शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

आता दुर्गम भागातही फोर-जी सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 15:13 IST

Gadchiroli : बांधकाम प्रगतीपथावर; केंद्र शासनाच्या मदतीने बीएसएनएल उभारणार २२२ टॉवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र शासनाने दुर्गम भागात टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बीएसएनएल जिल्ह्यात सुमारे २२२ मोबाइल टॉवर उभारणार आहे. या सर्व टॉवरवर फोर- जी तंत्रज्ञान बसवले जाणार आहे. पूर्वीच्या तुलनेत टॉवरची संख्या दुप्पट होणार असल्याने कव्हरेजची समस्या दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मानवाच्या प्रगतीत इंटरनेट व मोबाइलचे विशेष स्थान आहे. त्यामुळे रस्त्याप्रमाणेच प्रत्येक गाव आता मोबाइलच्या कव्हरेजने जोडण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत केबल टाकून इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे. या क्षेत्रात असलेली भविष्यातील कमाई लक्षात घेऊन बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र ही गुंतवणूक प्रामुख्याने शहराच्या भागात केली, त्यामुळे मोबाइलचे जाळे शहरात व जवळच्या मोठ्या गावात निर्माण झाले. मात्र दुर्गम व ग्रामीण भाग यापासून वंचित राहिला. या भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्याने खासगी कंपन्याही या ठिकाणी टॉवर उभारण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे केंद्र शासनाने स्वतः पुढाकार घेत बीएसएनएलला टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात टॉवरचे काम आता सुरू झाले आहे. बऱ्याच ठिकाणी फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ज्या टॉवरचे काम पूर्ण झाले आहे, त्या टॉवरवर यंत्रणा बसवली जाणार आहे. प्रत्येक मोठ्या गावाच्या ठिकाणी टॉवर होणार आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातही कव्हरेज राहणार आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांसाठी चांगली सेवा मिळेल.

येथे होणार टॉवरतालुका                                     टॉवरअहेरी                                           २२आरमोरी                                      ३भामरागड                                    ११चामोर्शी                                       १६देसाईगंज                                     ४धानोरा                                         ४७गडचिरोली                                   २३कुरखेडा                                      २१मुलचेरा                                        ८कोरची                                         ६सिरोंचा                                        १६एटापल्ली                                     ४५

केंद्र शासनाचे सहकार्यशहरात फाइव्ह-जी तंत्रज्ञान आणले जात असताना ग्रामीण व दुर्गम भागात अजूनपर्यंत टू-जी सेवासुद्धा पोहोचली नाही. या भागातील नागरिकांची क्रयशक्ती कमी असल्याने कंपन्या टॉवर निर्मिती करण्यास तयार होत नव्हत्या त्यामुळे केंद्र शासनाने स्वतः पुढाकार घेत BSNL सह इतर खासगी कंपन्यांना मोबाइल टॉवरसाठी निधी उपलब्ध केला आहे. टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.

दुर्गम भागाला सर्वाधिक प्राधान्यगडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापला आहे. हा भाग मोबाइल सेवेपासून वंचित राहिला होता. त्यामुळे नव्याने टॉवर मंजूर करताना प्रामुख्याने दुर्गम भागांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रामुख्याने पोलिस मदत  केंद्राच्या परिसरात टॉवर बांधण्यात आले आहेत. 

केंद्र शासनाच्या मदतीने मोबाइल टॉवरचे बांधकाम केले जात आहे. प्रत्येक मोठ्या गावात आता टॉवर बांधले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांमध्येही कव्हरेज पोहोचेल. टॉवरचे काम सुरू आहे. टॉवर बांधून पूर्ण होताच. त्याच्यावर फोर-जी तंत्रज्ञान बसवले जाईल.- किशोर कापगते, विभागीय अभियंता, बीएसएनएल

 

टॅग्स :InternetइंटरनेटGadchiroliगडचिरोली