शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

वडसा वन विभागात वाघ, बिबट, अस्वल, तडस, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय, हरिण, ससे यासह विविध प्राणी आढळून येतात. वडसा वन विभागात दोन वर्षात वन विभागाच्या वतीने जनजागृतीचे काम जोमाने केले जात आहे. परंतु अनेकदा मानव व वन्य प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन वन्य जीवांचे आश्रयस्थान असलेले जंगल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. रानडुकर, सांबर, चितळ, ससे अशा वन्यप्राण्यांच्या शिकारीही झाल्या. परंतु पुराव्याअभावी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नाही.

ठळक मुद्देवडसा वन विभाग : वन्यप्राणी मानव संघर्ष वाढल्याने उपाययोजनांची आवश्यकता

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के वनक्षेत्र आहे. वनात विविध प्रजातींचे प्राणी आहेत. परंतु मानवाकडून सातत्त्याने अवैध वृक्षतोड व वनावर अतिक्रमण केले जात असल्याने वन्यजीवांचे संरक्षण अडचणीत आले आहे. वडसा वन विभागातील विविध प्रजातींचे प्राणी झपाट्याने घटत असल्याने दिसून येते. त्यामुळे वन्यजीवांच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष धोरण राबविणे आवश्यक आहे.वडसा वन विभागात वाघ, बिबट, अस्वल, तडस, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय, हरिण, ससे यासह विविध प्राणी आढळून येतात. वडसा वन विभागात दोन वर्षात वन विभागाच्या वतीने जनजागृतीचे काम जोमाने केले जात आहे. परंतु अनेकदा मानव व वन्य प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन वन्य जीवांचे आश्रयस्थान असलेले जंगल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. रानडुकर, सांबर, चितळ, ससे अशा वन्यप्राण्यांच्या शिकारीही झाल्या. परंतु पुराव्याअभावी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नाही. शिकार करणारे गुन्हेगार आजही मुक्तपणे संचार करताना दिसून येतात. राज्यातील प्रस्तावित ३१२ जंगलापैकी १७० जंगल क्षेत्र गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. निम्मे जंगल वन विकास महामंडळांतर्गत असून जंगल कामगार सहकारी संस्था कुपकामे व वनहक्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जंगल नष्ट होत आहे. मागील सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला होता. परंतु किती रोपटे जगली हाही प्रश्नच आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणचे जंगल तोडून त्या ठिकाणी मानवीकृत जंगल तयार करण्यात आले. नैसर्गिकरित्या जंगल तोडून जेव्हा वृक्षारोपण केले जाते. तेव्हा झुडपी जंगलाची कत्तल होते. त्यामुळे जंगलात राहणारे तृणभक्षी हरिण, ससे यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी अन्नसाखळी तुटते. शिकारीचा प्रश्न निर्माण होत असल्याने तृणभक्षी प्राण्यांवर अवलंबून असणारे प्राणीसुद्धा जंगलात राहत नाही. त्यामुळे वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेऊन मानवी बळी घेतात.वन्यजीवांची लोकवस्तीकडे धावकोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी प्राणी गणना होऊ शकली नाही. २०१९ मध्ये झालेल्या प्राणी गणनेनुसार वडसा वन विभागात १० अस्वल, ३४ चितळ, ६२ नीलगाय, ४ सांबर आढळून आले होते. परंतु जंगलात फेरफटका मारल्यानंतर हमखास दिसणारे हरिण, भेडकी, रानमांजर यासारखे वन्यजीव दिसून आले नाही. मागील वर्षात किती वन्यजीव नष्ट झाले. याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. वडसा वन विभागातील तृणभक्षी प्राण्याची संख्या घटल्याने वन्यजीवांची लोकवस्तीकडे धाव सुरू झाली आहे. त्यामुळे मानव व वन्यप्राणी असा संघर्ष वाढला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग