शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गरजूंसाठी गडचिरोलीत ‘मिल ऑन व्हील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

अंमलबजावणीसाठी गडचिरोली नगर परिषदेला निधी वर्ग करण्यात आला आहे. नगर परिषदेकडून हे काम महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा संचालित अन्नपूर्णा माय खानावळ, सखी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत अन्न शिजवून व पॅकींग करून दिले जात आहे. नागरिकांना हे जेवण ५ रुपयात मिळत असले तरी संबंधित बचत गटाला त्या जेवणापोटी उर्वरित रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून दिली जाणार आहे.

ठळक मुद्देअवघ्या पाच रुपयात जेवण : वेगवेगळ्या भागात फिरत्या गाडीवर व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोरगरीब आणि गरजूंना सकाळचा नास्ता आणि रात्रीचे जेवण अवघ्या ५ रुपयात, आणि वेगवेगळ्या भागात पोहोचवून देणाऱ्या ‘मिल ऑन व्हील’ या उपक्रमाचा शुभारंभ गुरूवारी गडचिरोलीत करण्यात आला.जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून एकूण जमा रकमेच्या ३० टक्के निधी कोविड-१९ करीता खर्च करण्याचे आदेश केंद्र तसेच राज्य शासनाने नुकतेच दिले आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर गडचिरोली शहरातील गरजू लोकांसाठी जेवणाचे २५० पार्सल दररोज फिरत्या वाहनातून शहराच्या वेगवेगळ्या भागात पोहचविले जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी गडचिरोली नगर परिषदेला निधी वर्ग करण्यात आला आहे. नगर परिषदेकडून हे काम महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा संचालित अन्नपूर्णा माय खानावळ, सखी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत अन्न शिजवून व पॅकींग करून दिले जात आहे. नागरिकांना हे जेवण ५ रुपयात मिळत असले तरी संबंधित बचत गटाला त्या जेवणापोटी उर्वरित रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून दिली जाणार आहे.शहरात आश्रयास असलेले मजूर, गरीब, भिक्षेकरी, छोटे व्यावसायिक, जवळील भागातून भाजीपाला घेवून आलेले शेतकरी, दवाखान्यातील रु ग्णांचे नातेवाईक इत्यादींना अल्पदरात जेवणाची सोय यातून होणार आहे. ज्यांच्याकडे ५ रूपयेसुद्धा नाहीत त्यांनाही यामधून मोफत जेवणाचे पार्सल दिले जात आहे. सकाळी नास्ता आणि दुपारी शिवभोजन केंद्रावर जेवण व पुन्हा सायंकाळी ‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ मधून जेवण अशा पध्दतीने दररोज तीन वेळ अन्न पुरविण्याचे काम गडाचिरोली प्रशासनाकडून केले जात आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी तेलंगणातून जिल्ह्यात दाखल होत असलेल्या मजूरवर्गाचा ओघ कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती अजूनही कायम आहे. अशा स्थितीत लॉकडाऊनची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेमार्फत माविम कार्यालयात शुभारंभप्रायोगिक तत्वावर यशस्वी झालेल्या या उपक्र माचा शुभारंभ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी संजय ओहोळ, माविमच्या वरिष्ठ व्यवस्थापक कांता मिश्रा, नगरसेवक प्रमोद पिपरे व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामधून या योजनेची अंमलबजावणी नगर परिषदेकडून करण्यात येत आहे.जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानमधून २० लाख रुपयेजिल्हयात असलेला मोठा मजूर वर्ग व संचारबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता कोणीही हाताला काम नाही म्हणून कोणीही उपाशी राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून २० लाख रुपये देण्यास पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मंजुरी दिली. यातील पहिला हप्ता रूपये ५ लक्ष नगर परिषदेला वर्ग करण्यात आला आहे. दि. २५ एप्रिलपासून ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्यानंतर आता दि. ५ जूनपर्यंत दररोज सकाळी नास्ता व सायंकाळी जेवण या पद्धतीने ‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.या फिरत्या भोजन व्यवस्थेत भोजनासाठी नाममात्र ५ रूपये शुल्क ठेवण्यात आले आहे. फारच गरीब व पैसे नसलेल्या गरजूंना आपण मोफत भोजन वितरीत करत आहोत. ही योजना पुढील ४० दिवस सुरू ठेवण्यात येणार असून गरजेनुसार त्यातील २५० थाळीच्या संख्येत वाढही करण्यात येणार आहे. गरजू लोकांनी या याचा लाभ घ्यावा.- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी

या ठिकाणी मिळतो सकस आहारसकाळचा नास्ता : ५ रुपयात मिळणारा नास्ता सकाळी ८ ते ९.३० या वेळेत मिळणार असून तो जिल्हा क्रीडांगण, शेतकरी बाजार, हनुमान वार्ड, कारगिल चौक, गोकुळनगर, वृद्धाश्रम व इंदिरानगर या ठिकाणी मिळेल.दुपारचे जेवण : ५ रुपयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कात्रटवार कॉम्प्लेक्स, चामोर्शी रोड येथील शिवभोजन केंद्रावर हे जेवण मिळत आहे.सायंकाळचे जेवण : ५ रुपयात सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत गडचिरोलीतील हनुमान वॉर्ड, कारगिल चौक, गोकुळनगर, वृद्धाश्रम व इंदिरानगर या ठिकाणी मिळेल. शहरात एकुण ७५० थाळी नास्ता व जेवण दररोज गरजूंना पुरविणे सुरू झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या