शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

नवा गहू, ज्वारी २०० रुपयांनी महाग; वर्षभराची खरेदी आताच करून ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 20:51 IST

Gadchiroli News आतापासूनच गहू व ज्वारीचे पीक क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी महाग झाल्याने वर्षभरात या किमती आणखी वधारण्याची शक्यता आहे.

गडचिराेली : गेल्या पंधरवड्यापासून राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, तेलवर्गीय पिके; तसेच कडधान्य पिकांचे नुकसान झाले. याचा परिणाम उत्पादनावर हाेण्याची शक्यता आहे. आतापासूनच गहू व ज्वारीचे पीक क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी महाग झाल्याने वर्षभरात या किमती आणखी वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षभराचा साठा आताच खरेदी करून ठेवणे फायदेशीर ठरेल.

गडचिराेली जिल्ह्यात कडधान्य पिकांचे उत्पादन फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत घेतले जाते. सदर पीक ऑक्टाेबर ते नाेव्हेंबर याच कालावधीत लागवड केले जाते. अवघ्या तीन ते चार महिन्यांत पीक निघत असून पीक निघाल्यानंतर शेतकरी याची विक्री खुल्या बाजारात करतात. यात शेतकऱ्यांची माेठ्या प्रमाणात आर्थिक लूट हाेते. अशी स्थिती दरवर्षीच जिल्ह्यात निर्माण हाेते. यावर्षी पुन्हा अवकाळीचा फटका बसल्याने गहू व ज्वारीचे भाव वधारतील; पण त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक हाेईल.

अवकाळी पावसाचा फटका

गडचिराेली जिल्ह्यात मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे उडीद, मूग, हरभरा, जवस, तूर पीक, मसूर यासह विविध प्रकारच्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येते.

गहू २०० रुपयांनी महाग

खुल्या बाजारपेठेत गव्हाचे दर दाेन हजार ते तीन हजार रुपये प्रतिक्विंंटलप्रमाणे आहेत. यात आता दीडशे ते दाेनशे रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे खरेदी करून उपजीविका करणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक भार पडला आहे.

ज्वारी ३०० रुपयांनी महाग

ज्वारीचे दर खुल्या बाजारात ३५ ते ४० रुपये प्रतिकिलाे आहेत. म्हणजे, चार हजार रुपयांच्या आसपास प्रतिक्विंटल दर आहे. आता यातसुद्धा भर पडली असून ४ हजार ३०० रुपयांच्या वर दर पाेहाेचले आहेत.

‘कृउबास’मध्ये आवकच नाही

गडचिराेली जिल्ह्यात पाच कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत; परंतु येथे आवक हाेत नसल्याने हमीभावात खरेदी केली जात नाही. परिणामी ‘कृउबास’मार्फत कडधान्य पिकांची खरेदी हाेत नाही.

अवकाळी पावसामुळे खुल्या बाजारातही कडधान्य पिकांची आवक कमी आहे. जिल्ह्यात गव्हाची विक्री फार कमी शेतकरी करतात. ज्वारी तर विक्री करण्यास पाहत नाही. आम्हाला बाहेरूनच बाेलावून अन्य व्यावसायिकांना ज्वारीचा पुरवठा करावा लागताे.

- सदानंद बारसागडे, व्यापारी

टॅग्स :agricultureशेती