शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

विवाहितेची आत्महत्या नव्हे हत्या, आई-वडिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:57 AM

पोलिसांवर आरोप : चौकशी करून खुनाचा गुन्हा नोंदवा

गडचिराेली : सासरच्या मंडळींकडून पैशासाठी व हुंड्यासाठी माझ्या मुलीचा छळ हाेत असल्याचे तिच्यासाेबत फाेनवरून बाेलताना समजले. दरम्यान, लग्न झाल्यावर दाेन वर्षांत माझ्या मुलीला आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिचा मृत्यू हा संशयास्पद असून, माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही. तिची हत्याच झाली आहे, असा खळबळजनक आराेप करीत सासरकडील दाेषी मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पीडित आई-वडिलांसह नातेवाइकांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

लीना वीरेंद्र उंदीरवाडे (रा. चामोर्शी) असे मृतक विवाहित महिलेचे नाव असून, जावई वीरेंद्र गिरीधर उंदीरवाडे तसेच गिरीधर श्रावण उंदीरवाडे, शाेभा गिरीधर उंदीरवाडे, नरेंद्र गिरीधर उंदीरवाडे व कल्याणी नरेंद्र उंदीरवाडे या सर्वांनी लीनाचा घातपात केला, असा आराेप मृतक लीनाचे वडील उद्धव विठ्ठल वालदे यांनी पत्रपरिषदेत केला.

त्यांनी सांगितले की, पालेबारसा नजीकच्या जनकापूर रिठ येथील आम्ही रहिवासी असून मुलगी लीना वालदे हिचा विवाह चामाेर्शी येथील वीरेंद्र उंदीरवाडे यांच्याशी १५ मार्च २०२१ राेजी झाला. विवाहाला दाेन वर्ष पूर्ण झाले. लीना ही आपल्या घरी चार महिने चांगल्या प्रकारे नांदत हाेती. मात्र, त्यानंतर तिच्या पतीसह सासरच्या सर्व लाेकांकडून हुंडा व पैशासाठी तिचा छळ सुरू केला.

लहान-सहान कारणावरून मारहाण व मानसिक त्रास देणे सुरू झाले. दरम्यान, लीना आमच्याशी माेबाइलवर बाेलताना तुम्ही पैसे पाठवा, माझ्या सासरचे लाेक पैसे मागत आहेत, असे सांगत हाेती. मात्र, आमची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्ही सासरकडील मंडळींनी मागितलेले पैसे देऊ शकलाे नाही. दरम्यान, २ एप्रिल २०२३ राेजी लीनाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती सकाळी ९ वाजता सासरच्या मंडळींनी फाेनद्वारे दिली, असे वडील उद्धव वालदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला वडील उद्धव वालदे, आई पुष्पा वालदे, भाऊ मिलिंद वालदे व आनंदराव टेंभुर्णे उपस्थित हाेते.

विषामुळे मृत्यू तरी गुन्हा नाेंद नाही

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात विषामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मग लीनाने विष घेतले तर त्याला कारण काय, की तिला विष जबरदस्तीने दिले गेले, या दृष्टिकाेनातून चामाेर्शी पाेलिसांनी तपास केला नाही, केवळ आमचे थातूर-मातूर बयाण नाेंदवून तसेच मर्ग दाखल करून हे प्रकरण दडपले, असा आराेप उद्धव वालदे यांनी यावेळी केला.

चौकशी करून योग्य कार्यवाही करू

चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी आरोप फेटाळून लावले. न्यायवैद्यक चाचणी अहवाल आल्यावर तसेच आरोपात तथ्य आढळल्यावर योग्य ती कार्यवाही करू, असे त्यांनी सांगितले. कोणालाही अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली