शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

पोटातील बाळासह मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:04 AM

रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर झाल्याने पोटातील बाळासह गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यात रविवारी सकाळी घडली. प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर अंतर्गत येत असलेल्या सेवारी उपकेंद्रातील कोताकोंडा येथील बाली किशोर उसेंडी (२३) या गरोदर मातेला शनिवारी रात्रीपासून पोटात दुखणे सुरू झाले.

ठळक मुद्देकार्डावर चुकीची माहिती : रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली (गडचिरोली) : रुग्णालयात पोहोचविण्यास उशीर झाल्याने पोटातील बाळासह गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यात रविवारी सकाळी घडली.प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर अंतर्गत येत असलेल्या सेवारी उपकेंद्रातील कोताकोंडा येथील बाली किशोर उसेंडी (२३) या गरोदर मातेला शनिवारी रात्रीपासून पोटात दुखणे सुरू झाले. तिला रविवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर येथे प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेने आणण्यात आले. मात्र कसनसूर येथे प्रसूती करणे शक्य नसल्याने तिला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला डॉ.विजय साबने यांनी दिला. कसनसूर हे गाव एटापल्लीपासून ३० किमी अंतरावर आहे. रुग्णवाहिकेने गरोदर मातेला आणले जात असताना वाटेतच मातेचा मृत्यू झाला. एटापल्ली रुग्णालयात गरोदर मातेला घेऊन रुग्णवाहिका रविवारी सकाळी ८.४५ वाजता पोहोचली. डॉ.कांचन आकरे यांनी तपासणी केल्यानंतर गरोदर मातेला मृत घोषित केले.विशेष म्हणजे बाली उसेंडीला नऊ महिने पूर्ण झाले होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. तर आरोग्य कार्डावर मात्र तिला नववा महिना सुरू असल्याचे लिहिले होते. यावरून गरोदर मातेच्या कार्डवरील तारखा व्यवस्थीत लिहिल्या जात नाही, असे स्पष्ट होत आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोेन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र महिन्यातून १५ दिवस एक डॉक्टर तर १५ दिवस दुसरा डॉक्टर उपस्थित राहतो.वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहित आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आहे.दोन महिन्यात तीन मातांचा मृत्यूवेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने मागील दोन महिन्यात तीन गरोदर माता व बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घडल्या आहेत. एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन वेगाने चालविणे शक्य होत नाही. परिणामी रुग्ण वेळेवर एटापल्ली येथे पोहोचू शकत नाही. कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.विजय साबने हे नेहमीच दारू पिऊन कर्तव्यावर राहतात. रुग्णांची बरोबर तपासणी करीत नाही, असा आरोप कसनसूरचे सरपंच सुनील मडावी व घोटसूरचे सरपंच शिवाजी हेडो यांनी केला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यू