शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:06 AM

पाच हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम महावितरण कंपनीने सुरू केली असून मागील पाच दिवसात चंद्रपूर परिमंडळातील १ हजार ३६६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच दिवसांत : १ हजार ३६६ ग्राहकांची वीज खंडित

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पाच हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम महावितरण कंपनीने सुरू केली असून मागील पाच दिवसात चंद्रपूर परिमंडळातील १ हजार ३६६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.थकबाकीमुळे वीज वितरण कंपनी अडचणीत आली आहे. केंद्र शासनाकडून नगदी स्वरूपात वीज खरेदी करावी लागते. मात्र ग्राहक वीज बिलाचा भरणा महिना उलटूनही करीत नाही. परिणामी वीज वितरण कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. त्यामुळे एकूण मागणीच्या किमान ९५ टक्के वीज बिलाची वसुली प्रत्येक महिन्यात करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश मंडळ कार्यालय, परिमंडळ कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाºयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार स्थानिक वीज कंपनीचे अधिकारी कारवाई करीत आहेत.कारवाई करताना लहान ग्राहकांपेक्षा मोठ्या ग्राहकांवर कारवाई करण्यास अधिक भर दिला जात आहे. पाच हजार पेक्षा अधिक रूपयांचे बिल ज्या ग्राहकाकडे थकीत आहे, अशा ग्राहकांची यादी तयार करून सदर ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. चंद्रपूर परिमंडळात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश होतो. घरगुती ग्राहकांकडे ८ कोटी ६५ लाख, वाणिज्यीक ग्राहकांकडे ३ कोटी २३ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे ५७ लाख ९५ हजार, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडे १ कोटी ३५ लाख, शासकीय कार्यालयांकडे ९४ लाख ६३ हजार, कृषिपंपधारकांकडे ७१ कोटी ५३ लाख रूपयांचे वीज बिल थकले आहे.महावितरणने कारवाई करीत १ हजार ३६६ थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर या कारवाईची धास्ती घेत सुमारे ६ हजार ६३३ ग्राहकांनी १ कोटी ३० लाख ६९ हजार रूपयांचा भरणा केला आहे. सदर कारवाई आणखी काही दिवस चालू राहणार आहे. वीज बिलाचा भरणा कधीना कधी संबंधित ग्राहकाला करावाच लागतो. मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्या संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला काही दिवस अंधारात घालावे लागतात. त्याचबरोबर मानसिक त्रासही होतो. हे टाळण्यासाठी बिल भरण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे.