शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

पीक विमा याेजनेतून नुकसान भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:56 IST

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी पुराखाली ...

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी पुराखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, या घटनेला चार महिन्याचा कालावधी उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील तब्बल १७ हजार ३३ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनी पुराखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची रक्कम संबंधित बँका तसेच तालुका कृषी कार्यालयामार्फत शासनाकडे जमा केली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे ३५ टक्के नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पैसेवारीच्या निकषानुसार संपूर्ण नुकसान भरपाई देण्याचे अधोरेखित करण्यात आले हाेते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून कर्जदार शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यातून तर बिगर कर्जदारांना ऐच्छिक पद्धतीने पीक विमा काढण्यास भाग पाडण्यात आले होते.

दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही व स्थानिक तलाठ्यांमार्फत मोका चौकशी करून पीक नुकसानीचा अहवाल मागविण्यात येऊनही सदर शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

पूरबाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यासह प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

फाेटाे : तहसीलदारांना निवेदन देताना शेतकरी.