शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मार्केट बंद, वर्दळ मात्र चालूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

मुख्य चौकांमध्ये पोलिसांना तैनात केले होते. अधून-मधून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते कुठे जात आहे, अशी विचारणाही करत होते; पण विविध कारणे सांगून लोक आपली सुटका करून घेताना दिसले. त्यामुळे ड्यूटी करणारे पोलीसही हतबल झाले होते. या लॉकडाऊनमध्ये बँका, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप, किराणा दुकान अशा अनेक गोष्टी सुरू ठेवण्यास परवानगी असल्यामुळे बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांसाठी ते एक कारण ठरत होते. 

ठळक मुद्देकाेराेनाला राेखण्यासाठी प्रशासन सतर्क; अनेक नागरिक मात्र अजुनही बिनधास्त

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या लॉकडाऊनचा पहिला दिवस अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय होता. गेल्यावर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लावण्यात आलेले लॉकडाऊन आणि आताच्या लॉकडाऊनमध्ये काय फरक आहे, या औत्सुक्यातून अनेक जण निव्वळ फेरफटका मारण्यासाठी रस्त्यांवर फिरत होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद असली तरी काही भागांत रस्त्यांवरची वर्दळ बऱ्याच प्रमाणात सुरू होती. मुख्य चौकांमध्ये पोलिसांना तैनात केले होते. अधून-मधून येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते कुठे जात आहे, अशी विचारणाही करत होते; पण विविध कारणे सांगून लोक आपली सुटका करून घेताना दिसले. त्यामुळे ड्यूटी करणारे पोलीसही हतबल झाले होते. या लॉकडाऊनमध्ये बँका, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप, किराणा दुकान अशा अनेक गोष्टी सुरू ठेवण्यास परवानगी असल्यामुळे बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांसाठी ते एक कारण ठरत होते. 

न.प.ने केले दुकान सीलसंचारबंदी आणि कोरोनाच्या नियमांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी गुरुवारी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात महसूल, नगर परिषद आणि पोलीस विभागाने इंदिरा गांधी चौक, बस डेपो, गुजरी आणि मार्केट लाइनमध्ये फिरून नागरिक व दुकानदारांना विविध सूचना केल्या. यादरम्यान आठवडी बाजारातील हिमालया वनस्पती आयुर्वेदिक भंडार येथे काही मुले गुटखा व खर्रा विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले. यावेळी बेशिस्त नागरिकांकडून ३४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत मुख्याधिकारी संजीव ओहोळ, अनिल गोवर्धन, पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार प्रामुख्याने सहभागी होते.

चामोर्शीत पाच हजारांचा दंड वसूलचामोर्शी : ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधाची अंमलबजावणी बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात सुरू झाली. कोरोनाकाळात संचारबंदीचे पालन योग्यरीतीने व्हावे यासाठी  चामोर्शी शहराच्या बालउद्यान चौकाजवळ  पोलीस प्रशासन सज्ज असून गुरूवारी  नियम मोडणाऱ्यांवर कारवाई  करून ४ हजार ८०० रुपयांचा दंड सूल केला आहे. संचारबंदीची अंमलबजावणी व्हावी  यासाठी चामोर्शी पोलीस प्रशासन सतर्क झाले. शहरात दिवसभर बँक, ‘अत्यावश्यक सेवा’ मेडिकल आदी  कामांसाठी नागरिक बाहेर येत असतात. बाजारपेठ बंद असून अनावश्यक नागरिक वाहनाने व पायी रस्त्याने फिरतानाही दिसून येत हाेते. त्याला लगाम घालण्यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. मुल, घोट, गडचिरोली मार्गावरून  ये-जा करणाऱ्या  वाहनधारकांची कसून चौकशी करून  दंडही आकारण्यास सुरूवात केली. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, महसूल, नगरपंचायत व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहेत या नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस