शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोह उत्खनन करा, पण रोजगार द्या; झेंडेपारच्या जनसुनावणीतील सूर, कडेकोट सुरक्षा व्यवस्था

By संजय तिपाले | Updated: October 10, 2023 17:53 IST

विकासाला विरोध नाही, लोह उत्खनन करा, पण रोजगार देताना स्थानिकांना प्राधान्य द्या, प्रभावित गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करा, असा सूर १० ऑक्टोबर रोजी जनसुनावणीत उमटला.

गडचिरोली : विकासाला विरोध नाही, लोह उत्खनन करा, पण रोजगार देताना स्थानिकांना प्राधान्य द्या, प्रभावित गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करा, असा सूर १० ऑक्टोबर रोजी जनसुनावणीत उमटला. कोरची तालुक्यातील झेंडेपार येथील बहुचर्चीत लोहखाण प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या जनसुनावणीला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून प्रश्न उपस्थित केले. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाला अक्षरश: छावणीचे स्वरुप आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जनसुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूरचे उपसंचालक उमेश भाडुळे, जिल्हाधिकारी संजय मीणा, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक जिल्हाधिकारी ओंकार पवार उपस्थित होते. कोरचीतील झेंडेपार येथे ४६.५७ हेक्टरवर लोह खाण उत्खननासाठी निविदा प्रक्रिया झाली. यानंतर पाच कंपन्यांना उत्खननासाठी परवानगी मिळाली आहे. आर.एम. राजूरकर ९ हेक्टर, मे. अनुज माईन्स मिनरल्स ँड केमिकल्स प्रा.लि. १२ हेक्टर, निर्मलचंद जैन १०.३० हेक्टर, अनोजकुमार अगरवाल १२ हेक्टर, मनोजकुमार सरिया ४ हेक्टरवर उत्खनन करणार आहेत.  जनसुनावणीत सुरुवातीला कंपनीनिहाय प्रस्तावित लोह उत्खननाबाबत सविस्तर माहिती दिली. पर्यावरण व्यवस्थापन, सामुदायिक पर्यावरण जबाबदारी उपक्रम व वन्यजीव व्यवस्थापन अर्थसंकल्प सादर केला. शिवाय प्रकल्पस्थळाचे छायाचित्र, प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्थेत पडणारी भर याचीही माहिती दिली. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली.

 यावेळी विकासाला विरोध नाही, पण आदिवासींचे लोकजीवन उध्दवस्थ होऊ नये, संविधानाच्या कलम २४४  व ५ व्या अनुसूचित कोरची तालुका समाविष्ट आहे. वनहक्क कायदा २००६ चे नियम २००८ सुधारित नियम २०१२ नुसार ग्रामसभांच्या अधिकारांवर गदा नको, या परिसरातील वनसंपदा उध्दवस्थ होऊ नये तसेच रावपाट या आदिवासींच्या श्रध्दास्थानाचे पावित्र्य भंग होऊ नये, अशी जोरकस मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यासह अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील व कंपन्यांच्या पर्यावरण सल्लागारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन शंका निरसन केले. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, डॉ. देवराव होळी यांनी प्रकल्पामुळे रोजगार मिळेल, पायाभूत सुविधा वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी विकास करा, पण आदिवासींचे हक्क शाबूत ठेवा, त्यांना उध्दवस्थ करु नका, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा, अशी मागणी लावून धरली तर काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. नामदेव किरसान यांनी धूळ, प्रदूषण नियंत्रणात ठेवा, खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र दळणवळणाची साधने निर्माण करा, ग्रामसभेची परवानगी घ्या, अशी मागणी केली.  कोरची व परिसरातील नागरिक उपस्थित होते. नियोजन भवनात जागा अपुरी पडल्याने बाहेर शामियाना थाटून जनसुनावणी लाईव्ह दाखवली तसेच जनसुनावणीचे चित्रीकरण केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक ठिकाणीच जनसुनावणी घ्यायला हवी होती.  प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याचा उपसा केल्याने भूगर्भातील साठा कमी होऊन पाणीटंचाई निर्माण होऊ नये. रोजगार देताना किमान ८० टक्के लोक स्थानिक असावेत. आवश्यकतेनुसार प्रशिक्षण द्यावे. - सिद्धार्थ राऊत, स्थानिक रहिवासी कंपन्यांनी जनसुनावणीपूर्वी जो सर्वे केला, त्यासाठी ग्रामसभेची परवानगी घ्यायला हवी होती. आम्ही अनेक वर्षे तेथे राहतो, त्यामुळे आम्हाला विश्वासात घेऊन सर्वे केला असता तर अधिक चांगले झाले असते. या प्रकल्पामुळे कुठल्याही परिस्थितीत स्थानिकांचे जनजीवन प्रभावित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. - अमिता मडावी, स्थानिक रहिवासी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली