शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आता दुर्गम भागातही फोर-जी सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 15:13 IST

Gadchiroli : बांधकाम प्रगतीपथावर; केंद्र शासनाच्या मदतीने बीएसएनएल उभारणार २२२ टॉवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने दुर्गम भागात टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बीएसएनएल जिल्ह्यात सुमारे २२२ मोबाइल टॉवर उभारणार आहे. या सर्व टॉवरवर फोर- जी तंत्रज्ञान बसवले जाणार आहे. पूर्वीच्या तुलनेत टॉवरची संख्या दुप्पट होणार असल्याने कव्हरेजची समस्या दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मानवाच्या प्रगतीत इंटरनेट व मोबाइलचे विशेष स्थान आहे. त्यामुळे रस्त्याप्रमाणेच प्रत्येक गाव आता मोबाइलच्या कव्हरेजने जोडण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत केबल टाकून इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे. या क्षेत्रात असलेली भविष्यातील कमाई लक्षात घेऊन बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र ही गुंतवणूक प्रामुख्याने शहराच्या भागात केली, त्यामुळे मोबाइलचे जाळे शहरात व जवळच्या मोठ्या गावात निर्माण झाले. मात्र दुर्गम व ग्रामीण भाग यापासून वंचित राहिला. या भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्याने खासगी कंपन्याही या ठिकाणी टॉवर उभारण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे केंद्र शासनाने स्वतः पुढाकार घेत बीएसएनएलला टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात टॉवरचे काम आता सुरू झाले आहे. बऱ्याच ठिकाणी फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ज्या टॉवरचे काम पूर्ण झाले आहे, त्या टॉवरवर यंत्रणा बसवली जाणार आहे. प्रत्येक मोठ्या गावाच्या ठिकाणी टॉवर होणार आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातही कव्हरेज राहणार आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांसाठी चांगली सेवा मिळेल.

येथे होणार टॉवरतालुका                                     टॉवरअहेरी                                           २२आरमोरी                                      ३भामरागड                                    ११चामोर्शी                                       १६देसाईगंज                                     ४धानोरा                                         ४७गडचिरोली                                   २३कुरखेडा                                      २१मुलचेरा                                        ८कोरची                                         ६सिरोंचा                                        १६एटापल्ली                                     ४५

केंद्र शासनाचे सहकार्यशहरात फाइव्ह-जी तंत्रज्ञान आणले जात असताना ग्रामीण व दुर्गम भागात अजूनपर्यंत टू-जी सेवासुद्धा पोहोचली नाही. या भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्याने कंपन्या टॉवर निर्मिती करण्यास तयार होत नव्हत्या त्यामुळे केंद्र शासनाने स्वतः पुढाकार घेत BSNL सह इतर खासगी कंपन्यांना मोबाइल टॉवरसाठी निधी उपलब्ध केला आहे. टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.

दुर्गम भागाला सर्वाधिक प्राधान्यगडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापला आहे. हा भाग मोबाइल सेवेपासून वंचित राहिला होता. त्यामुळे नव्याने टॉवर मंजूर करताना प्रामुख्याने दुर्गम भागांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रामुख्याने पोलिस मदत  केंद्राच्या परिसरात टॉवर बांधण्यात आले आहेत. 

केंद्र शासनाच्या मदतीने मोबाइल टॉवरचे बांधकाम केले जात आहे. प्रत्येक मोठ्या गावात आता टॉवर बांधले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांमध्येही कव्हरेज पोहोचेल. टॉवरचे काम सुरू आहे. टॉवर बांधून पूर्ण होताच. त्याच्यावर फोर-जी तंत्रज्ञान बसवले जाईल.- किशोर कापगते, विभागीय अभियंता, बीएसएनएल

 

टॅग्स :InternetइंटरनेटGadchiroliगडचिरोली