शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मेडिगड्डा बॅरेजसाठी प्राणहिता नदीतही मोजमाप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 6:00 AM

गोदावरी नदीवर अंकिसानजीक तेलंगणा सरकारच्या वतीने मेडिगड्डा बॅरेज बांधले जात आहे. या बॅरेजचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे. काही प्रमाणात पाणीसुध्दा साठविले जात आहे. या बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने अजूनपर्यंत पाणी साठविण्यात आलेले नाही. केवळ चाचपणी करण्यासाठी पाणी साठविल्या गेले आहे. बांधकाम पूर्ण होऊन संपूर्ण दरवाजे बंद केल्यानंतर किती दूरपर्यंत व किती पातळीपर्यंत पाणी राहिल.

ठळक मुद्देपाणी पातळी वाढविणार : सिरोंचा तालुक्यातील शेती होणार जलमय

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मेडिगड्डा बॅरेजसाठी सिरोंचानजीकच्या प्राणहिता नदीतही सर्वे केला जात आहे. त्यामुळे मेडिगड्डाचे पाणी सिरोंचाच्या पलिकडेही साचून राहण्याची शक्यता आहे. अनेकांची शेती पाण्यात बुडून राहणार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गोदावरी नदीवर अंकिसानजीक तेलंगणा सरकारच्या वतीने मेडिगड्डा बॅरेज बांधले जात आहे. या बॅरेजचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे. काही प्रमाणात पाणीसुध्दा साठविले जात आहे. या बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने अजूनपर्यंत पाणी साठविण्यात आलेले नाही. केवळ चाचपणी करण्यासाठी पाणी साठविल्या गेले आहे. बांधकाम पूर्ण होऊन संपूर्ण दरवाजे बंद केल्यानंतर किती दूरपर्यंत व किती पातळीपर्यंत पाणी राहिल. याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने मेडिगड्डाच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वे केला जात आहे. मेडिगड्डाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने तेलंगणा सरकार प्रयत्न करीत असावा, अशी शंका सुध्दा नागरिकांमध्ये उपस्थित केली जात आहे. मेडीगड्डाच्या पाण्याची पातळी वाढविल्यास सिरोंचा तालुक्याती हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. याचा फटका शेकडो शेतकऱ्यांना बसणार आहे. भविष्यात सिरोंचा तालुक्यात ही अतिशय गंभीर समस्या निर्माण होणार आहे.६० किमीपर्यंत राहणार पाणीसिरोंचापासून जवळपास १५ किमी अंतरावर असलेल्या अंकिसाजवळ मेडिगड्डा बॅरेजचे बांधकाम केले जात आहे. सदर बॅरेज अतिशय मोठा आहे. या बॅरेजचे पाणी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे नेले जाणार आहे. बॅरेजपासून सुमारे ६० किमीपर्यंत पाणी साचणार आहे. म्हणजेच गोदावरी व प्राणहिता नदीतही पाणी राहणार आहे. ज्या शेतकºयांची शेती सखल भागात आहे, ती शेती वर्षभर बुडून राहणार आहे. सिरोंचा तालुकावासीयांसाठी भविष्यातील ही धोक्याची घंटा आहे. मात्र महाराष्टÑ शासन यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.