शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'गोंडवाना'च्या दीक्षान्त समारंभात मंत्री आत्राम यांना डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:28 IST

निमंत्रण पत्रिकेत नाव नाही: आदिवासी नेत्यावर अन्याय केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाचा ११ वा व १२ वा दीक्षान्त समारंभ तसेच विद्यापीठाच्या १३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक कॅबिनेट मंत्री व आदिवासी समूहातील ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांचा नामोल्लेख नाही. आदिवासीबहुल जिल्ह्यात होऊ घातलेल्या कार्यक्रमात आदिवासी समूहातील मंत्र्यांनाच डावलण्याची खेळी नेमकी कोणाची, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

गोंडवाना विद्यापीठात १ ऑक्टोबर रोजी दीक्षान्त समारंभ व विद्यापीठ वर्धापन दिन कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अमरावती येथील संत गाडगेबाब विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते हे उपस्थित राहतील. यावेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. पदवी प्रदान करण्यात येणार आहे. मंचावर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची उपस्थिती राहणार आहे. 

चंद्रपूर येथील विदर्भ वनवासी कल्याणचे अध्यक्ष डॉ. शरद सालफले यांना जीवनसाधना पुरस्काराने २०२४ सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय विद्यापीठ ਰ संलग्नित महाविद्यालयांच्या विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या तयारीची माहिती ३० सप्टेंबरला प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. कृष्णा कारू, डॉ. संजय डाफ, प्रा. सर्फराज अन्सारी उपस्थित होते. 

वार्षिकांक स्पर्धेत 'शिवाजी'ची बाजी आंतरमहाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेचा (२०२३-२४) निकाल जाहीर झाला. यात राजुरा (जि. चंद्रपूर) येथील शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने अव्वल, कुरखेडातील गोंविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाने द्वितीय, तर आरमोरीतील म. गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. चामोर्शीच्या केवळराम हरडे कॉलेज व चंद्रपूरच्या सरदार पटेल कॉलेजने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. 

१५६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक  सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षातील पदव्युत्तर पदवी, पदविका तसेच पीएच. डी. प्राप्त करणारे एकूण १५६ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. त्या सर्वांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

आदिवासी नेत्यांचे विद्यापीठाला वावडे 

  • मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना यापूर्वी देखील विद्यापीठाने एका कार्यक्रमात डावलले होते. मात्र, नंतर चूक लक्षात आल्यावर निमंत्रण पत्रिका बदलून त्यांचा नामोल्लेख केला होता. 
  • आता पुन्हा एकदा विद्यापीठाने दीक्षान्त समारंभात त्यांना डावलले आहे. विद्यापीठास आदिवासी नेत्यांचे वावडे कशासाठी, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केला आहे.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली