तालुक्याच्या ग्रामीण भागात काेराेना आजाराविषयी लाेकांनी धसका घेतला आहे. साधारण सर्दी, ताप, खाेकला असला तरी काेराेना पाॅझिटिव्ह निघण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. तालुक्यातील नागरिक छत्तीसगड व तेलंगणा राज्यात जाऊ नयेत यासाठी काही दिवस सीमा बंद करण्याची गरज आहे. नागरिक कुठलीही तपासणी न करता सर्रास आवागमन करीत आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका पुन्हा बळावला आहे.
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी काेराेनापासून बचाव करण्याकरिता बऱ्याच प्रमाणात प्रवास टाळला; परंतु छुप्या मार्गाने येण्याऱ्या लाेकांमुळे काेराेनाचा धाेका वाढला हाेता. सध्या तालुक्यात काेराेनाचे कमी रुग्ण असले तरी संसर्गाचा धाेका अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे व सतर्कता बाळगणे हाच एकमेव उपाय आहे.