधानसभा मतदार संघात ७० हजार ९ मतांनी ते पिछाडीवर होते तर आरमोरी विधानसभा क्षेत्रातही ४३ हजार मतांनी ते माघारले होते. अहेरीतही ४२ हजार मतांचा फटका त्यांना बसला. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या रोडावलेली आहे. जिल्हास्तरावर केवळ १० जणांनी निरीक्षकांना मुलाखती दिल्या होत्या. मात्र मुंबई येथे तिकीट मागण्यासाठी प्रदेशस्तरावरील समितीकडे केवळ पाचच जण पोहोचलेत. गडचिरोलीतून तिघांनी तर आरमोरी क्षेत्रातून दोघांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. यात दोनही विद्यमान आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र तिनही विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी अर्ज मागविले आहे. तसेच पक्षाच्यावतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रावरही दावा सांगण्यात आला आहे. काँग्रेस ७० हजाराने माघारल्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावा, असा युक्तीवाद प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर राकाँच्या नेत्यांनी केला आहे.