शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘आई... आई’ आर्त हाकेचे शब्दही झाले मुके; 'त्या' घटनेनं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 16:22 IST

आईच्या रूपाने घरचा एकमेव आधार नेहमीसाठी हरवला. शिक्षण घेण्याच्या वयात पालकांवर अवलंबून असणाऱ्या मुलींच्या खांद्यावर दिव्यांग वडील आणि कुटुंबाची जबाबदारी आली.

ठळक मुद्देमुलींचा आधार हिरावला : दिव्यांग पित्याची जबाबदारी खांद्यावर

महेंद्र रामटेके

आरमोरी (गडचिरोली) : सकाळीच शेतात गेलेली आई केव्हा परत येणार, म्हणून रस्त्याकडे डोळे लावून वाट बघणाऱ्या तिन्ही मुलींना अचानक आईला वाघाने ठार केल्याची बातमी कळली आणि त्या मुली व दिव्यांग पतीच्या पायाखालची जमीन सरकली. गवताच्या लहान झोपडीवर जणूकाही आभाळच कोसळले. मातृप्रेमाच्या विरहाने त्या मुलींनी अश्रूंना माेकळी वाट करून देत शेताच्या दिशेने धाव घेतली. आई...आई म्हणून नेहमी आर्त हाक देणाऱ्या मुलींचे त्या दिवशी शब्दही मुके झाले.

दिव्यांग पती आणि शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींचा आई-वडील बनून सांभाळ करून कुटुंबाचा गाडा रेटणाऱ्या अरसोडाच्या नीलू जांगळे यांच्यावर शुक्रवारी वाघाने हल्ला करून बळी घेतला. त्यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळले. शिक्षण घेण्याच्या वयात पालकांवर अवलंबून असणाऱ्या मुलींच्या खांद्यावर दिव्यांग वडील आणि कुटुंबाची जबाबदारी आली. आईच्या रूपाने घरचा एकमेव आधार नेहमीसाठी हरवला. ध्यानीमनी नसताना अचानक ओढवलेल्या प्रसंगाने आईचे मातृत्व, प्रेम, आणि आधार यापासून त्या मुली कायमच्या पाेरक्या झाल्या. शासनाकडून लाखो रुपये मिळतील; पण आईचे प्रेम मात्र त्या मुलींना मिळणार नाही.

दिव्यांग पतीला होता तिचाच आधार

नीलू जांगळे यांचे कुटुंब अतिशय गरीब. पती हे गेल्या दहा-बारा वर्षांपासून दिव्यांग. रोजीरोटी आणि शेती करून तीन मुली आणि दिव्यांग पतीचा सांभाळ करीत हाेत्या. नीलूला सोनाली, मोनाली आणि देवकन्या अशा तीन मुली आहेत. पती दिव्यांग असल्याने ते खाटेवरच असतात. घरात कुणीही कर्ता पुरुष नाही, तरीही त्याची उणीव मुलींना कधीच भासू दिली नाही. गवताच्या झोपडीत राहून गरिबीचे चटके सहन करीत आपल्या तिन्ही मुलींना शिक्षण देऊन मोठे बनविण्याचे स्वप्न हाेते.

जगण्याच्या साधनाने हिरावले जीवन

नीलूच्या शेतीजवळून एक नाला वाहताे. नाल्यात भरपूर पाणी असल्याने तिने यावर्षी उन्हाळी धानाची लागवड केली. उन्हाळी धानाला पाणी देण्यासाठी ती सकाळीच शेतावर गेली, तर ती कधी परत न येण्यासाठी. वाघ जवळ येताना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी जवळच्या सागाच्या झाडावर ती चढली खरी; पण नियतीने तिचा पिच्छा सोडला नाही. झाडही तिची साथ देऊ शकले नाही. काही क्षणात वाघाने तिला झाडावरून खाली ओढून ठार केले व तिचा जीवनसंघर्षही थांबला. उदरनिर्वाहाच्या शेतीनेच नीलूचा जीव कुटुंबापासून हिरावला.

टॅग्स :SocialसामाजिकTigerवाघDeathमृत्यूarmori-acअरमोरी