शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

आता दुर्गम भागातही फोर-जी सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 15:13 IST

Gadchiroli : बांधकाम प्रगतीपथावर; केंद्र शासनाच्या मदतीने बीएसएनएल उभारणार २२२ टॉवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने दुर्गम भागात टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बीएसएनएल जिल्ह्यात सुमारे २२२ मोबाइल टॉवर उभारणार आहे. या सर्व टॉवरवर फोर- जी तंत्रज्ञान बसवले जाणार आहे. पूर्वीच्या तुलनेत टॉवरची संख्या दुप्पट होणार असल्याने कव्हरेजची समस्या दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मानवाच्या प्रगतीत इंटरनेट व मोबाइलचे विशेष स्थान आहे. त्यामुळे रस्त्याप्रमाणेच प्रत्येक गाव आता मोबाइलच्या कव्हरेजने जोडण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत केबल टाकून इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे. या क्षेत्रात असलेली भविष्यातील कमाई लक्षात घेऊन बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र ही गुंतवणूक प्रामुख्याने शहराच्या भागात केली, त्यामुळे मोबाइलचे जाळे शहरात व जवळच्या मोठ्या गावात निर्माण झाले. मात्र दुर्गम व ग्रामीण भाग यापासून वंचित राहिला. या भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्याने खासगी कंपन्याही या ठिकाणी टॉवर उभारण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे केंद्र शासनाने स्वतः पुढाकार घेत बीएसएनएलला टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात टॉवरचे काम आता सुरू झाले आहे. बऱ्याच ठिकाणी फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ज्या टॉवरचे काम पूर्ण झाले आहे, त्या टॉवरवर यंत्रणा बसवली जाणार आहे. प्रत्येक मोठ्या गावाच्या ठिकाणी टॉवर होणार आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातही कव्हरेज राहणार आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांसाठी चांगली सेवा मिळेल.

येथे होणार टॉवरतालुका                                     टॉवरअहेरी                                           २२आरमोरी                                      ३भामरागड                                    ११चामोर्शी                                       १६देसाईगंज                                     ४धानोरा                                         ४७गडचिरोली                                   २३कुरखेडा                                      २१मुलचेरा                                        ८कोरची                                         ६सिरोंचा                                        १६एटापल्ली                                     ४५

केंद्र शासनाचे सहकार्यशहरात फाइव्ह-जी तंत्रज्ञान आणले जात असताना ग्रामीण व दुर्गम भागात अजूनपर्यंत टू-जी सेवासुद्धा पोहोचली नाही. या भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्याने कंपन्या टॉवर निर्मिती करण्यास तयार होत नव्हत्या त्यामुळे केंद्र शासनाने स्वतः पुढाकार घेत BSNL सह इतर खासगी कंपन्यांना मोबाइल टॉवरसाठी निधी उपलब्ध केला आहे. टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.

दुर्गम भागाला सर्वाधिक प्राधान्यगडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापला आहे. हा भाग मोबाइल सेवेपासून वंचित राहिला होता. त्यामुळे नव्याने टॉवर मंजूर करताना प्रामुख्याने दुर्गम भागांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रामुख्याने पोलिस मदत  केंद्राच्या परिसरात टॉवर बांधण्यात आले आहेत. 

केंद्र शासनाच्या मदतीने मोबाइल टॉवरचे बांधकाम केले जात आहे. प्रत्येक मोठ्या गावात आता टॉवर बांधले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांमध्येही कव्हरेज पोहोचेल. टॉवरचे काम सुरू आहे. टॉवर बांधून पूर्ण होताच. त्याच्यावर फोर-जी तंत्रज्ञान बसवले जाईल.- किशोर कापगते, विभागीय अभियंता, बीएसएनएल

 

टॅग्स :InternetइंटरनेटGadchiroliगडचिरोली