शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
3
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
4
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
5
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
6
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
7
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
8
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
9
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
10
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
11
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
12
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
13
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
14
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
15
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
16
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
17
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा याेजनेतून नुकसान भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:56 IST

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी पुराखाली ...

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी पुराखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, या घटनेला चार महिन्याचा कालावधी उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील तब्बल १७ हजार ३३ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनी पुराखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची रक्कम संबंधित बँका तसेच तालुका कृषी कार्यालयामार्फत शासनाकडे जमा केली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे ३५ टक्के नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पैसेवारीच्या निकषानुसार संपूर्ण नुकसान भरपाई देण्याचे अधोरेखित करण्यात आले हाेते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून कर्जदार शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यातून तर बिगर कर्जदारांना ऐच्छिक पद्धतीने पीक विमा काढण्यास भाग पाडण्यात आले होते.

दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही व स्थानिक तलाठ्यांमार्फत मोका चौकशी करून पीक नुकसानीचा अहवाल मागविण्यात येऊनही सदर शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

पूरबाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यासह प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

फाेटाे : तहसीलदारांना निवेदन देताना शेतकरी.