शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रवाशांना भाडेवाढीचा फटका ; गडचिरोलीवरून नागपूरला जाण्यासाठी आता मोजा २९२ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:37 IST

Gadchiroli : २०० एसटी बसेस जिल्ह्यात प्रवासी सेवेसाठी उपलब्द

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) २५ जानेवारीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ जाहीर केली. त्यामुळे जनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास महागला आहे. याचा फटका जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना बसणार आहे. पूर्वी नागपूरसाठी २५५ रुपये तिकीट होते, आता २९२ रुपये मोजावे लागणार आहेत.

एसटी महामंडळाने लागू केलेली भाडेवाढ लागू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर याचा भार पडणार आहे. एकीकडे एसटी महामंडळाने सवलतींचा वर्षाव केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट अशा परिस्थितीत भाडेवाढीचा सामान्य प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट वाढ झाली नव्हती. त्यामुळे एसटीचे चाक तोट्यात रुतले होते. यातून बाहेर काढण्यासाठी भाववाढ आवश्यक होती, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. तिकीट दरात वाढ करतानाच चांगली सेवाही द्यावी लागणार आहे. प्रवाशांकडून चांगल्या सुविधांची अपेक्षा राहील. 

सुट्टया पैशांसाठी वाढणार डोकेदुखी भाडेवाढ विषम प्रमाणात झाल्याने आता ग्रामीण भागातील जनतेला तिकीट काढताना सुट्टया पैशांची अडचण येऊ शकते. नवीन भाडेवाढ करताना ती सम प्रमाणात न झाल्याने सुट्टे पैसे जर प्रवाशांकडे नसतील तर वाहक आणि प्रवाशांत वाद होऊ शकतात. पूर्वी भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत केली जात होती. परंतु नवीन भाडेवाढ मात्र एक रुपयांच्या पटीत केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना सुट्टे पैसे बाळगावे लागतील.

ठिकाणनिहाय तिकीट ठिकाण                                 पूर्वीचे               नवीन गडचिरोली- नागपूर                  २५५                   २९२गडचिरोली- चंद्रपूर                   १२५                   १४२गडचिरोली- चामोर्शी                 ५५                      ६१गडचिरोली- अहेरी                    १७५                   २०२गडचिरोली- देसाईगंज                ८०                     ९०  गडचिरोली- सावली                    ४५                     ५१गडचिरोली- मूल                        ६०                     ७१गडचिरोली- धानोरा                    ५५                     ६१

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली